शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द, परीक्षा शुल्क कधी परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST

नागपूर : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी भरलेले परीक्षा शुल्क ...

नागपूर : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ६१४०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षेच्या शुल्कापोटी बोर्डाकडे कोट्यवधी रुपये जमा आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गेल्या वर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यावेळी सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक १०३२ हजारावर शाळा आहे. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यात ६१४०७ विद्यार्थी पास झाले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी केली आहे.

- जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या

जिल्ह्यातील दहावीच्या शाळा - १०३२

दहावीतील एकूण विद्यार्थी - ६१४०७

प्रति विद्यार्थी शुल्क - ४१५

एकूण परीक्षा शुल्क - २ कोटी ५४ लाख ८३ हजार ९०५

- परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नाहीत

शासनाच्या निर्णयानुसार दहावीची वार्षिक परीक्षा रद्द झाली आहे. जिल्ह्यात ६१ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

- कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. पण मला वाटते परीक्षा व्हायला हव्या होत्या. मी अभ्यास केला आहे. परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घ्यायला हव्या होत्या. आता आम्हाला सरासरी गुण देण्यात येईल. मग अभ्यास करणाऱ्यांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये फरक कसा करणार. परीक्षेचे शुल्क आम्ही भरले आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायलाच हव्यात.

- श्रुती कोलते, विद्यार्थिनी

- कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमचा निकाल नववीच्या गुणांचा आधार घेऊन द्यायला हवा. अन्यथा परीक्षा घ्यावी. परीक्षा शुल्क परत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय समाधान होणार आहे.

- अंशुल शाहू, विद्यार्थी

- यंदा सर्वच मुले पास होणार आहेत. पण अकरावीच्या प्रवेश मूल्यांकनाच्या आधारे होणे अपेक्षित आहे. कारण सर्वच विद्यार्थ्यांची पातळी सारखी नाही. भरपूर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासाचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात यावी.

- उल्हास पूरकाम, शिक्षक