शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अमिताभ बच्चन जेव्हा ‘ऋणा’बद्दल बोलतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 08:00 IST

अजूनही मला कामे मिळतात, हे नशीबच!‘आता थांबा’ असे रसिक जेव्हा म्हणतील, तेव्हाच मी थांबेन!!

ठळक मुद्देसिम्बॉयोसिस अभिमत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव रंगला. अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर या महोत्सवाला उपस्थित होते. त्यांच्या दिलखुलास गप्पांचा हा संपादित अंश

- अमिताभ बच्चन

‘मी’ विशाखापटणमला गेलो असताना वृत्तपत्रात एक सुन्न करणारी बातमी वाचली. अवघ्या दहा हजार रुपयांचे कर्ज फेडता न आलेल्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे वाचून अक्षरश: हेलावून गेलो. जणू माझा भूतकाळच डोळ्यासमोर तरळला. कर्जबाजारी होणं काय असतं, तो आयुष्यातील किती कठीण काळ असतो, हे जवळून अनुभवलं आहे. त्या प्रसंगानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सावकारी पाशात अडकलेल्या 400पेक्षा अधिक शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले आणि आत्महत्येपासून परावृत्त करू शकलो याचे समाधान वाटते. कोरोनाच्या काळातही 5 हजार व्यक्तींच्या दोन वेळच्या भोजनाची सोय केली. अनेकांना विमान, बसने गावी पाठवले. माझ्यासारख्याच भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी एकत्र येऊन पडद्यामागच्या सुमारे एक लाखांना मदत केली. कुणाला मदत केल्यानंतर त्याची प्रसिद्धी करता कामा नये असं म्हणतात. ज्यात चुकीचं काहीच नाही. परंतु कलाकारांना सामान्य माणसाच्या आयुष्याशी काही देणेघेणे नसते हा समज चुकीचा आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील बहुतांश कलाकार आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत असतात. मात्र त्याची फारशी चर्चा करत नाहीत. एवढंच हे सांगण्याचा यामागील हेतू आहे. त्या व्यक्तीला न ओळखता त्याच्याविषयी मतप्रदर्शन करणं योग्य नाही.

 

