शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

फुलकोबी शंभरीत !

By admin | Updated: July 13, 2016 03:28 IST

देशाच्या सर्वच भागात पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.

पावसामुळे भाजीपाला महाग : स्थानिकांकडून आवक कमी नागपूर : देशाच्या सर्वच भागात पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुबलक प्रमाणात येणाऱ्या भाज्यांची आवक आता कमी आहे. त्यामुळे भाव दुपटीवर गेले आहेत. नागपूर जिल्हा, मध्य प्रदेशचे काही जिल्हे आणि सीमेलगतच्या काही गावातून उत्पादकांना भाज्या आणताना अडचणी निर्माण झाल्या असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्या महागच आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, परिणामी भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. भाजीपाला मुबलक प्रमाणात बाजारात येण्यास दीड महिन्यांचा कालवधी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना भाज्या पुढील दीड महिने जास्त भावातच खरेदी कराव्या लागतील. स्थानिक उत्पादकांकडून आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, पालक, चवळी भाजी आणि वांगे विक्रीस येत आहेत. किरकोळमध्ये फुलकोबी आणि सिमला मिरचीचे भाव १०० रुपये किलो होते. तर टमाटर ५० रुपये किलो या भावाने विक्री झाली. वांगे ३५ ते ४० रुपयांवर स्थिर होते.