शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

फुलकोबी शंभरीत !

By admin | Updated: July 13, 2016 03:28 IST

देशाच्या सर्वच भागात पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.

पावसामुळे भाजीपाला महाग : स्थानिकांकडून आवक कमी नागपूर : देशाच्या सर्वच भागात पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुबलक प्रमाणात येणाऱ्या भाज्यांची आवक आता कमी आहे. त्यामुळे भाव दुपटीवर गेले आहेत. नागपूर जिल्हा, मध्य प्रदेशचे काही जिल्हे आणि सीमेलगतच्या काही गावातून उत्पादकांना भाज्या आणताना अडचणी निर्माण झाल्या असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्या महागच आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, परिणामी भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. भाजीपाला मुबलक प्रमाणात बाजारात येण्यास दीड महिन्यांचा कालवधी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना भाज्या पुढील दीड महिने जास्त भावातच खरेदी कराव्या लागतील. स्थानिक उत्पादकांकडून आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, पालक, चवळी भाजी आणि वांगे विक्रीस येत आहेत. किरकोळमध्ये फुलकोबी आणि सिमला मिरचीचे भाव १०० रुपये किलो होते. तर टमाटर ५० रुपये किलो या भावाने विक्री झाली. वांगे ३५ ते ४० रुपयांवर स्थिर होते.