इतरांप्रमाणे माझ्या आयुष्यातदेखील अनेक चढउतार आले. चित्रपटसृष्टीमध्ये येण्याआधी नोकरी मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आकाशवाणी केंद्रामध्ये निवेदकाच्या नोकरीसाठी गेलो असताना केवळ आवाजामुळे नकार ऐकावा लागला. पदवी मिळाल्यानंतरही नोकरी मिळत नसल्यामुळे खूप नैराश्यात गेलो होतो. तेव्हा बाबूजींपाशी जाऊन ‘आपने हमे पैदा क्यू किया?’ असा प्रश्न त्यांना विचारला होता. दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वाजता फिरायला जाताना त्यांनी माझ्या उशापाशी एक पत्र ठेवले. त्यात लिहिले होते ‘मेरे पास इसका जबाब नहीं है, पर ये सवाल मैने मेरे पिताजी, पिताजी ने उनके पिताजी को भी नही पूंछा होगा. पर तुम अपने बेटेको पूंछ कर पैदा करना’ त्यानंतर आयुष्यात कधीच हार मानायची नाही. हे मनाशी पक्के ठरवले. प्रत्येक कठीण गोष्टींचा धीराने सामना केला. स्वत:मध्ये सुधारणा करत राहिलो. आजही नवीन चित्रपट किंवा प्रोजेक्ट्सवर काम करताना ते यशस्वी होतील की नाही याची चिंता असतेच. पण कुणी काही बोलले तरी कायम कामावरच लक्ष केंद्रित केले. वयानुरूप मला आजही काम मिळत आहे. जेव्हा काम मिळणे बंद होईल तेव्हाचं थांबेन. जोपर्यंत काम मिळत राहील आणि रसिक थांबा म्हणणार नाहीत तोपर्यंत मी काम करतच राहीन. इतकी वर्षे उलटली तरी आजही प्रेक्षकांना ‘चित्रपट’ हे इतके प्रभावी माध्यम का वाटते, तर चित्रपटाच्या तीन तासाच्या कथेमधून विषयाला चटकन न्याय मिळतो. जे वास्तव जीवनात मिळवायला कदाचित वर्ष लोटतात. ‘पिंक’ चित्रपटातला ‘नो’ हा शब्द समाजात किती महत्त्वपूर्ण आहे. त्यामागची ताकद अनेकांना माहिती नव्हती. ती एका कथेतून कळली. ‘ब्लॅक’ चित्रपटातला शिक्षक जेव्हा दिव्यांग विद्यार्थिनीला तू हे करू शकतेस याबाबत प्रोत्साहन देतो, तेव्हा त्या मुलीच्या आयुष्यात घडलेला बदल अनेकांना नि:शब्द करून जातो. कथेतून मांडलेले हे प्रभावी विषय खूप बदल घडवून जातात. कोणतीही प्रतिमा मग ती ‘अँग्री यंग मॅन’ची का असेना समाजातूनच निर्माण होत असते. कारण सामान्य व्यक्तींच्या अन्यायाला वाचा फोडणारा असा कुणीतरी व्यक्ती हवा असतो आणि त्याला घडविण्यात दिग्दर्शकाचा वाटा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. फक्त पडद्यावर ती भूमिका अभिनेता साकारतो. त्यामुळे त्याला र्शेय मिळते. माझ्यावरदेखील रसिकांनी उदंड प्रेम केले आणि करीत आहेत. कुटुंबाचा पाठिंबा आणि रसिकांच्या प्रेमामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतकी वर्षे टिकून राहू शकलो. कोरोनाची लागण झाल्यानंतरही सर्वांनी दाखविलेला विश्वास आणि डॉक्टर व नर्सच्या उत्तम कामगिरीमुळे कोरोनातून सहीसलामत बाहेर पडलो. आज कोरोनाकाळात स्वत:ची आणि कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता हे कोरोनायोद्धे करीत असलेले काम खरंच प्रशंसनीय आहे. देवळात देव शोधू नका. तो अनुभवायचा असेल तर रुग्णालयात जा. तिथे डॉक्टर आणि परिचारिकेच्या रूपात खरे देवदूत मिळतील. त्यांचे ऋण हे न फेडता येण्यासारखेच आहेत. विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की, शिक्षकांचे आयुष्यातील स्थान हे पाठीच्या कण्यासारखे असते. ते आपल्याला आयुष्यात उभे राहायला शिकवतात. त्यामुळे त्यांचा कायम आदर करा व त्यांचे कायम ऋणी राहा. आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगात मग तो कोरोना असो किंवा अजून काही, शिक्षक हेच आपले सदैव मार्गदर्शक असतात हे विसरू नका! एखाद्या दिशेने मार्गक्रमण करताना जर प्रगती थांबली किंवा अडथळे आले तर रस्ता बदला; पण मार्गक्रमण करणे सोडू नका.

------------------------------------------------------------------------------

लोकशाहीचा पाचवा स्तंभ

काही वर्षांपूर्वी मला सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा सल्ला मिळाला. मी स्वत:चा एक छोटा ब्लॉग लिहिला. त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ट्विटर, इन्स्ट्राग्रामसारख्या मीडियाला हळूहळू आत्मसात केले. आज हीदेखील माझी एक फॅमिली झाली आहे. कुणी एकमेकांना भेटत नाही; पण लेखनातून एकमेकांचा स्वभाव जाणतो. ट्विटर, फेसबुक हे आता रूटीन झाले आहे. यापुढील काळात सोशल मीडियाला लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणायला हरकत नाही.

-शब्दांकन : नम्रता फडणीस