शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

भगवान गोपालकृष्ण

By admin | Updated: May 24, 2014 13:35 IST

भगवंतांच्या लीलाचरित्रामध्ये तत्त्वज्ञान, योग्यांकरिता समाधान, सज्जनांचा सांभाळ, दुर्जनांचा संहार, भक्तांना दिलासा आहे. तसेच जीवनाकडे पाहण्याची प्रेममय, मधुर दृष्टी आहे.

- आत्मदीप

- स्वामी मकरंदनाथ

श्री. एकनाथमहाराजांचा अभंग आहे, 

‘मुरली मनोहर रे माधव। 
मुरली मनोहर रे।। 
श्रीवत्सलांछन हृदयविलासन। 
दीनदयाघन रे।।१।।
सुरवर किन्नर नारद तुंबर। 
गाती निरंतर रे ।।२।।
एका जनार्दनी त्रिभुवन मोहन। 
राखीत गोधनु रे।।३।।
माधव मुरली मनोहर रे।।’
हा अभंग ऐकल्यानंतर तीव्रतेने गोपालकृष्णांची आठवण होते. त्यांचे मनोहर लीलाचरित्र डोळ्यांसमोर येते. नाथ म्हणतात, ‘हे माधवा, तुझी मुरली अत्यंत मनोहर आहे. तिचे स्वर ऐकले, की मन नाहीसे होऊन जाते आणि मन नाहीसे झाल्यावरच खरा आनंद होतो.’ भगवंतांच्या लीलाचरित्रामध्ये तत्त्वज्ञान आहे, योग्यांकरिता समाधान आहे, सज्जनांचा सांभाळ आहे, दुर्जनांचा संहार आहे, भक्तांना दिलासा आहे. या सर्व गोष्टींबरोबरच एक विलक्षण गोष्ट आहे, ती म्हणजे जीवनाकडे पाहण्याची एक मधुर, प्रेममय दृष्टी; जी दृष्टी प्रत्येकाच्या अंत:करणात जणू सुरेल संगीत निर्माण करते, हास्याची लकेर निर्माण करते.
भगवंतांच्या हातातील मुरलीने तर त्रिभुवनाला भुरळ पाडली. मुरली ही भगवंतांच्या वैभवाची खूण झाली. भगवंतांच्या शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या रूपाने जितके भक्तगण आकृष्ट झाले, त्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक भक्त त्यांच्या मुरलीधारी रूपाने आकृष्ट झाले. आपल्या जीवनाचे संगीत सुरेल करून घेतले पाहिजे, असेच ही मुरली सुचविते. बासरी हे असे वाद्य आहे, की ते संपूर्ण पोकळ, रिकामे असावे लागते. रिकामे असेल तरच त्यातून स्वर येतात. भगवंतांची मुरली आपल्याला असेच सांगते, की आपले मन सर्व विकारांपासून मोकळे असावे. बासरीचा स्वर अतिगोड आणि मोहवून टाकणारा असतो. अत्यंत मोकळ्या श्‍वासातून, मोकळ्या मनातून भगवंतांची बासरी वाजविली गेली. बासरी वाजविणाराही अतिशय नि:संग होता, मोकळा होता, अगदी त्याच्या बासरीसारखाच! तेथे कोणत्याही विकाराचा, कामनेचा स्पर्श नव्हता.
असे वाटते, आज जर भगवंत परत अवतरले, तर कदाचित ते पुन्हा भगवद्गीता सांगणार नाहीत, उद्धवाला उपदेश करणार नाहीत, पांडवांसाठी शिष्टाई करणार नाहीत; पण एक गोष्ट मात्र ते नक्की करतील, ती म्हणजे ते गोकुळात जातील. आपल्या भोवती गोपगोपींना जमवतील आणि आपली मधुर बासरी वाजवतील. सर्वांना मोहवून टाकतील. आपल्या सवंगड्यांबरोबर क्रीडा करतील. त्यांच्या डोक्यावर मुकुट नसेल, तर त्यांनी आपल्या कुरळ्या केसांना शेल्याने बांधून त्यावर मोरपीस खोचलेले असेल. गाईगुरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत ते त्यांना चरायला डोंगरात घेऊन जातील. ते सर्वांना प्रेम देतील, सर्वांवर प्रेम करतील. त्या प्रेमाला कोणत्याही कामनेचा स्पर्श नसेल. ते आपल्या भक्तांकडे आवर्जून जातील, विदुराकडील साधे, रुचकर भोजन ग्रहण करतील. सुदाम्याची आठवण त्यांना नक्की असेल. या जीवनात आपल्या अलौकिकतेचा आणि अमानवी शक्तीचा प्रत्यय ते कदाचित पुन्हा देणार नाहीत; पण प्रत्येकाला प्रेमाची शिकवण जरूर देतील.
मला तर वाटते, की अशा भगवंतांना आपण पाहिले आहे, आपल्या सद्गुरूंच्या रूपात. एवढेच नव्हे, तर त्यांच्या प्रेमाच्या राज्यात आपल्याला स्थान मिळालेले आहे. त्यांच्या रूपाचे नावदेखील माधवच होते. त्यांच्या रूपाने सर्व जीवन बासरीसारखे संगीत फुलवणारे कसे असते ते आपण अनुभवले आहे. आपल्या भाग्याला सीमा नाही.
(लेखक पुणेस्थित असून, नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)