शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

१०० कोटी वाढवून देण्याचे दिले होते आश्वासन, वाढवले केवळ ४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST

जिल्ह्यातील मंत्र्यांनी घेतला आक्षेप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीला ...

जिल्ह्यातील मंत्र्यांनी घेतला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीला देण्यात येणाऱ्या विकास निधीमध्ये १०० कोटी रुपयाची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र ४५ कोटी रुपयाचीच वाढ झाली आहे. आता नागपूर जिल्ह्याची डीपीसी ४४५ कोटी रुपयाची झाली आहे. परंतु जिल्ह्यातील मंत्री मात्र संतुष्ट नाहीत. त्यांनी नागपूर जिल्ह्यासाठी ५०० कोटी रुपयाची मागणी लावून धरली आहे.

याच महिन्यात विभागातील डीपीसीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली होती. २०२०-२१ साठी ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु त्यावेळी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे नागपुरात नसल्याने डीपीसीच्या निधी मंजुरीवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. मागच्या वर्षी नागपूर जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये वाढवून देण्यात आला होता. याची आठवण करून देत अजित पवार यांनी २०२० साली नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही. त्यामुळे यावेळी देखील १०० कोटीचा निधी अधिक वाढवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. पालकमंत्री नसल्याने यावर अंतिम निर्णय मुंबईत घेऊ असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठक झाली. या बैठकीत नागपूर डीपीसीचा निधी ४०० कोटीवरून वाढवून ४४५ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात डीपीसीचा निधी लोकसंख्येच्या आधारावर बनवून ठरलेल्या फार्म्युल्यानुसार निश्चित केला जात होता. यानुसार नागपूरच्या डीपीसीच्या निधीची मर्यादा २४१.८६ कोटी रुपये आहे. परंतु काही वर्षांपासून उपराजधानी असल्यामुळे यापेक्षा अधिकचा निधी मंजूर होत होता. गेल्यावर्षी सुद्धा ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

बॉक्स

५१० कोटीची मागणी

पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, ते नागपूरच्या डीपीसीसाठी ५१० कोटी रुपयाची मागणी करीत आहे. त्यांनी यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्याशीही संपर्क साधला आहे. जिल्ह्याच्या डीपीसीच्या निधीत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बॉक्स

जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, नाग भवनात गेट्स हाऊस

राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाला नवीन रुप देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी २५० कोटी रुपयााचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रकारे नाग भवन परिसरात अत्याधुिनक गेस्ट हाऊस बनवण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देत सार्वजनिक बांधकाम विभागाला यासंदर्भात पुढाकार घेण्यात परवानगी मिळाली आहे. मुंबईत पार पडलेल्या बैठकीत याचे प्रेझेंटेशनही झाले.