शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

दहावीची परीक्षा रद्द, परीक्षा शुल्क कधी परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST

नागपूर : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी भरलेले परीक्षा शुल्क ...

नागपूर : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ६१४०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षेच्या शुल्कापोटी बोर्डाकडे कोट्यवधी रुपये जमा आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गेल्या वर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यावेळी सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक १०३२ हजारावर शाळा आहे. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यात ६१४०७ विद्यार्थी पास झाले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी केली आहे.

- जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या

जिल्ह्यातील दहावीच्या शाळा - १०३२

दहावीतील एकूण विद्यार्थी - ६१४०७

प्रति विद्यार्थी शुल्क - ४१५

एकूण परीक्षा शुल्क - २ कोटी ५४ लाख ८३ हजार ९०५

- परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नाहीत

शासनाच्या निर्णयानुसार दहावीची वार्षिक परीक्षा रद्द झाली आहे. जिल्ह्यात ६१ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

- कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. पण मला वाटते परीक्षा व्हायला हव्या होत्या. मी अभ्यास केला आहे. परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घ्यायला हव्या होत्या. आता आम्हाला सरासरी गुण देण्यात येईल. मग अभ्यास करणाऱ्यांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये फरक कसा करणार. परीक्षेचे शुल्क आम्ही भरले आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायलाच हव्यात.

- श्रुती कोलते, विद्यार्थिनी

- कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमचा निकाल नववीच्या गुणांचा आधार घेऊन द्यायला हवा. अन्यथा परीक्षा घ्यावी. परीक्षा शुल्क परत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय समाधान होणार आहे.

- अंशुल शाहू, विद्यार्थी

- यंदा सर्वच मुले पास होणार आहेत. पण अकरावीच्या प्रवेश मूल्यांकनाच्या आधारे होणे अपेक्षित आहे. कारण सर्वच विद्यार्थ्यांची पातळी सारखी नाही. भरपूर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासाचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात यावी.

- उल्हास पूरकाम, शिक्षक