शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

ताम्रपटाच्या निमित्ताने

By admin | Updated: September 6, 2014 15:12 IST

तब्बल १३७४ वर्षांपूर्वीचा, गुजरातमधील मैत्रक वंशाचा राजा द्वितीय ध्रुवसेन याचा एक ताम्रपट काही दिवसांपूर्वी पुण्यात आढळला. भांडारकर संशोधन संस्थेतील जाणकारांनी तो स्वच्छ केला आणि तो ताम्रपट चक्क इतिहास बोलू लागला..

 श्रीनंद बापट

 
 
 
जरातमधल्या अहमदाबाद जिल्ह्यातील राधू या ठिकाणाच्या जवळ असणारे देवपरा नावाचे खेडे इसवी सन ६४0मध्ये एप्रिल महिन्याच्या ६ तारखेला दान करण्यात आले होते. यजुर्वेदाच्या मैत्रायणी नावाच्या शाखेतील वाराह सूत्राच्या नागशर्मा आणि भद्रशर्मा यांना हे दान देण्यात आलेले होते. या गावाचे महसुली उत्पन्न घेऊन त्यातून त्यांनी वेदपाठशाळा चालवावी, अशी अपेक्षा त्यामागे होती. अशी पाठशाळा चालवण्याकरिता ते मध्य प्रदेशातील मंदसौर येथून येऊन गुजरातमधील खेडा येथे वसले होते. ही सगळी माहिती सांगणारा एक ताम्रपट नुकताच अमित लोमटे आणि अमित खिंवसरा यांच्या संग्रहात उपलब्ध झाला. 
या ताम्रपटाला दोन पत्रे आहेत. ते ३0 सेमी लांब आणि २३.७ सेमी रुंद अशा मापाचे आहेत. ते एकत्र ठेवण्याकरिता पत्र्यांना दोन दोन छिद्रे पाडून त्यात कड्या घातलेल्या आहेत. मजेची गोष्ट म्हणजे या दोन छिद्रांपैकी एक पूर्वीच फाटलेले आहे आणि ते पुन्हा सांधून त्यात तांब्याची नवीन कडी अडकवलेली आहे. तर दुसरे छिद्र आणि त्यातील ब्राँझची कडी मात्र शाबूत आहे. हा ताम्रपट २ किलो ७0७ ग्रॅम इतक्या वजनाचा आहे. भांडारकर संस्थेकडे हा ताम्रपट आला तोच मुळी त्याच्या स्वच्छतेकरिता. तांब्याच्या गंजाने तो अगदी हिरवा पडलेला होता- वाचता येणे शक्यच नव्हते. ताम्रपटाची आणखी हानी होणार नाही, अशा बेताने विविध रसायने वापरून त्यावरचा गंज काढण्यात आला. कोणतीही संहत (उल्लूील्ल३१ं३ी)ि रसायने या कामी उपयोगाची नव्हती. काढून टाकलेल्या गंजाचे वजन तब्बल ३२ ग्रॅम इतके भरले. विविध रासायनिक प्रक्रिया चार-पाच वेळा केल्यावर ताम्रपट स्वच्छ झाला आणि ‘बोलू लागला’.
या ताम्रपटाची भाषा संस्कृत असून, १३00 वर्षांपूर्वी प्रचलित असलेली कीलकशीर्षक ब्राrी (ठं्र’-ँींीि िइ१ंँ्रे) ही त्याची लिपी आहे. ताम्रपटात एकूण ४६ ओळींचा मजकूर असून, तो दोन्ही पत्र्यांवर २३ ओळी असा सारखा विभागलेला आहे असे दिसून आले. सुरुवातीला ‘स्वस्ति’ आणि ‘वलभीत:’ (म्हणजे ‘कल्याण असो’ आणि ‘हा ताम्रपट राजधानी वलभी येथून देण्यात येत आहे,’) असा मजकूर आहे. त्यानंतर राजा द्वितीय ध्रुवसेन याच्या पूर्वजांची स्तुती करणारा आणि ध्रुवसेनाचा स्वत:चा परिचय देणारा मोठा मजकूर आहे. त्यानंतर दान घेणार्‍या व्यक्तींचे आणि दान दिल्या जाणार्‍या गावाचे वर्णन येते. ‘खेटकाहार विषयातील राधानक पथकातील देवापाढक हे गाव’ म्हणजे त्या वेळच्या खेडा जिल्ह्यातील राधानक तालुक्यातील देवापाढक हे गाव दान म्हणून दिल्याचा उल्लेख त्यात आहे. यापुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावाकडून गोळा करण्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या करांची आणि घेतल्या जाणार्‍या सेवांची माहिती येते. शेतकरी (शेताचे मालक) आणि शेतमजूर यांच्यावर