शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपासाठी १२ तास सौर वीज देणार

By admin | Updated: June 11, 2017 02:17 IST

राज्यातील शेतकरी नापिकीमुळे होरपळला जात असताना तसेच कर्जमाफीसाठी संपाचे आयुध वापरत असताना

चंद्रशेखर बावनकुळे : ९०० शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सौर ऊर्जा फिडर लोकमत न्यूज नेटवर्क कोराडी : राज्यातील शेतकरी नापिकीमुळे होरपळला जात असताना तसेच कर्जमाफीसाठी संपाचे आयुध वापरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक विवंचनेतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी ऊर्जा विभागाच्यावतीने विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत कृषिपंपांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ या १२ तासांच्या काळात सौर वीज देण्याचा शासनाचा संकल्प असून, त्यासाठी ८०० ते ९०० शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र सौर ऊर्जा फिडर तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कोराडी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ३३/११ के व्ही क्षमतेच्या उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, पंचायत समिती सभापती अनिता चिकटे, नगराध्यक्ष सीमा जयस्वाल, नगर पंचायत उपाध्यक्ष राजेश रंगारी, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र गवते, मदन राजूरकर, श्रावण बागडे, सरपंच अर्चना मैंद, उपसरपंच अर्चना दिवाणे, राम तोडवाल, रेखा मानकर, सुरेश गावंडे, प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अनिल निधान, मुख्य अभियंता रफीक शेख, अनंत देवतारे, संजय मैंद, अरविंद खोबे, संजय जयस्वाल, विठ्ठल निमोणे, अरुण कुळकर्णी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, शेतीला पूर्णवेळ वीज मिळाल्यास उत्पन्नवाढीसाठी मदत होईल. त्यामुळे शासनाने राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी नवीन कनेक्शन दिले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना तीन रुपये प्रति युनिटप्रमाणे वीज उपलब्ध करून देणार आहे. यासाठी ४० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे नियोजन करण्यात आले असून, चार लाखांचा मोटरपंप शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी ३.७५ लाख रुपयांचे अनुदान शासनाच्यावतीने दिले जाईल. पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाईल. महावितरणच्या माध्यमातून राज्यात १३ हजार कोटींची कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या निधीतून कोराडी, महादुला, कामठी, मौदा येथे भूमिगत वीज यंत्रणेची कामे केली जाणार असून, यातील ४० ते ५० टक्के कामे पूर्णत्वास आली आहेत. कोराडी तलाव विकासांतर्गत २०० कोटींची कामे केली जाणार असून, महादुला येथील महानिर्मितीच्या १४ हेक्टर जागेवर घरे बांधण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. कामठी - मौद्यात एक हजार सौरपंप कामठी व मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना एक हजार सौर पंप देण्यात येणार असून, यासाठी १० एकरपेक्षा कमी शेती असलेल्या गरजू शेतकऱ्यांनी त्यांची नावे नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ऊर्जा खात्याने राज्यात सुधारणा करायला सुरुवात केली आहे. यात नागपूर जिल्ह्याला विशेष प्राधान्य दिले जात असल्याने १६०० कोटींची कामे वीज क्षेत्रात सुरू आहे. जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्याना महिनाभरात नवीन कनेक्शन दिले जात आहे. दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात २४ तास वीज उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.