शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आपण आनंदी असण्याचा निर्णय कोण घेतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 06:05 IST

आपल्यापुढे नेहमीच दोन पर्याय असतात. आनंदी राहणे आणि नसणे. आनंदी राहणे हा पर्याय एकदा जाणीवपूर्वक निवडला की, त्यासाठी आपल्याला किती तरी कारणे सापडू लागतात...

ठळक मुद्देआपल्यापुढे नेहमीच दोन पर्याय असतात, आनंदी राहणे आणि नसणे. आनंदी राहणे हा पर्याय एकदा जाणीवपूर्वक निवडला की, त्यासाठी आपल्याला किती तरी कारणे सापडू लागतात.

- वंदना अत्रे

पोटावर झालेल्या कॅन्सरच्या एका जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर तीन-चार दिवसांनी भीष्मराज बाम आणि सुधाताई हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते. नेहमीप्रमाणे अतिशय प्रसन्न हसत त्यांनी मला विचारले, “आनंदात आहेस ना?” मी हलकेच मान डोलावली.

“आनंदात आहेस ना?” हा प्रश्न पलंगाला जखडून ठेवलेल्या आणि चार दिवस पाण्याचा एक थेंब सुद्धा बघायला न मिळालेल्या एका पेशंटला जेव्हा कोणी विचारत असेल, तेव्हा काय असू शकेल त्याची प्रतिक्रिया? उडी मारून मोठा होकार नक्कीच देता येणार नाही! जणू मनातले जाणून सर म्हणाले, “आनंद कशाचा? हा प्रश्न मला नाही, तर स्वतःला विचारून बघ. पहिला आनंद, तू असल्याचा. इतक्या जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा आयुष्यात परतली आहेस याचा. तो आनंद तुझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर तुला बघायला मिळतोय त्याचा. तुझ्यावर उपचार करणाऱ्या सर्जनला आणखी एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून मिळाला तो आनंद आणि आणखी एक लढाई लढण्याची संधी तुला मिळाली, त्याचाही....”

त्या तीन-चार दिवसात वाट्याला आलेल्या वेदनांच्या कल्लोळाचेच दुःख करीत असताना आनंदाचे हे छोटे झरे मला दिसलेच नव्हते! बाम सर त्याच्याकडे माझे लक्ष वेधत होते. तेव्हा प्रथम मनात आले, रोज सकाळी जाग आल्यावर ‘आपण आज आनंदी आहोत का?’ हा प्रश्न कधी स्वतःला विचारतच नाही मी. तुम्ही विचारता? सकाळी-सकाळी आनंदाची भावना कधी अनुभवलीय? नसेलच. कारण आपण सगळेच बहुदा रोजच सकाळी उठल्यापासून आपण दुःखी असण्याची (किंवा आनंदात नसण्याची!) कारणे शोधतच असतो. रात्री झोप नीट/पुरेशी न झाल्याचे दुःख, सकाळी लवकर उठावे लागल्याचे, कालचे बरेच काम पेंडिंग राहिल्याचे, पुन्हा दिवसाचे रहाटगाडगे सुरू झाले त्याचे, काल कोणी तरी मारलेल्या टोमण्याला उत्तर न देता आल्याचे.... थोडक्यात काय, उगवलेल्या नव्या दिवशी आनंदी न होण्याचे हजारो बहाणे आपल्याला मिळतात. रोजच..!

आपण आनंदी राहायचे की नाही, हा निर्णय आपल्या आयुष्यात कोण घेत असते? आपण सोडून सगळे! प्रत्यक्षात तो निर्णय घेण्याची जबाबदारी आपली असताना, आपण ती अशी परिस्थितीच्या किंवा कोणा तरी दुसऱ्याच माणसाच्या गळ्यात अडकवून मोकळे होतो आणि दुःखी राहू लागतो...! आता तर असे चेहरा पाडून खिन्न राहण्यासाठी किती तरी कारणे कोरोना नावाच्या संकटाने आपल्या हातात आयतीच ठेवली आहेत. या कारणांच्या मागे मोठ्या संकोचाने उभी असलेली आणखी एक गोष्ट मात्र आपल्याला दिसत नाहीये. ती आहे आपल्या सर्वांवर असलेली जबाबदारी. जे-जे म्हणून या तडाख्यातून वाचले आहेत, त्या प्रत्येकावर असलेली जबाबदारी. परिस्थितीने ती आपल्यावर टाकली आहे. आपल्या आसपास असलेल्या, जवळची माणसे गमावल्याच्या दुःखात आणि त्याचवेळी भविष्याबद्दल कमालीचे भय मनात असलेल्या लोकांना धीर देण्याची, त्यांच्या आयुष्यात छोटे-छोटे आनंद पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी. आपल्या जगण्याच्या जरा पलीकडे बघताना पावलोपावली अनेक माणसे प्रश्न घेऊन उभी असलेली आपल्याला दिसतील. त्यांच्याजागी कदाचित आपण पण असू शकलो असतो, हा विचार क्षणभर केला की, जे काही दिसते ते अनुभवले की, मग त्यांच्यासाठी करायच्या कितीतरी गोष्टी आपल्याला सुचू शकतील...! पण त्यांना जर आनंद द्यायचा असेल, तर तो आधी आपल्याकडे पाहिजे ना आणि त्यासाठी कोणत्याही कारणांची गरज नसते.

आपल्यापुढे नेहमीच दोन पर्याय असतात, आनंदी राहणे आणि नसणे. आनंदी राहणे हा पर्याय एकदा जाणीवपूर्वक निवडला की, त्यासाठी आपल्याला किती तरी कारणे सापडू लागतात. माझ्या त्या शस्त्रक्रियेनंतर मी एक सवय स्वतःला लावून घेतली. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारते, आज मी आनंदी आहे? त्याचे काय कारण आहे? आकाशात आलेले काळे ढग, बागेत उमललेले एखादे फूल, कुठून तरी कानावर येत असलेले सुब्बलक्ष्मीनी गायिलेले स्तोत्र, फिरण्याच्या मैदानातील मऊ गवताच्या स्पर्शाची आठवण... अशा अनेक गोष्टी मला आठवू लागतात. हा प्रयोग दिवसाचा चेहरामोहराच बदलून टाकणारा असतो. उद्याच हा प्रयोग करून बघा, सांगा तुमचा अनुभव...! मला ऐकायला आवडेल.

(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)

vratre@gmail.com