शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

१४,४०५ शेतकऱ्यांना बाेनसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात आधारभूत किमतीप्रमाणे धानाची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात आधारभूत किमतीप्रमाणे धानाची खरेदी केली. शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रति क्विंटल बाेनस देण्याची घाेषणाही शासनाने केली हाेती. मात्र, जिल्ह्यातील १४,४०५ शेतकऱ्यांना अद्यापही बाेसनची रक्कम देण्यात आली नाही, असा आराेप नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलने केला असून, बाेनसची रक्कम तातडीने देण्याची मागणी लाेकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राज्य शासनाने खरेदी केंद्र सुरू करून धानाची आधारभूत किमतीप्रमाणे (प्रति क्विंटल १,८६८ रुपये) खरेदी केली. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची घाेषणा शासनाने केली हाेती. खरीप धानाची खरेदी एप्रिमध्ये आटाेपली असून, रबी धानाची खरेदीही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, शासनाने अद्यापही शेतकऱ्यांना खरीप धानाचा बाेनस दिला नाही.

कृषी निविष्ठांसाेबत पेट्राेल, डिझेलच्या किमती वाढल्याने तसेच शेतमालाला बाजारात उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी धानाच्या बाेनसची रक्कम तातडीने देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री, सहकारमंत्री, कृषिमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे निवेदन देताना राहुल घरडे, दीपक गजभिये, कृष्णा बोदलखंडे, मनमोहित घोडेस्वार, अशोक रामटेके, ओमकार मुंडले, नागसेन निकोसे, प्रज्वल तागडे, विनय गजभिये, बुद्धिमान पाटील, लोकेश काटोले, सुनील बोदलखंडे, घनश्याम हिंगणकर, मुकेश देवगडे, आशिष लांबट, सचिन गडे, पंकज राऊत, सुचित मेश्राम आदी उपस्थित हाेते.

...

सरसकट नव्हे, ५० क्विंटल धानाला बाेनस

राज्य शासनाने जिल्ह्यातील १४,४०५ शेतकऱ्यांकडून एकूण ५,६९,८०० क्विंटल धानाची आधारभूत किमतीनुसार खरेदी केली. या सर्व शेतकऱ्यांना बाेनस देण्यासाठी ४५ काेटी रुपयांची आवश्यकता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. वास्तवात, ही रक्कम ३९ काेटी ८८ लाख ६० हजार रुपये एवढी हाेते. शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट नव्हे तर त्याने विकलेल्या एकूण धानाच्या पहिल्या ५० क्विंटलला प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची घाेषणा केली हाेती. त्यापेक्षा अधिक धानाला बाेनस दिला जाणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले हाेते. त्यामुळे बाेनस देण्यासाठी ४५ काेटी रुपये नव्हे तर त्याहीपेक्षा कमी निधीची आवश्यकता आहे.