शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

४ वर्षांत १७ वाघांची शिकार

By admin | Updated: November 27, 2014 00:23 IST

व्याघ्रप्रकल्पात वाघांना मुक्तपणे संचार करता यावा यासाठी योग्य ती सुरक्षा पुरविणे अपेक्षित असते. परंतु कान्हा व्याघ्रप्रकल्पात याकडे कुठेतरी त्रुटी राहत असल्याचे दिसून येत आहे.

कान्हा व्याघ्रप्रकल्पाचे वास्तव नागपूर : व्याघ्रप्रकल्पात वाघांना मुक्तपणे संचार करता यावा यासाठी योग्य ती सुरक्षा पुरविणे अपेक्षित असते. परंतु कान्हा व्याघ्रप्रकल्पात याकडे कुठेतरी त्रुटी राहत असल्याचे दिसून येत आहे. ४ वर्षांत या व्याघ्रप्रकल्पात १७ वाघांची शिकार करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात विचारणा केली होती. कान्हा व्याघ्रप्रकल्पात किती वाघ आहेत, किती वाघांचा बळी गेला, पर्यटकांची संख्या किती अशाप्रकारच्या प्रश्नांचा यात समावेश होता. याबद्दल दिलेल्या माहितीनुसार २०१० ते २०१३ या ४ वर्षांत १७ वाघांची शिकार करण्यात आली. २०१३ साली ४ वाघांची शिकार करण्यात आली. वन प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी १९ आरोपींना अटक करण्यात आली. अखेरच्या २ वर्षांत केवळ दोनच आरोपींना अटक झाली आहे. शिवाय या व्याघ्र प्रकल्पात एकूण ६५ विविध जातीचे वृक्ष कापल्याचे आढळून आले. त्यात २०१० मध्ये २५, २०११ मध्ये १७, २०१२ मध्ये १४ आणि २०१३ मध्ये ९ वृक्षांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पर्यटकांना आकर्षित करण्याचे आव्हानकान्हा व्याघ्रप्रकल्पाकडे भारतीय व विदेशी पर्यटकांचा ओढा ओसरला असल्याचे गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१३-१४ मध्ये पर्यटकांच्या संख्येत किंचित वाढ झाली असली तरी ती फारशी समाधानकारक नाही. २०१०-११ मध्ये १ लाख ४० हजार ७०० भारतीयांनी तर ३४ हजार ०७३ विदेशी पर्यटकांनी कान्हा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. २०१३-१४ या वर्षात १ लाख १२ हजार ५३९ भारतीयांनी तर २१ हजार १३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार १८५ भारतीय पर्यटक तर फक्त ३२ विदेशी पर्यटकांची वाढ झाल्याचे दिसून येते. व्याघ्र प्रकल्पात ९६ वाघ आणि ९६ बिबट असल्याची माहितीही देण्यात आली.