शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

१६ राज्य पालथे घालत स्वच्छतावारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला.

ठळक मुद्देजयदेवचे नागपुरात आगमन : वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही मुकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला. गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. वाटेतच वडिलांच्या मृत्यूची बातमी त्याला कळली. परंतु कोसोदूर गाव असल्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही मुकण्याची पाळी या स्वच्छतेचा संदेश देणाºया स्वच्छतादूतावर आली.पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चाबदानी येथील जयदेव उद्धव राऊत (४७) हा ज्यूट मिलमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान गावोगाव पोहोचविण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली. अंगावरील कपडे आणि सायकलसह तो पत्नी अन् मुलीचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. मिलमधून सहा महिन्याची सुटीही त्याने मॅनेजरकडून मिळविली. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी त्याने सुरू केलेला प्रवास आजपर्यंत सुरू आहे. सायंकाळी भाजप कार्यालयात जाऊन भेट देणे, कुणी भोजनाची व्यवस्था केलीच तर ठीक नाही तर आपल्याच पैशाने काही तरी खाऊन झोपी जायचे अन् सकाळी पुढील प्रवासाला निघायचे असाच जयदेवचा दिनक्रम मागील सहा महिन्यापासून आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू, हिमालच प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या मार्गाने तो नागपुरात दाखल झाला. जयदेव ३० जूनला चंदीगडमध्ये असताना त्याला वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली. परंतु जवळ पैसे नसल्यामुळे आणि घरापासून कोसोदूर असल्यामुळे तो अंत्यसंस्कारालाही जाऊ शकला नाही.नागपुरातून तो छत्तीसगडमध्ये जाणार आहे. घरदार सोडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जयदेवने सुरू केलेली वारी रस्त्यावर कचरा फेकणाºयांच्या डोळ्यात अंजन घालणारीच आहे. त्याच्या मोहिमेपासून नागरिकांनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे ठरविल्यास, ते त्याच्या मोहिमेचे फलित ठरणार आहे.