शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भगवान गोपालकृष्ण

By admin | Updated: May 24, 2014 13:35 IST

भगवंतांच्या लीलाचरित्रामध्ये तत्त्वज्ञान, योग्यांकरिता समाधान, सज्जनांचा सांभाळ, दुर्जनांचा संहार, भक्तांना दिलासा आहे. तसेच जीवनाकडे पाहण्याची प्रेममय, मधुर दृष्टी आहे.

- आत्मदीप

- स्वामी मकरंदनाथ

श्री. एकनाथमहाराजांचा अभंग आहे, 

‘मुरली मनोहर रे माधव। 
मुरली मनोहर रे।। 
श्रीवत्सलांछन हृदयविलासन। 
दीनदयाघन रे।।१।।
सुरवर किन्नर नारद तुंबर। 
गाती निरंतर रे ।।२।।
एका जनार्दनी त्रिभुवन मोहन। 
राखीत गोधनु रे।।३।।
माधव मुरली मनोहर रे।।’
हा अभंग ऐकल्यानंतर तीव्रतेने गोपालकृष्णांची आठवण होते. त्यांचे मनोहर लीलाचरित्र डोळ्यांसमोर येते. नाथ म्हणतात, ‘हे माधवा, तुझी मुरली अत्यंत मनोहर आहे. तिचे स्वर ऐकले, की मन नाहीसे होऊन जाते आणि मन नाहीसे झाल्यावरच खरा आनंद होतो.’ भगवंतांच्या लीलाचरित्रामध्ये तत्त्वज्ञान आहे, योग्यांकरिता समाधान आहे, सज्जनांचा सांभाळ आहे, दुर्जनांचा संहार आहे, भक्तांना दिलासा आहे. या सर्व गोष्टींबरोबरच एक विलक्षण गोष्ट आहे, ती म्हणजे जीवनाकडे पाहण्याची एक मधुर, प्रेममय दृष्टी; जी दृष्टी प्रत्येकाच्या अंत:करणात जणू सुरेल संगीत निर्माण करते, हास्याची लकेर निर्माण करते.
भगवंतांच्या हातातील मुरलीने तर त्रिभुवनाला भुरळ पाडली. मुरली ही भगवंतांच्या वैभवाची खूण झाली. भगवंतांच्या शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या रूपाने जितके भक्तगण आकृष्ट झाले, त्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक भक्त त्यांच्या मुरलीधारी रूपाने आकृष्ट झाले. आपल्या जीवनाचे संगीत सुरेल करून घेतले पाहिजे, असेच ही मुरली सुचविते. बासरी हे असे वाद्य आहे, की ते संपूर्ण पोकळ, रिकामे असावे लागते. रिकामे असेल तरच त्यातून स्वर येतात. भगवंतांची मुरली आपल्याला असेच सांगते, की आपले मन सर्व विकारांपासून मोकळे असावे. बासरीचा स्वर अतिगोड आणि मोहवून टाकणारा असतो. अत्यंत मोकळ्या श्‍वासातून, मोकळ्या मनातून भगवंतांची बासरी वाजविली गेली. बासरी वाजविणाराही अतिशय नि:संग होता, मोकळा होता, अगदी त्याच्या बासरीसारखाच! तेथे कोणत्याही विकाराचा, कामनेचा स्पर्श नव्हता.
असे वाटते, आज जर भगवंत परत अवतरले, तर कदाचित ते पुन्हा भगवद्गीता सांगणार नाहीत, उद्धवाला उपदेश करणार नाहीत, पांडवांसाठी शिष्टाई करणार नाहीत; पण एक गोष्ट मात्र ते नक्की करतील, ती म्हणजे ते गोकुळात जातील. आपल्या भोवती गोपगोपींना जमवतील आणि आपली मधुर बासरी वाजवतील. सर्वांना मोहवून टाकतील. आपल्या सवंगड्यांबरोबर क्रीडा करतील. त्यांच्या डोक्यावर मुकुट नसेल, तर त्यांनी आपल्या कुरळ्या केसांना शेल्याने बांधून त्यावर मोरपीस खोचलेले असेल. गाईगुरांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत ते त्यांना चरायला डोंगरात घेऊन जातील. ते सर्वांना प्रेम देतील, सर्वांवर प्रेम करतील. त्या प्रेमाला कोणत्याही कामनेचा स्पर्श नसेल. ते आपल्या भक्तांकडे आवर्जून जातील, विदुराकडील साधे, रुचकर भोजन ग्रहण करतील. सुदाम्याची आठवण त्यांना नक्की असेल. या जीवनात आपल्या अलौकिकतेचा आणि अमानवी शक्तीचा प्रत्यय ते कदाचित पुन्हा देणार नाहीत; पण प्रत्येकाला प्रेमाची शिकवण जरूर देतील.
मला तर वाटते, की अशा भगवंतांना आपण पाहिले आहे, आपल्या सद्गुरूंच्या रूपात. एवढेच नव्हे, तर त्यांच्या प्रेमाच्या राज्यात आपल्याला स्थान मिळालेले आहे. त्यांच्या रूपाचे नावदेखील माधवच होते. त्यांच्या रूपाने सर्व जीवन बासरीसारखे संगीत फुलवणारे कसे असते ते आपण अनुभवले आहे. आपल्या भाग्याला सीमा नाही.
(लेखक पुणेस्थित असून, नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)