वेगवेगळा कर बसवल्याचे त्यात दिसते. त्याचबरोबर पाळीव जनावरांवरचा कर आणि प्रवेशकर किंवा जकात यांचा उल्लेख येतो. हे उत्पन्न आता दान घेणार्‍या व्यक्तींना मिळावयाचे असे. (गवत, चामडे, लाकूड, कोळसा, दूध, फुले, फळे, धान्य, मीठ आणि इतर क्षार, मद्यार्क अशा इतर अनेक वस्तू गावातून कर म्हणून गोळा करण्याचा हक्क राजाला होता, असे इतर काही राजघराण्यांच्या दानलेखांमधून दिसून येते.) दान दिलेल्या गावातील पडीत जमीन नव्याने लागवडीखाली आणण्याचा हक्क दान घेणार्‍या व्यक्तीला होता. तसेच काही अनुचित प्रकार घडल्याशिवाय राजाचे अधिकारी आणि सैनिक यांना गावात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आलेली होती. गावाची स्वायत्तता जपण्याचा असा प्रयत्न त्या वेळचे सर्वच राजे दक्षतेने करीत असत, असे दिसते. अशा प्रकारच्या दानलेखांच्या शेवटाकडे एक मोठा हृदयंगम मजकूर असतो. आपण काही राज्याचा अमरपट्टा घेऊन आलेलो नाही, याची जाणीव प्रत्येक राजाला आणि राजघराण्याला असे. त्यामुळे आपले राज्य गेल्यावर येणार्‍या राजवटींनी हे दान असेच शाबूत ठेवावे, अशी विनंती केलेली असे. ते शाबूत ठेवले तर त्या राजाला आमच्यापेक्षाही जास्त पुण्य मिळेल, असे आमिषही दाखवलेले असे. त्याचबरोबर जमीन दान देणारा मनुष्य साठ हजार वर्षे स्वर्गात राहतो, तर ते काढून घेणार्‍याला मात्र तितकीच वर्षे नरकात खितपत पडावे लागते, अशी भीतीही घातलेली असे.
सर्वसामान्यपणे सर्वांत शेवटी येतो तो हा ताम्रपट देण्याच्या कामी मध्यस्थी करणार्‍या वजनदार व्यक्तीचा आणि ताम्रपटाचा मजकूर तयार करणार्‍याचा उल्लेख आणि ताम्रपटाची तिथी. हा मजकूर ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असतो. राजाचा पुतण्या राजपुत्र खरग्रह हा आताच्या दानातील मध्यस्थ आहे, तर राज्याच्या अभिलेख विभागाचा प्रमुख स्कंदभट याने दानलेखाचा मजकूर तयार केलेला आहे, असे दिसते. 
ताम्रपटाची तिथी ‘संवत् ३२0, वैशाख शुद्ध १0’ अशी दिलेली आहे. भारतात अनेक प्रकारच्या कालगणना वापरात होत्या-आजही आहेत. एखाद्या लेखात कोणती कालगणना वापरात आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते. मैत्रक वंशाचे राजे ‘गुप्त-वलभी संवत्’ वापरत असत. ही कालगणना इ. स. ३२0 मध्ये चैत्री पाडव्याला सुरू झाली असे मानले जाते. त्यामुळे या ताम्रपटाचे वर्ष इ.स. ६४0 हे ठरते. तर वैशाख शुद्ध दशमी ही तिथी गुरुवार दिनांक ६ एप्रिल इ. स. ६४0 या तारखेशी जुळते. दान देणार्‍या राजाच्या कारकिर्दीशीही ही तारीख व्यवस्थित जुळते. स्वच्छता आणि वाचन कोणताही मोबदला न घेता करून आता हा ताम्रपट त्याच्या मालकांना परत देण्यात आलेला आहे. त्याचा मजकूर प्रसिद्ध करण्यास त्यांनी परवानगी दिलेली आहे.
अभिलेख स्वच्छ करणे, त्याची भाषा आणि लिपी ओळखणे, तो वाचणे, मजकुराचे भाषांतर करणे, त्यात दिलेले ऐतिहासिक आणि भौगोलिक तपशील तपासणे, त्याची तारीख शोधून काढणे, असे या प्रकारच्या शोधाचे टप्पे पडतात. ते टप्पे विविध अडचणींवर मात करीत कसोशीने पार पाडले तर ‘देशाच्या इतिहासात एका ओळीची का होईना भर घातली’ या जाणिवेने होणारा आनंद आगळाच असतो.
(लेखक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे प्रभारी अभिरक्षक आहेत.)