शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

फुलकोबी शंभरीत !

By admin | Updated: July 13, 2016 03:28 IST

देशाच्या सर्वच भागात पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.

पावसामुळे भाजीपाला महाग : स्थानिकांकडून आवक कमी नागपूर : देशाच्या सर्वच भागात पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुबलक प्रमाणात येणाऱ्या भाज्यांची आवक आता कमी आहे. त्यामुळे भाव दुपटीवर गेले आहेत. नागपूर जिल्हा, मध्य प्रदेशचे काही जिल्हे आणि सीमेलगतच्या काही गावातून उत्पादकांना भाज्या आणताना अडचणी निर्माण झाल्या असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्या महागच आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, परिणामी भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. भाजीपाला मुबलक प्रमाणात बाजारात येण्यास दीड महिन्यांचा कालवधी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना भाज्या पुढील दीड महिने जास्त भावातच खरेदी कराव्या लागतील. स्थानिक उत्पादकांकडून आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, पालक, चवळी भाजी आणि वांगे विक्रीस येत आहेत. किरकोळमध्ये फुलकोबी आणि सिमला मिरचीचे भाव १०० रुपये किलो होते. तर टमाटर ५० रुपये किलो या भावाने विक्री झाली. वांगे ३५ ते ४० रुपयांवर स्थिर होते.