शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

१४,४०५ शेतकऱ्यांना बाेनसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात आधारभूत किमतीप्रमाणे धानाची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात आधारभूत किमतीप्रमाणे धानाची खरेदी केली. शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रति क्विंटल बाेनस देण्याची घाेषणाही शासनाने केली हाेती. मात्र, जिल्ह्यातील १४,४०५ शेतकऱ्यांना अद्यापही बाेसनची रक्कम देण्यात आली नाही, असा आराेप नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलने केला असून, बाेनसची रक्कम तातडीने देण्याची मागणी लाेकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राज्य शासनाने खरेदी केंद्र सुरू करून धानाची आधारभूत किमतीप्रमाणे (प्रति क्विंटल १,८६८ रुपये) खरेदी केली. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची घाेषणा शासनाने केली हाेती. खरीप धानाची खरेदी एप्रिमध्ये आटाेपली असून, रबी धानाची खरेदीही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, शासनाने अद्यापही शेतकऱ्यांना खरीप धानाचा बाेनस दिला नाही.

कृषी निविष्ठांसाेबत पेट्राेल, डिझेलच्या किमती वाढल्याने तसेच शेतमालाला बाजारात उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी धानाच्या बाेनसची रक्कम तातडीने देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री, सहकारमंत्री, कृषिमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे निवेदन देताना राहुल घरडे, दीपक गजभिये, कृष्णा बोदलखंडे, मनमोहित घोडेस्वार, अशोक रामटेके, ओमकार मुंडले, नागसेन निकोसे, प्रज्वल तागडे, विनय गजभिये, बुद्धिमान पाटील, लोकेश काटोले, सुनील बोदलखंडे, घनश्याम हिंगणकर, मुकेश देवगडे, आशिष लांबट, सचिन गडे, पंकज राऊत, सुचित मेश्राम आदी उपस्थित हाेते.

...

सरसकट नव्हे, ५० क्विंटल धानाला बाेनस

राज्य शासनाने जिल्ह्यातील १४,४०५ शेतकऱ्यांकडून एकूण ५,६९,८०० क्विंटल धानाची आधारभूत किमतीनुसार खरेदी केली. या सर्व शेतकऱ्यांना बाेनस देण्यासाठी ४५ काेटी रुपयांची आवश्यकता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. वास्तवात, ही रक्कम ३९ काेटी ८८ लाख ६० हजार रुपये एवढी हाेते. शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट नव्हे तर त्याने विकलेल्या एकूण धानाच्या पहिल्या ५० क्विंटलला प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची घाेषणा केली हाेती. त्यापेक्षा अधिक धानाला बाेनस दिला जाणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले हाेते. त्यामुळे बाेनस देण्यासाठी ४५ काेटी रुपये नव्हे तर त्याहीपेक्षा कमी निधीची आवश्यकता आहे.