शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

१०० कोटी वाढवून देण्याचे दिले होते आश्वासन, वाढवले केवळ ४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST

जिल्ह्यातील मंत्र्यांनी घेतला आक्षेप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीला ...

जिल्ह्यातील मंत्र्यांनी घेतला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीला देण्यात येणाऱ्या विकास निधीमध्ये १०० कोटी रुपयाची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र ४५ कोटी रुपयाचीच वाढ झाली आहे. आता नागपूर जिल्ह्याची डीपीसी ४४५ कोटी रुपयाची झाली आहे. परंतु जिल्ह्यातील मंत्री मात्र संतुष्ट नाहीत. त्यांनी नागपूर जिल्ह्यासाठी ५०० कोटी रुपयाची मागणी लावून धरली आहे.

याच महिन्यात विभागातील डीपीसीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली होती. २०२०-२१ साठी ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु त्यावेळी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे नागपुरात नसल्याने डीपीसीच्या निधी मंजुरीवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. मागच्या वर्षी नागपूर जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये वाढवून देण्यात आला होता. याची आठवण करून देत अजित पवार यांनी २०२० साली नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही. त्यामुळे यावेळी देखील १०० कोटीचा निधी अधिक वाढवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. पालकमंत्री नसल्याने यावर अंतिम निर्णय मुंबईत घेऊ असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठक झाली. या बैठकीत नागपूर डीपीसीचा निधी ४०० कोटीवरून वाढवून ४४५ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात डीपीसीचा निधी लोकसंख्येच्या आधारावर बनवून ठरलेल्या फार्म्युल्यानुसार निश्चित केला जात होता. यानुसार नागपूरच्या डीपीसीच्या निधीची मर्यादा २४१.८६ कोटी रुपये आहे. परंतु काही वर्षांपासून उपराजधानी असल्यामुळे यापेक्षा अधिकचा निधी मंजूर होत होता. गेल्यावर्षी सुद्धा ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

बॉक्स

५१० कोटीची मागणी

पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, ते नागपूरच्या डीपीसीसाठी ५१० कोटी रुपयाची मागणी करीत आहे. त्यांनी यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्याशीही संपर्क साधला आहे. जिल्ह्याच्या डीपीसीच्या निधीत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बॉक्स

जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, नाग भवनात गेट्स हाऊस

राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाला नवीन रुप देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी २५० कोटी रुपयााचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रकारे नाग भवन परिसरात अत्याधुिनक गेस्ट हाऊस बनवण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देत सार्वजनिक बांधकाम विभागाला यासंदर्भात पुढाकार घेण्यात परवानगी मिळाली आहे. मुंबईत पार पडलेल्या बैठकीत याचे प्रेझेंटेशनही झाले.