शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नागरिकत्व संशोधन विधेयकाचे नागपुरातून १० हजार लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 10:47 IST

नागपुरातील दहा हजारांसह संपूर्ण राज्यातील जवळपास २५ लाखांहून अधिक लोकांना या विधेयकामुळे फायदा होईल, असा दावा भारतीय सिंधू सभेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात ६०० अर्ज विचाराधीनशिबिरांचे आयोजन करणार भारतीय सिंधू सभा

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संसदेत नागरिकत्व संशोधन विधेयक संमत झाल्यानंतर नागपुरातील सुमारे दहा हजार लोकांना याचा लाभ होणार आहे. १९५१ नंतर पाकिस्तानातून भारतात आलेले परंतु नियमांच्या फेऱ्यात अडकल्याने नागरिकतेपासून वंचित राहिलेले हे लोक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातदेखील यासंदर्भात ६०० अर्ज विचाराधीन आहेत. भारतीय सिंधू सभेने अशा सर्व लोकांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विधेयकावर राष्ट्रपतींचे हस्ताक्षर झाल्यावर यासंदर्भात ‘जीआर’ जारी होईल व लगेच सभेकडून शिबिर आयोजित करण्यात येईल.नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले बहुतांश लोक जरीपटका, वर्धमाननगर, खामला तसेच उत्तर व पूर्व नागपुरातील विविध भागांमध्ये राहत आहेत. यातील ६०० लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत प्रचलित असलेल्या नियमांंतर्गत नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी अर्ज केले आहेत. अद्याप ‘जीआर’ आलेला नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही. नागपुरातील दहा हजारांसह संपूर्ण राज्यातील जवळपास २५ लाखांहून अधिक लोकांना या विधेयकामुळे फायदा होईल, असा दावा भारतीय सिंधू सभेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केला आहे. या लोकांच्या मदतीसाठी नागपूरसह मुंबई, ठाणे, उल्हास नगर, कल्याण, पुणे, कोल्हापूर इत्यादी शहरांत शिबिर आयोजित करण्यात येतील. नागरिकत्व नसलेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या महिला व ज्येष्ठ नागरिकांची आहे. त्यांना केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सिंधी समाजातील सर्व पंचायतींनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. शिबिराच्या तयारीसाठी राजेश जांबिया, पी.डी. केवलरामानी, घनश्याम कुकरेजा, वलीराम सहजरामानी, हरीश देवानी, राजेश बटवानी, संजय वासवानी, विजय केवलरामानी, डॉ. विंकी रुघवानी, दर्शन वीरवानी, ओमप्रकाश छावलानी, राज कोटवानी इत्यादींनी प्रयत्न सुरू केले आहेत.

आतापर्यंत किचकट होते नियमभारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी अतिशय किचकट असे नियम होते. यासंदर्भात १९५५ मध्ये कायदा बनला होता. यानुसार १९५१ च्या अगोदर पाकिस्तान तसेच बांगलादेशमधून (तेव्हाचे पूर्व पाकिस्तान) आलेल्या लोकांना नागरिकत्व घेण्याची संधी मिळाली.मात्र त्यानंतर आलेले लोक संकटात अडकले. परंतु आणखी लोकांचे येणे सुरुच होते.सात वर्ष वैध माध्यमातून भारतात राहणारी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकतो असा २०११ मध्ये नियम बनला. परंतु यातील अनेक लोकांच्या पासपोर्टचा कालावधीच संपला होता. त्यामुळे त्यांना अगोदर पाकिस्तानमध्ये जाऊन पासपोर्ट ‘रिन्यू’ करणे आवश्यक होते. ते त्यांच्यासाठी अशक्य होते.

‘लाँग टर्म व्हिजा’वर राहत आहेत अनेकजणकुकरेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरातील ज्या दहा हजार लोकांना या विधेयकामुळे लाभ होईल, त्यातील बहुतांश लोक ‘लाँग टर्म व्हिजा’वर देशात राहत आहेत. नियमानुसार भारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी सात वर्ष भारतात राहणे अनिवार्य आहे. बºयाच लोकांचा ‘व्हिजा’देखील संपला आहे. मात्र ते परत त्यांच्या देशात परतले नाहीत. विधेयक मंजूर झाल्याने अशा लोकांना थेट लाभ पोहोचणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक