शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

स्मार्ट व्हिलेजसाठी १३ ग्रामपंचायतीत स्पर्धा

By admin | Updated: April 25, 2017 01:48 IST

गावागावात विकासाच्या नावावर स्पर्धा निर्माण करून, जास्तीत जास्त गाव कसे स्मार्ट होईल, यासाठी राज्य शासनाने स्मार्ट व्हिलेज योजना राबविली आहे.

४० लाखांचे बक्षीस : ग्रामपंचायतीच्या गुणवत्तेवर मिळणार गुणनागपूर : गावागावात विकासाच्या नावावर स्पर्धा निर्माण करून, जास्तीत जास्त गाव कसे स्मार्ट होईल, यासाठी राज्य शासनाने स्मार्ट व्हिलेज योजना राबविली आहे. यासाठी तालुकास्तरावर एका ग्रामपंचायतीची स्मार्ट व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली असून, जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १३ ग्रामपंचायती स्मार्ट व्हिलेजच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. यातून पहिल्या क्रमांकावर निवड होणाऱ्या ग्रामपंचायतीला ४० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीच्या धर्तीवर राज्य सरकारने स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबविली असून, यामुळे ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण होणार आहे. गावात आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, ग्रामपंचायतींचे दायित्व, शिक्षण सुविधा आदीवर भर दिला जाणार आहे. ग्रामविकास खात्यातील अनेक योजना एकत्र करत सरकारने ही योजना सुरू केली आहे. गावांचा विकास झाल्यास शहरे स्मार्ट होतील आणि त्यामुळे शहरांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून स्मार्ट ग्राम योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यातून १३ ग्रा.पं.ची तालुकास्तरावर निवड करण्यात आली असून, प्रत्येक ग्रा.पं.ला १० लाख रुपये रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीपैकी एका ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर निवड होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर जि.प. सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती स्मार्ट ग्राम योजनेमध्ये सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, पर्यावरण रक्षण, वनीकरण, डिजिटलायजेशन, ग्रामपंचायतीचे संगणकीकरण, स्वच्छता, जलसंधारण, कुपोषणमुक्ती, आरोग्य अशा विविध घटकांच्या संपूर्ण अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानुसार गुण ठरविण्यात आले आहेत. ज्या ग्रामपंचायतीला सर्वाधिक गुण मिळतील ती ग्रामपंचायत ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. १ मे ला तालुकास्तरावर निवड झालेल्या व जिल्हास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला बक्षीस वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायती कामठी महालगावनागपूर आलागोंदी हिंगणा वागधराकळमेश्वर खापरी भिवापूर चिंचाळाकाटोल बिहालगोंदीमौदा धानलाउमरेड नवेगाव (साधू)रामटेक खैरी बिजेवाडानरखेड खेडी गो.गो.कुही चितापूरपारशिवनी दहेगाव (जोशी)सावनेर भानेगाव