शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

अमिताभ बच्चन जेव्हा ‘ऋणा’बद्दल बोलतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 08:00 IST

अजूनही मला कामे मिळतात, हे नशीबच!‘आता थांबा’ असे रसिक जेव्हा म्हणतील, तेव्हाच मी थांबेन!!

ठळक मुद्देसिम्बॉयोसिस अभिमत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव रंगला. अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर या महोत्सवाला उपस्थित होते. त्यांच्या दिलखुलास गप्पांचा हा संपादित अंश

- अमिताभ बच्चन

‘मी’ विशाखापटणमला गेलो असताना वृत्तपत्रात एक सुन्न करणारी बातमी वाचली. अवघ्या दहा हजार रुपयांचे कर्ज फेडता न आलेल्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे वाचून अक्षरश: हेलावून गेलो. जणू माझा भूतकाळच डोळ्यासमोर तरळला. कर्जबाजारी होणं काय असतं, तो आयुष्यातील किती कठीण काळ असतो, हे जवळून अनुभवलं आहे. त्या प्रसंगानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सावकारी पाशात अडकलेल्या 400पेक्षा अधिक शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले आणि आत्महत्येपासून परावृत्त करू शकलो याचे समाधान वाटते. कोरोनाच्या काळातही 5 हजार व्यक्तींच्या दोन वेळच्या भोजनाची सोय केली. अनेकांना विमान, बसने गावी पाठवले. माझ्यासारख्याच भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी एकत्र येऊन पडद्यामागच्या सुमारे एक लाखांना मदत केली. कुणाला मदत केल्यानंतर त्याची प्रसिद्धी करता कामा नये असं म्हणतात. ज्यात चुकीचं काहीच नाही. परंतु कलाकारांना सामान्य माणसाच्या आयुष्याशी काही देणेघेणे नसते हा समज चुकीचा आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील बहुतांश कलाकार आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत असतात. मात्र त्याची फारशी चर्चा करत नाहीत. एवढंच हे सांगण्याचा यामागील हेतू आहे. त्या व्यक्तीला न ओळखता त्याच्याविषयी मतप्रदर्शन करणं योग्य नाही.

 

