शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

१६ राज्य पालथे घालत स्वच्छतावारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला.

ठळक मुद्देजयदेवचे नागपुरात आगमन : वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही मुकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला. गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. वाटेतच वडिलांच्या मृत्यूची बातमी त्याला कळली. परंतु कोसोदूर गाव असल्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही मुकण्याची पाळी या स्वच्छतेचा संदेश देणाºया स्वच्छतादूतावर आली.पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चाबदानी येथील जयदेव उद्धव राऊत (४७) हा ज्यूट मिलमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान गावोगाव पोहोचविण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली. अंगावरील कपडे आणि सायकलसह तो पत्नी अन् मुलीचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. मिलमधून सहा महिन्याची सुटीही त्याने मॅनेजरकडून मिळविली. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी त्याने सुरू केलेला प्रवास आजपर्यंत सुरू आहे. सायंकाळी भाजप कार्यालयात जाऊन भेट देणे, कुणी भोजनाची व्यवस्था केलीच तर ठीक नाही तर आपल्याच पैशाने काही तरी खाऊन झोपी जायचे अन् सकाळी पुढील प्रवासाला निघायचे असाच जयदेवचा दिनक्रम मागील सहा महिन्यापासून आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू, हिमालच प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या मार्गाने तो नागपुरात दाखल झाला. जयदेव ३० जूनला चंदीगडमध्ये असताना त्याला वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली. परंतु जवळ पैसे नसल्यामुळे आणि घरापासून कोसोदूर असल्यामुळे तो अंत्यसंस्कारालाही जाऊ शकला नाही.नागपुरातून तो छत्तीसगडमध्ये जाणार आहे. घरदार सोडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जयदेवने सुरू केलेली वारी रस्त्यावर कचरा फेकणाºयांच्या डोळ्यात अंजन घालणारीच आहे. त्याच्या मोहिमेपासून नागरिकांनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे ठरविल्यास, ते त्याच्या मोहिमेचे फलित ठरणार आहे.