शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

दहावीची परीक्षा रद्द, परीक्षा शुल्क कधी परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST

नागपूर : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी भरलेले परीक्षा शुल्क ...

नागपूर : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ६१४०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षेच्या शुल्कापोटी बोर्डाकडे कोट्यवधी रुपये जमा आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गेल्या वर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यावेळी सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक १०३२ हजारावर शाळा आहे. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यात ६१४०७ विद्यार्थी पास झाले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी केली आहे.

- जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या

जिल्ह्यातील दहावीच्या शाळा - १०३२

दहावीतील एकूण विद्यार्थी - ६१४०७

प्रति विद्यार्थी शुल्क - ४१५

एकूण परीक्षा शुल्क - २ कोटी ५४ लाख ८३ हजार ९०५

- परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नाहीत

शासनाच्या निर्णयानुसार दहावीची वार्षिक परीक्षा रद्द झाली आहे. जिल्ह्यात ६१ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

- कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. पण मला वाटते परीक्षा व्हायला हव्या होत्या. मी अभ्यास केला आहे. परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घ्यायला हव्या होत्या. आता आम्हाला सरासरी गुण देण्यात येईल. मग अभ्यास करणाऱ्यांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये फरक कसा करणार. परीक्षेचे शुल्क आम्ही भरले आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायलाच हव्यात.

- श्रुती कोलते, विद्यार्थिनी

- कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमचा निकाल नववीच्या गुणांचा आधार घेऊन द्यायला हवा. अन्यथा परीक्षा घ्यावी. परीक्षा शुल्क परत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय समाधान होणार आहे.

- अंशुल शाहू, विद्यार्थी

- यंदा सर्वच मुले पास होणार आहेत. पण अकरावीच्या प्रवेश मूल्यांकनाच्या आधारे होणे अपेक्षित आहे. कारण सर्वच विद्यार्थ्यांची पातळी सारखी नाही. भरपूर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासाचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात यावी.

- उल्हास पूरकाम, शिक्षक