इतरांप्रमाणे माझ्या आयुष्यातदेखील अनेक चढउतार आले. चित्रपटसृष्टीमध्ये येण्याआधी नोकरी मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आकाशवाणी केंद्रामध्ये निवेदकाच्या नोकरीसाठी गेलो असताना केवळ आवाजामुळे नकार ऐकावा लागला. पदवी मिळाल्यानंतरही नोकरी मिळत नसल्यामुळे खूप नैराश्यात गेलो होतो. तेव्हा बाबूजींपाशी जाऊन ‘आपने हमे पैदा क्यू किया?’ असा प्रश्न त्यांना विचारला होता. दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वाजता फिरायला जाताना त्यांनी माझ्या उशापाशी एक पत्र ठेवले. त्यात लिहिले होते ‘मेरे पास इसका जबाब नहीं है, पर ये सवाल मैने मेरे पिताजी, पिताजी ने उनके पिताजी को भी नही पूंछा होगा. पर तुम अपने बेटेको पूंछ कर पैदा करना’ त्यानंतर आयुष्यात कधीच हार मानायची नाही. हे मनाशी पक्के ठरवले. प्रत्येक कठीण गोष्टींचा धीराने सामना केला. स्वत:मध्ये सुधारणा करत राहिलो. आजही नवीन चित्रपट किंवा प्रोजेक्ट्सवर काम करताना ते यशस्वी होतील की नाही याची चिंता असतेच. पण कुणी काही बोलले तरी कायम कामावरच लक्ष केंद्रित केले. वयानुरूप मला आजही काम मिळत आहे. जेव्हा काम मिळणे बंद होईल तेव्हाचं थांबेन. जोपर्यंत काम मिळत राहील आणि रसिक थांबा म्हणणार नाहीत तोपर्यंत मी काम करतच राहीन. इतकी वर्षे उलटली तरी आजही प्रेक्षकांना ‘चित्रपट’ हे इतके प्रभावी माध्यम का वाटते, तर चित्रपटाच्या तीन तासाच्या कथेमधून विषयाला चटकन न्याय मिळतो. जे वास्तव जीवनात मिळवायला कदाचित वर्ष लोटतात. ‘पिंक’ चित्रपटातला ‘नो’ हा शब्द समाजात किती महत्त्वपूर्ण आहे. त्यामागची ताकद अनेकांना माहिती नव्हती. ती एका कथेतून कळली. ‘ब्लॅक’ चित्रपटातला शिक्षक जेव्हा दिव्यांग विद्यार्थिनीला तू हे करू शकतेस याबाबत प्रोत्साहन देतो, तेव्हा त्या मुलीच्या आयुष्यात घडलेला बदल अनेकांना नि:शब्द करून जातो. कथेतून मांडलेले हे प्रभावी विषय खूप बदल घडवून जातात. कोणतीही प्रतिमा मग ती ‘अँग्री यंग मॅन’ची का असेना समाजातूनच निर्माण होत असते. कारण सामान्य व्यक्तींच्या अन्यायाला वाचा फोडणारा असा कुणीतरी व्यक्ती हवा असतो आणि त्याला घडविण्यात दिग्दर्शकाचा वाटा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. फक्त पडद्यावर ती भूमिका अभिनेता साकारतो. त्यामुळे त्याला र्शेय मिळते. माझ्यावरदेखील रसिकांनी उदंड प्रेम केले आणि करीत आहेत. कुटुंबाचा पाठिंबा आणि रसिकांच्या प्रेमामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतकी वर्षे टिकून राहू शकलो. कोरोनाची लागण झाल्यानंतरही सर्वांनी दाखविलेला विश्वास आणि डॉक्टर व नर्सच्या उत्तम कामगिरीमुळे कोरोनातून सहीसलामत बाहेर पडलो. आज कोरोनाकाळात स्वत:ची आणि कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता हे कोरोनायोद्धे करीत असलेले काम खरंच प्रशंसनीय आहे. देवळात देव शोधू नका. तो अनुभवायचा असेल तर रुग्णालयात जा. तिथे डॉक्टर आणि परिचारिकेच्या रूपात खरे देवदूत मिळतील. त्यांचे ऋण हे न फेडता येण्यासारखेच आहेत. विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की, शिक्षकांचे आयुष्यातील स्थान हे पाठीच्या कण्यासारखे असते. ते आपल्याला आयुष्यात उभे राहायला शिकवतात. त्यामुळे त्यांचा कायम आदर करा व त्यांचे कायम ऋणी राहा. आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगात मग तो कोरोना असो किंवा अजून काही, शिक्षक हेच आपले सदैव मार्गदर्शक असतात हे विसरू नका! एखाद्या दिशेने मार्गक्रमण करताना जर प्रगती थांबली किंवा अडथळे आले तर रस्ता बदला; पण मार्गक्रमण करणे सोडू नका.

------------------------------------------------------------------------------

लोकशाहीचा पाचवा स्तंभ

काही वर्षांपूर्वी मला सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा सल्ला मिळाला. मी स्वत:चा एक छोटा ब्लॉग लिहिला. त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ट्विटर, इन्स्ट्राग्रामसारख्या मीडियाला हळूहळू आत्मसात केले. आज हीदेखील माझी एक फॅमिली झाली आहे. कुणी एकमेकांना भेटत नाही; पण लेखनातून एकमेकांचा स्वभाव जाणतो. ट्विटर, फेसबुक हे आता रूटीन झाले आहे. यापुढील काळात सोशल मीडियाला लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणायला हरकत नाही.

-शब्दांकन : नम्रता फडणीस