शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मनोरुग्णांच्या जगात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:10 IST

तो अचानक उठला,  हातातली नारळाची करवंटी त्यानं  जवळून वाहणार्‍या गटारात बुचकळली आणि  ते पाणी तो घटाघटा प्यायला.  त्या एका घटनेनं आमच्या आयुष्याला कलाटणी दिली. 

ठळक मुद्देडॉ. भरत वटवानी लिखित, ‘मेनका प्रकाशना’चे ‘बेदखल’ हे पुस्तक 10 फेब्रुवारी रोजी पुण्यात प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्त.

- डॉ. भरत वटवानी

माझी पत्नी आणि मी एका रेस्तराँमध्ये बसलो होतो. रस्त्याच्या पलीकडे एक तरुण मुलगा दिसला. हाडांचा सापळाच. केस पिंजारलेले आणि एकूणच अत्यंत गलिच्छ अवस्थेत. प्रामाणिकपणे सांगायचं, तर त्याच्यासाठी काही करावं, असं आमच्या मनातही आलं नाही; पण आम्ही दोघंही मानसोपचारतज्ज्ञ. त्यामुळे तो स्किझोफ्रेनियाचा रु ग्ण आहे, हे आम्हाला कळत होतं. आम्ही आमच्या बसल्या जागेवरून त्याला पाहत असतानाच तो अचानक उठला, हातातली नारळाची करवंटी त्यानं जवळून वाहणार्‍या गटारात बुचकळली आणि ते पाणी तो घटाघटा प्यायला. त्या एका घटनेनं आमच्या आयुष्याला कलाटणी दिली. गटारातलं पाणी पिण्याच्या त्याच्या त्या कृतीचा आम्हाला एवढा धक्का बसला, की आपण काय करतो आहोत याचा शांत डोक्यानं विचारही न करता आम्ही दोघं रस्त्याच्या पलीकडे अगदी उत्स्फूर्तपणे धावलो. ‘आमच्याबरोबर येतोस का’, असं त्याला विचारलं. तो लगेच तयार झाला. अगदीच खंगलेल्या अवस्थेत असल्यानं त्याला आधार देऊन आम्ही नुकत्याच सुरू केलेल्या आमच्या खासगी रु ग्णालयात त्याला आणणं अवघड गेलं नाही.लग्नामध्ये स्मिताला भेट म्हणून मिळालेले दागिने विकून आणि आमची जागा बँकेकडे कर्जासाठी गहाण ठेवून आम्ही आमचं रु ग्णालय उभारलं होतं. आम्हाला पूर्णपणे अपरिचित असलेला, अगदी अचानक भेटलेला तो तरुण त्या रुग्णालयात दाखल होणारा स्किझोफ्रेनियाचा पहिला मनोरुग्ण. आवश्यक ते औषधोपचार करून आम्ही त्याची शुर्शूषा केली. हळूहळू तो बरा झाला. दोन आठवड्यांनंतर तो आमच्याशी इंग्रजीत बोलायला लागला, तेव्हा आम्हाला कमालीचं आश्चर्य वाटलं. तो विज्ञानाचा पदवीधर होता, असं लक्षात आलं. ‘डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी’ (‘डीएमएलटी’) ही पदविका मिळवून नोकरीच्या शोधात तो मुंबईला आला; पण नोकरी न मिळाल्यानं नैराश्याच्या गर्तेत गेला आणि मनोरुग्ण होऊन रस्त्यावर आला.संपर्कासाठी पोस्टानं पत्र पाठवायचा तो काळ. त्यामुळे त्याच्याकडून त्याच्या वडिलांचा तपशीलवार पत्ता घेऊन आम्ही त्यांना पत्र पाठवलं. गेलं वर्षभर बेपत्ता मुलाचा शोध घेता घेता ते घायकुतीला आले होते. त्यामुळे पत्र मिळाल्यावर ते तातडीनं विमानानं हैदराबादहून मुंबईला येऊन धडकले. त्यांचं त्वरित येणं हे आमच्यासाठी सुखदाश्चर्य होतं. आंध्र प्रदेशातल्या कडाप्पा जिल्हा परिषदेचे पर्यवेक्षक (सुपरिंटेण्डण्ट) या मोठय़ा जबाबदारीच्या पदावर ते काम करत होते. याचा अर्थ एवढाच, की अगदी उत्तमातली उत्तम पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलासुद्धा मानसिक आजारपण येऊ शकतं आणि त्यातून त्या व्यक्तीची अतिशय दयनीय अवस्था होऊ शकते.रस्त्यात कितीदा तरी स्वत:च्याच जगात हरवलेले, दिशाहीन फिरणारे अभागी स्री-पुरुष आपल्याला दिसत असतात. स्वत:शी बडबडणारे, मधूनच मोठय़ांदा हसणारे. डोक्यावर अस्ताव्यस्त वाढलेल्या लांब, अस्वच्छ केसांचं टोपलं, अंगावर धड कपडे नाहीत, आणि शरीर म्हणजे हाडांचा सापळाच. कचरापेटीतले अन्नकण किंवा येणार्‍या-जाणार्‍यानं त्यांच्या दिशेनं फेकलेलं स्वत:चं उरलेलं खरकटं अन्न खाऊन आणि गटाराचं पाणी पिऊन त्यांची जेमतेम गुजराण होत असते. मानवी प्रतिष्ठेचा लवलेशही त्यांच्या वाट्याला येत नाही. पण इतकं सगळं असलं, तरी तीही ‘माणसं’च आहेत ! हे जाणवल्यामुळे माझ्या पत्नीनं आणि मी 1988मध्ये ‘र्शद्धा रिहॅबिलिटेशन फाउण्डेशन’ची स्थापना केली. वर उल्लेख केलेल्या रस्तोरस्ती भटकणार्‍या निराधार, दुर्लक्षित मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी ही संस्था काम करते. (‘बेदखल’ या पुस्तकाच्या एका प्रकरणातील संक्षिप्त भाग.)