शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

झोळी दुबळीच..

By admin | Updated: August 12, 2016 18:35 IST

सावित्री नदीला आलेल्या पुरात महाडचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला. पाण्यात पडलेल्या वाहनांचा शोध तर अजूनही सुरू आहे.

 - अभिजित घोरपडे

सावित्री नदीला आलेल्या पुरात महाडचा ब्रिटिशकालीन पूल कोसळला.पाण्यात पडलेल्या वाहनांचा शोध तर अजूनही सुरू आहे.का कोसळला हा पूल? त्याला जबाबदार कोण?यंत्रणेतील त्रुटी, बेफिकिरी की निसर्ग? एक नक्की,‘यंत्रणेतील त्रुटी म्हणजे माणूस’ आणि ‘निसर्ग म्हणजे पाऊस’ यांच्यापैकीच कोणावर तरी ही जबाबदारी टाकावी लागेल. अनेकांनी ही जबाबदारी निसर्गावर ढकलण्याचा प्रयत्न केला.पण त्यात तथ्य किती?वित्री नदीला आलेला पूर आणि महाडजवळ कोसळलेला ब्रिटिशकालीन पूल.. या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्यानिमित्तानं अनेक त्रुटी, चुका तर नव्यानं समोर आल्याच, पण जुने प्रश्नही नव्यानं उफाळून वर आले. या दुर्दैवी घटनेला नेमकं जबाबदार कोण?यंत्रणेतील त्रुटी, बेफिकिरी की निसर्ग? याविषयीची चर्चा आणि वादविवादही चांगलेच रंगले आहेत.यातला सर्वात (बे)जबाबदार घटक कोणता?‘यंत्रणेतील त्रुटी म्हणजेच माणूस’ आणि ‘निसर्ग म्हणजे पाऊस’ यांच्यापैकी कोणावर तरी ही जबाबदारी टाकावी लागेल. अनेकांनी ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसावर टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तथ्य किती?जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महाबळेश्वरमध्ये ‘त्या’ दोन दिवसांत (४८ तासांत) ८०० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे पूल पडल्याचे सांगितले गेले. तिथे दोन दिवसांत ८०० मिलिमीटर पाऊस पडला, हे वास्तवच आहे. पण महाबळेश्वरला दोन दिवसांत इतका पाऊस पडणे ही अपवादात्मक घटना नाही. महाबळेश्वर येथे ११ आॅगस्ट २००८ या दिवशी २४ तासांत ४९१ मिलिमीटर इतकी उच्चांकी नोंद झाली आहे. आणि असा सलग दोन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहणे हेही या ठिकाणासाठी नवे नाही. महाडजवळील पूल २ आॅगस्टच्या मध्यरात्री केव्हातरी पडला. आणि ८०० मिलिमीटर पावसाची नोंद आहे ती ३ आॅगस्टच्या सकाळी ८.३० पर्यंतची. म्हणजे मध्यरात्रीनंतर आठेक तास पडलेल्या पावसाचा पूल कोसळण्याशी संबंध नाही. तो पावसाचा आकडा ८०० मधून वजा करावा लागेल. याचा अर्थ सलग सहाशे-सातशे मिलिमीटरच्या पावसामुळे पूल पडत असेल, तर महाबळेश्वरात उगम पावणाऱ्या नद्यांवरील सर्वच पूल पडायला हवेत. असा बादरायण संबंध आपल्याला कसा लावता येईल?..