शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

४ वर्षांत १७ वाघांची शिकार

By admin | Updated: November 27, 2014 00:23 IST

व्याघ्रप्रकल्पात वाघांना मुक्तपणे संचार करता यावा यासाठी योग्य ती सुरक्षा पुरविणे अपेक्षित असते. परंतु कान्हा व्याघ्रप्रकल्पात याकडे कुठेतरी त्रुटी राहत असल्याचे दिसून येत आहे.

कान्हा व्याघ्रप्रकल्पाचे वास्तव नागपूर : व्याघ्रप्रकल्पात वाघांना मुक्तपणे संचार करता यावा यासाठी योग्य ती सुरक्षा पुरविणे अपेक्षित असते. परंतु कान्हा व्याघ्रप्रकल्पात याकडे कुठेतरी त्रुटी राहत असल्याचे दिसून येत आहे. ४ वर्षांत या व्याघ्रप्रकल्पात १७ वाघांची शिकार करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात विचारणा केली होती. कान्हा व्याघ्रप्रकल्पात किती वाघ आहेत, किती वाघांचा बळी गेला, पर्यटकांची संख्या किती अशाप्रकारच्या प्रश्नांचा यात समावेश होता. याबद्दल दिलेल्या माहितीनुसार २०१० ते २०१३ या ४ वर्षांत १७ वाघांची शिकार करण्यात आली. २०१३ साली ४ वाघांची शिकार करण्यात आली. वन प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी १९ आरोपींना अटक करण्यात आली. अखेरच्या २ वर्षांत केवळ दोनच आरोपींना अटक झाली आहे. शिवाय या व्याघ्र प्रकल्पात एकूण ६५ विविध जातीचे वृक्ष कापल्याचे आढळून आले. त्यात २०१० मध्ये २५, २०११ मध्ये १७, २०१२ मध्ये १४ आणि २०१३ मध्ये ९ वृक्षांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पर्यटकांना आकर्षित करण्याचे आव्हानकान्हा व्याघ्रप्रकल्पाकडे भारतीय व विदेशी पर्यटकांचा ओढा ओसरला असल्याचे गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१३-१४ मध्ये पर्यटकांच्या संख्येत किंचित वाढ झाली असली तरी ती फारशी समाधानकारक नाही. २०१०-११ मध्ये १ लाख ४० हजार ७०० भारतीयांनी तर ३४ हजार ०७३ विदेशी पर्यटकांनी कान्हा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. २०१३-१४ या वर्षात १ लाख १२ हजार ५३९ भारतीयांनी तर २१ हजार १३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार १८५ भारतीय पर्यटक तर फक्त ३२ विदेशी पर्यटकांची वाढ झाल्याचे दिसून येते. व्याघ्र प्रकल्पात ९६ वाघ आणि ९६ बिबट असल्याची माहितीही देण्यात आली.