शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सिक्कीमच्या राजभवनात..

By admin | Updated: July 1, 2016 17:58 IST

श्रीनिवास पाटील यांनी राज्यपाल म्हणून सिक्कीमच्या सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे. त्यांच्यासोबतचा एक दिवस..

सुरेश भटेवरा
(लेखक ‘लोकमत’चे राजकीय संपादक आहेत.)
 
श्रीनिवास पाटील यांनी राज्यपाल म्हणून सिक्कीमच्या सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे. त्यांच्यासोबतचा एक दिवस..
 
सिक्कीमची राजधानी गंगटोक. या परिसरात हिंडताना तुम्ही महाराष्ट्रातले आहात असे कोणत्याही टॅक्सीचालकाला जाणवले तर एक प्रश्न हमखास तो तुम्हाला विचारील. गव्हर्नर साहबसे मिले या नही? अगर नही मिले तो जरूर मिलिएगा। बडे अच्छे आदमी है। सब से मिलते है। सिक्कीम को पहली बार पब्लिक का गव्हर्नर मिला है। 
सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र श्रीनिवास पाटील. सलग दहा वर्षे लोकसभेत क-हाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर पाटीलसाहेबांनी 13 जुलै 2013 रोजी सिक्कीमच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. या घटनेला तीन वर्षे उलटून गेली. तेव्हापासून महाराष्ट्रातला कोणीही सामान्य पर्यटक गंगटोकला गेला तर त्याच्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे, सिक्कीमच्या राज्यपालांचे राजभवन..! 
गंगटोकच्या पॉइंट झिरोजवळ आहे राजभवनाचे प्रवेशद्वार. इथले सुरक्षारक्षक अदबीने तुमचे स्वागत करतात. त्यानंतर 180 फूट उंचीर्पयत नेणारा गोलाकार उंच चढत जाणारा रस्ता पार केला की चौतर्फा घनदाट वृक्षराजीच्या कोंदणात दडलेल्या राजभवनाच्या अनुपम दुमजली वास्तूचे दर्शन घडते. किती तरी वेळ त्या वास्तूकडे, सहसा न पाहिलेल्या सभोवतालच्या रंगीबेरंगी पहाडी फुलांकडे, मुक्तपणो विहरणा-या पक्ष्यांच्या थव्यांकडे, फुला- पानांभोवती विहरणा-या लक्ष वेधणा-या किटकांकडे पाहत राहावेसे वाटते. 
राजभवनाच्या दुस-या मजल्यावर सकाळचा चहा पिण्यासाठी एक प्रशस्त दालन आहे. इतिहासकाळापासून या दालनाला ‘सोलजा खांग’ संबोधले जाते. वातावरणात ढगांचे आच्छादन नसले तर हिमालयातील कांचनजंगाच्या हिमाच्छादित शिखराचे लावण्य सोलजा खांगमधून सहज न्याहाळता येते. करडय़ा शिस्तीत वाढलेले राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची सकाळ सोलजा खांगमधे चहाचा आस्वाद घेत पहाटे 6.30 वाजता सुरू होते. राज्यपाल या नात्याने सार्वजनिक जीवनात राबवता येणा-या अनेक कल्पक कल्पना त्यांना इथेच सुचतात. मग दिवसभराच्या लोकसंपर्कासह त्यांचा दिनक्रम सुरू.
राज्यपाल पाटलांनी सिक्कीमचे लोकाभिमुख क्रियाशील राज्यपाल म्हणून तीन वर्षात लौकिक संपादन केला आहे. सिक्कीम हे भारतातले 100 टक्के जैविक शेती करणारे पहिले राज्य. इथल्या मूळ वनस्पतींचे व फुलांचे जतन करण्यासाठी 2003 पासून या प्रयोगाला प्रारंभ झाला. अलीकडेच सिक्कीम सरकारने राज्यात जैविक शेती सक्तीची करण्यासाठी कायदा करण्याचे ठरवले. या कायद्यानुसार राज्याबाहेरून एक किलोदेखील खत, बियाणो अथवा रसायने आणायची परवानगी नाही. बाहेरच्या कोंबडय़ा, पशुखाद्य आणायला अर्थातच बंदी आहे. इथल्या गायीच्या दुधाचे चीज जगात पहिल्या क्रमांकाचे आहे. सिक्कीमला हे वैभव प्राप्त करून देणा:या कायद्याचा वटहुकूम राज्यपाल पाटील यांच्या स्वाक्षरीने बजावला गेला. सिक्कीमच्या राजभवनात नुकताच दिवसभराच्या वास्तव्याचा आणि राजभवनाच्या पाहुणचाराचा योग आला. यावेळी दोन तासांच्या गप्पांमध्ये महाराष्ट्राच्या मातीत वाढलेले पाटील सिक्कीमच्या जैविक शेतीबद्दल अतिशय भरभरून बोलत होते.
राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय वर्षातले 293 दिवस राज्यपालाला राज्याबाहेर जाता येत नाही.  मुख्यमंत्री पवन चामलिंग यांचे सरकार राज्यात स्थिर असल्यामुळे राज्यपाल या नात्याने पाटील यांना सरकारच्या कामकाजात विशेष हस्तक्षेप करण्याची वेळ कधी येत नाही. निसर्गात आणि पानाफुलात रमलेल्या पाटील यांनी या संधीचा वापर राज्यात अनेक सकारात्मक उपक्रमात सहभागी होण्यासाठी केला आहे. 
