शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

आंतरराज्यीय बसेसमुळे दररोज एसटीला १२ लाखाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:07 IST

आकांक्षा कनोजिया नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम एसटीच्या आंतरराज्यीय बसेसवर झाला आहे. एसटीच्या नागपूर विभागाने ...

आकांक्षा कनोजिया

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम एसटीच्या आंतरराज्यीय बसेसवर झाला आहे. एसटीच्या नागपूर विभागाने आंतरराज्यात जाणाऱ्या बसेसची संख्या कमी केली आहे. त्यामुळे नागपूर विभागाला दररोज १२ लाखाचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

कोरोनामुळे एसटीच्या आंतरराज्यीय बसेस बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉकनंतर आंतरराज्यीय बसेस सुरू करण्यात आल्या. परंतु पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम आंतरराज्यीय बसेसवर झाला. नागपुरातून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात प्रवासी जातात. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे एसटी महामंडळाला दररोज १२ लाखाचे नुकसान होत आहे. सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर आणि राजनांदगाव येथे एसटीच्या आंतरराज्यीय फेऱ्या सुरू आहेत. तसेच तेलंगणा राज्यात हैदराबाद आणि आदिलाबाद येथे बसेस जात आहेत. परंतु मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि पचमढी येथील बसेस कोरोनामुळे बंद करण्यात आल्या आहेत. एकट्या मध्य प्रदेशातील ८ बसेस बंद असल्यामुळे विभागाला ६० हजाराचा फटका बसत आहे. पूर्वी आंतरराज्यात जाणाऱ्या बसेस दररोज १.४० लाख किलोमीटर धावत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे बसेसची संख्या कमी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यामुळे सध्या आंतरराज्यात जाणाऱ्या बसेस १ लाख किलोमीटर धावत आहेत. आंतरराज्यात जाणाऱ्या बसेसच्या माध्यमातून पूर्वी विभागाला दररोज ४२ लाखाचे उत्पन्न मिळायचे. परंतु आता हे उत्पन्न ३० लाखावर आले आहे. दररोज विभागाला १२ लाखाचा फटका बसत असल्यामुळे, विभागाने ४० हजार किलोमीटर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची असुविधा होत असून, एसटीचेही नुकसान होत असल्याची स्थिती आहे.

...............

मध्य प्रदेशच्या सीमेवर कोरोना तपासणी नाही

मध्य प्रदेश सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या नियमानुसार काही दिवसापूर्वी नागपूरवरून जाणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य होते. परंतु आता मध्य प्रदेशात जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सध्या खासगी वाहने मध्य प्रदेशात जात आहेत. खासगी वाहनांनी मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, आता कोरोनाची तपासणी मध्य प्रदेशाच्या सीमेवर करणे बंद झाले आहे. केवळ थर्मामीटरच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी सुरू आहे.

विदर्भातील १२० बसेस बंद

विदर्भात एकूण ४०० बसेस धावतात. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सध्या २८० बसेस धावत आहेत. १२० बसेस बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.’

- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

...............