शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वागत

By admin | Updated: January 28, 2017 16:27 IST

प्रत्येकाच्याच जीवनात अडचणी, कठीण प्रसंग येतात. अशावेळी आपण हतबल होतो. पण हेच प्रसंग आपल्याला बरेच काही शिकवून जातात आणि आपल्याला कणखर, सामर्थ्यवान बनवतात. त्यांचे स्वागतच करायला हवे. शिवाय हेही लक्षात ठेवायला हवे, की कोणतीही परिस्थिती कधीच कायम राहत नाही.. त्याच्याकडे स्थिर वृत्तीने पाहायला शिकायला हवे.

 श्री श्री रविशंकरमी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. आजकालच्या आधुनिक जगात बऱ्याच कुटुंबांत बेबनाव पाहायला मिळतो. कुटुंबातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. या वातावरणाला मुले वैतागतात. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या मानसिक स्थैर्यावर होतो. काही वेळेला कुटुंबाचाही आधार नसतो. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांना कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे लागते. अशावेळी विद्यार्थ्यांनी काय करावे? - ऋतुजा लांडेश्री श्री : एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे, की जीवनात सर्व काही बदलत असते. कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. सर्व काही बदलत असते ही गोष्ट एकदा मनात पक्की ठसली की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपल्याला पुढे जायला शक्ती मिळते. भोवती सगळीकडे गोंधळ चाललेला असतानाही, आपली स्वत:ची अशी स्पेस, मनाची स्थिती कायम ठेवायला एकप्रकारचे कौशल्य लागते. परिस्थितीमुळे डगमगून न जाण्याचे कौशल्य प्राप्त करण्यात ध्यानधारणेने मदत होते. बाहेर काहीही घडत असले तरी आपल्यात खोलवर एक असे स्थान आहे जिथे आपण स्थिर होऊ शकतो. सुरुवातीला परिस्थितीने आपण गांगरून जाणे शक्य आहे, पण आपण जसजसे स्वत:मध्ये स्थिर होत जाऊ तसतसे भोवतालच्या परिस्थितीपेक्षा आपण शक्तिवान बनत जातो. बाह्य गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडण्यापेक्षा आपणच परिस्थितीवर प्रभाव पाडू लागतो. काहीवेळा अशी एखादी समस्या येते, ज्यामुळे आपले हातपाय गळून जातात आणि ती समस्या आपल्याला खूप मोठी वाटू लागते. पण प्राणायाम आणि ध्यान या अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे आपल्याला शक्ती मिळते. सर्जनशीलता आणि उत्साह याद्वारे आपण त्यातून मार्ग काढू शकतो. त्यामुळे यदाकदाचित काही बिकट, कठीण प्रसंग आपल्यावर आलेच, तरी काही झाले तरी आपली ऊर्जा उच्च ठेवा. असे कठीण प्रसंग आपल्याला जीवनात सामर्थ्यवान बनवण्यासाठी आणि आपला विकास करण्यासाठी येतील. अशावेळीच आपल्यातील सूक्ष्म गुण फुलून येतात आणि आपले कौशल्य विकसित होते. आपले सर्वस्व पणाला लावून अशा विश्वासाने पुढे जा की तुमच्या बाबतीत सर्व उत्तम तेच होईल. गुरुजींशी संवाद-संधीबदलते जग नवे पर्याय देणारे, नवी उत्तरे शोधणारे, अकल्पित अशा शक्यता वास्तवात उतरवण्याची शक्ती धारण करणारे आहे; तसेच ते मनाला कुरतडणाऱ्या नवनव्या प्रश्नांचेही जंगल बनते आहे. असे अंधारे, अगम्य, गूढ अरण्य; की बाहेर पडण्याची वाट दिसू नये, काही फटच सापडू नये. गर्दीतला एकटेपणा, तुटल्या नात्यांचे व्रण, धावत्या पायांना पडलेला वेगाचा फास, न शमणारा मनातला कोलाहल असे कित्येक डंख प्रत्येकालाच डाचत असतात. अशा संभ्रमित प्रश्नांना उत्तरांची दिशा सुचवणारे हे सदर! आर्ट आॅफ लिव्हिंग या जगन्मान्य विचार-आचार प्रणालीचे गुरू श्री श्री रविशंकर या सदरातून वाचकांच्या प्रश्नांच्या आधाराने त्यांचे चिंतन मांडत आहेत. फक्त एवढंच, की तुमचे प्रश्न अति-व्यक्तिगत स्वरूपाचे नसावेत. व्यक्तिगत अडी-अडचणींपेक्षा आधुनिक जगण्यातले पेच मांडणाऱ्या निवडक प्रश्नांना गुरुजींनी दिलेली उत्तरे या सदरातून प्रसिद्ध होतील. प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता :srisri.lokmat@gmail.com