शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

शेवटचा दिसं गोड व्हावा

By admin | Updated: December 27, 2014 19:25 IST

सदर लेखनातील हा शेवटचा लेख. वाचकांचा कृतज्ञतापूर्वक निरोप घेण्याचा, वाचकांना धन्यवाद देण्याचा आणि त्यांचे आभार मानण्याचा!

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
सदर लेखनातील हा शेवटचा लेख. वाचकांचा कृतज्ञतापूर्वक निरोप घेण्याचा, वाचकांना धन्यवाद देण्याचा आणि त्यांचे आभार मानण्याचा! 
गेले वर्षभर मी ‘थोडं गोड आणि थोडं कडू’ या सदरासाठी शिक्षण आणि त्याच्याशी निगडित असलेले सारे घटक यांच्यातील भले-बुरे, कडू-गोड आणि ज्ञात-अज्ञात  असे अनुभव आपल्यासमोर ठेवत गेलो. आपले शिक्षण हा आता माणसाचा बहिश्‍चर प्राण झालेला आहे. जीवनातील जडण-घडणीचा तो एक प्राणभूत घटक मानला जातो आहे. आज माणसाजवळ असलेल्या धनशक्ती, जनशक्ती, पदशक्ती अथवा शस्त्रास्त्रशक्तीपेक्षाही ज्ञानशक्ती मोठी मानली जाते. ही ज्ञानशक्ती ज्याच्याकडे प्रबळ, प्रगत नि परिपूर्ण तो माणूस इतरांवर अधिराज्य गाजवू शकतो. तो देशही जगावर अधिराज्य गाजवू शकतो. म्हणून अशा या मौलिक व प्राणभूत घटकाचे तेज वाढावे, त्यातील विकृती कमी व्हावी, त्याच्या प्रकाशात अंधार पळून जावा आणि त्याचे चैतन्यमय, प्रकाशमय आणि निरामय रूप सर्वांना प्राप्त व्हावे या एका भावनेने शिक्षणाचे जे पाच प्रमुख घटक आपण मानतो त्यांचे कृष्ण-धवल दर्शन मी घडवीत गेलो. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासन आणि समाज हे ते पाच घटक होत. याची वाईट बाजू आणि चांगली बाजू मला जशा भावल्या तशा मांडल्या.
शिक्षणाच्या क्षेत्रात मी वेगवेगळ्या नात्यांनी बत्तीस वर्षे वावरलो. रमलो. विद्यार्थ्यांपासून समाज अन् शासन पातळीवर सार्‍या घटकांशी एकरूप होऊन मी जगलो त्यामुळे सगळ्यांचे नाना परीचे अनुभव मी घेतले आहेत. या माझ्या अनुभवांनाच मी कल्पितांची अंशत: जोड देत त्यातले हे सत्य नि सार्मथ्य वाचकांसमोर ठेवले. त्यातली कुरुपता आणि स्वार्थ अधोरेखित केला. तसे म्हटले तर हे सारे अनुभव आजही अवती-भोवती पाहावयास मिळतात. वाचकांच्या अनुभवाला येत असावेत. त्यामुळेच या माझ्या सदर लेखनाला महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातच या दैनिकाच्या रविवार आवृत्तीचे वितरण सर्वदूर आणि मोठय़ा संख्येने होत असल्याने चंद्रपूरपासून तो कर्नाटकाच्या सीमेवरील चंदगडपर्यंतच्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. फोन करून आणि समक्ष भेट देऊनही या सदर लेखनातील एकेक पात्र अन् एकेक प्रसंग म्हणजे व्यामिश्र जीवनाचा घडविलेला अनोखा साक्षात्कार होय असेही काही वाचकांना वाटले. ‘‘कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणासाठी जिद्दीने झुंजणार्‍या मुलांचा आम्हाला पत्ता  कळवा आम्ही त्याला मदत करणार आहोत’’ असे फोनही मला अनेकांनी केले; यापेक्षा वाचकांच्या प्रतिक्रियांची महत्ता दुसरीकडे बघायला नको, असेच मला वाटते. ‘लोकमत समूहा’ने ही संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. मुख्य म्हणजे वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. महाकवी तुकोबारायांच्या भाषेत एवढेच म्हणेन की, ‘शेवटचा दिस गोड व्हावा’.. तो गोड झाला याचाच खरा आनंद! 
 (लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)
(समाप्त)