इतिहासाची पाने चाळली तर महाराष्ट्र आणि सिक्कीमचे ह्रणानुबंध साता:याच्या तीन महत्त्वाच्या व्यक्तींमुळे जोडले गेले. 16 मे 1975 साली सिक्कीम हे 22 वे राज्य म्हणून भारताच्या नकाशाला जोडले गेले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते यशवंतराव चव्हाण. त्यांच्याच प्रस्तावानुसार अविभाज्य भारतात सिक्कीमचा समावेश झाला. सातारच्या अप्पासाहेब पंतांकडे पंडित नेहरूंनी त्यापूर्वी सिक्कीमच्या पोलिटिकल ऑफिसरची जबाबदारी सोपवली होती. याखेरीज सिक्कीमचे दुसरे राज्यपाल महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री होमी जे. एच. तल्यारखान होते आणि आता सातारचे श्रीनिवास पाटील इथले 15 वे राज्यपाल आहेत. सिक्कीमच्या 70 कलाकारांच्या पथकाचे विविध कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत घडवून पाटीलसाहेबांनी दोन राज्यांच्या सांस्कृतिक संबंधांचा नवा पूल जोडला आहे. गंगटोकमध्ये गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय योग दिन व अन्य सार्वजनिक कार्यक्रमांतही पाटीलसाहेबांचा सक्रिय सहभाग असतो. दिव्यांगांसाठी काम करणा:या एका संस्थेला मदत करण्यात राज्यपालांचा विशेष पुढाकार असतो.  सिक्कीममधील विद्यापीठातल्या तरुणांशी, कलाकारांशी, नृत्य पथकांशी संपर्काची आणि हितगुज करण्याची एकही संधी पाटील सोडत नाहीत. 
याखेरीज महाराष्ट्रातून सिक्कीमला पर्यटनासाठी आलेल्या अभ्यागतांची सरबराई आपणहून राज्यपाल पाटलांनी स्वीकारली आहे. भारत-चीन सीमेवरील नथुला पासला जाण्यासाठी पर्यटकांना पास मिळवून देणो, ज्यांची निवासाची सोय नसेल त्यांची शक्य असल्यास राजभवनाच्या विश्रामगृहात अथवा अन्य ठिकाणी सोय करून देणे, अडल्या- नडल्यांची रेल्वे प्रवासाची आरक्षणोदेखील राजभवनाचे कर्मचारी करून देतात. 
सिक्कीममध्ये आजवरच्या राज्यपालांचा लोकसंपर्काविषयी फारसा लौकिक नव्हता. राज्यपाल पाटलांनी मात्र या पदाचा बडेजाव बाजूला ठेवून सिक्कीमच्या राजभवनाच्या निसर्गरम्य वास्तूची दारे सामान्य जनतेसाठी खुली केली आहेत. सिक्कीमच्या राजभवनाशी संपर्क साधून आपल्या आगमनाची फक्त पूर्वकल्पना तेवढी द्यावी लागेल. तुमचे नशीब जोरदार असेल तर बाकी सारे काही पाटीलसाहेब पाहून घेतील.
देखण्या वास्तूचे वैभव
1890 साली बांधलेल्या या राजभवनाला पूर्वी रेसिडेन्सी म्हणत. ब्रिटिश सरकारचे पोलिटिकल ऑफिसर सर जॉन क्लॉड व्हाईट या वास्तूचे पहिले मानकरी. त्यानंतर 1975 साली सिक्कीम अधिकृतरीत्या भारतात विलीन होईर्पयत अनेक पोलिटिकल ऑफिसर्सचे वास्तव्य या राजनिवासात होते. 
14 फेब्रुवारी 2006 रोजी सिक्कीमला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. राजभवनही त्यातून सुटले नाही. वास्तूच्या आत बरीच पडझड झाली. दगडी भिंतींना जागोजागी तडे गेले.  त्यानंतर सलग तीन र्वष ही ऐतिहासिक वास्तू भूतकाळातल्या आठवणीत बंद अवस्थेत पडून होती. सिक्कीम सरकारने या काळात या वास्तूपासून 100 मीटर अंतरावर राजभवनाची नवी वास्तू बांधली. ही वास्तू आधुनिक असली, तरी जुन्या इमारतीच्या देखण्या रूपाची सर मात्र त्याला नाही. अखेर तत्कालीन राज्यपाल, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रलयाने या वास्तूचा जीर्णोद्धार करून त्याला पुनरुज्जीवन देण्याचे ठरवले. या हेरिटेज वास्तूच्या पुनरुज्जीवनासाठी पटियालाच्या थापर विद्यापीठातील प्रा. अभिजित मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या टीमची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 100 कारागिरांनी दिवसातले 18-18 तास  खपून या इमारतीचा अंतर्बाह्य कायाकल्प घडवला. तिचे जुने देखणो रूप बदलणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. डिसेंबर 2009 पासून ही इमारत पुन्हा एकदा राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान बनले.