शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात १० तिकीट दलालांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

नागपूर : काेराेनाचा प्रभाव आता ओसरला असल्याने गेल्या काही दिवसात रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढायला लागली आहे. अशात रेल्वे तिकिटांचा ...

नागपूर : काेराेनाचा प्रभाव आता ओसरला असल्याने गेल्या काही दिवसात रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढायला लागली आहे. अशात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारेही सक्रिय झाले आहेत. अशा दलालांना लगाम घालण्यासाठी मध्ये रेल्वे, नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ६ ते ८ जुलैदरम्यान विशेष कारवाई अभियान चालविले. यामध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १० दलालांना अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूर पाेस्टसह मंडळाच्या सर्व पाेस्टमध्ये करण्यात आल्याचे आरपीएफ कमांडंट आशुताेष पांडेय यांनी सांगितले.

अटक केलेल्या दलालांकडे १२ आयडी असल्याचे समजले व त्यांच्याकडून ८७ तिकिटे जप्त करण्यात आली. यापैकी प्रवास न केलेल्या १० तिकिटांचा समावेश आहे. यासह ७७ जुन्या तिकिटा सापडल्या आहेत. या सर्व तिकिटांची किंमत १ लाख २५ हजार ३३९ रुपये आहे. या सर्व प्रकरणात ज्या संगणकाद्वारे अवैध पद्धतीने तिकीट बुक करण्यात आले, त्यांचे हार्डडिस्क आरपीएफने जप्त केले आहे. त्यांचीही तपासणी केली जात आहे. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले. काेराेना काळात गेल्या सहा महिन्यामध्ये आरपीएफने विविध कारवाईमध्ये ३९ आराेपींना अटक केली आहे. यामध्ये गांजा तस्करीच्या प्रकरणाचाही समावेश आहे. याशिवाय ज्वलनशील पदार्थांची वाहतूक व इतर तस्करीच्या प्रकरणातही १ काेटी ७० लाखांचा माल पकडण्यात आल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले.

अनाथ मुलांसाठी स्पेशल सेल

आशुताेष पांडेय यांनी सांगितले, काेराेनामुळे देशात अनेक मुले अनाथ झाली आहेत. अशा निराश अवस्थेत घर साेडून त्यांची भटकंती करण्याची शक्यता आहे किंवा पाेट भरण्यासाठी गुन्हेगारीत प्रवेश करू शकतात. रेल्वेमध्ये एखादा मुलगा अशा अवस्थेत आढळल्यास त्याची विशेष काळजी घेण्याचे आदेश आरपीएफकडे मिळाले आहेत. यासाठी नागपूर मंडळात आरपीएफने विशेष सेल तयार केला आहे. यामध्ये दोन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना अशा मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत असे प्रकरण समाेर आले नाही. मात्र मागील सहा महिन्यात आरपीएफने रेल्वेगाड्या व स्टेशन परिसरात घरून पळून आलेल्या ३२ बेवारस मुलांना असामाजिक तत्त्वांच्या तावडीतून साेडविल्याचे पांडेय यांनी सांगितले. यातील काहींना त्यांच्या पालकांकडे तर काहींना चाईल्ड लाईनकडे साेपविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.