शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा तो ऐतिहासिक संप

By admin | Updated: June 14, 2014 18:28 IST

संघटना नाही. संपाचा आदेश नाही, संपासाठी कामगारांची स्वत:ची मागणी नाही, असंतोषाच्या जनकाच्यावरील अन्यायाविरूद्ध संप. साम्राज्यशाहीच्या दडपशाही विरोधात संप. कामगार क्षेत्रातील न भूतो न भविष्यती अशी ही घटना. त्याला दिलेला उजाळा..

 सूर्यकांत परांजपे

 
कार्तिकी यात्रेनिमित्त भव्य स्वदेशी संमेलन व प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याठिकाणी टिळकांनी स्वदेशीचा अर्थ स्पष्ट केला. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून जनतेचे कर्तव्य संपत नाही, तर स्वत:च्या राज्याची-स्वराज्याची मागणी केली पाहिजे, असे सांगून हा मंत्र खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यांनी जनसमुदायाला सांगितले, की देशाची स्थिती कठीण होत चालली आहे. दडपशाहीचे कायदे पास होत आहेत. तुम्ही ज्या श्रद्धेने पंढरपूरला येता त्या श्रद्धेने, निष्ठेने, कळकळीने देशाचा विचार करा. या स्थितीची खेड्यापाड्यांपर्यंत चर्चा करा. आज जनतेकडे शस्त्रे नसली तरी स्वदेशीचे प्रभावी अस्त्र आहे आणि त्याचा वापर करा. १५ डिसेंबर १९0७ रोजी चिंचपोकळी येथे तेल्या-तांबोळय़ांच्या पुढार्‍यांचे मजुरांसमोर भाषण झाले. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले, की स्वदेशी हा पोटापाण्याशी निगडीत विषय आहे. मी गिरणीतील कापड घेतो म्हणून तुम्हाला मजुरी मिळते. स्वदेशीपासून तुमचा फायदा आहे. उदरनिर्वाहासाठी तुम्ही येथे येता. उद्योगधंदे आहेत. म्हणून स्वदेशीचा हेतू तुम्हाला उद्योगधंदे मिळावेत, जे आहेत ते भरभराटीस येवून तुमचे कल्याण व्हावे हा आहे. तुम्ही २ लाख आहात. तुम्ही ही स्थिती समजावून घ्यावी व समजल्यावर इतरांना सांगावी, हेही त्यांनी सांगितले. हा तर्क जनतेच्या मनाला भिडला. स्वदेशी चळवळीचा परिणाम म्हणून भारतातील ब्रिटिश कापडाची आयात घटली. १९0७ मध्ये मँचेस्टरमधून होणार्‍या कापडाची आयात ४ कोटी २५ लाख यार्डने घटली. टिळकांनी सांगितले, की काबाडकष्ट करून निर्वाह करणार्‍या बहुसंख्य लोकांची स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देशस्थिती सुधारली, असे म्हणता येणार नाही.
अशा तर्‍हेने असंतोषाच्या जनकाच्या या आवाहनाने शेतकरी, कामकरी, व्यापारी, शेठजी, विचारवंत असे सर्वजण जनशक्तीत सामील झाले. सुरत येथील काँग्रेसच्या अधिवेशनात लोकमान्यांनी भाकीत केले, की आता देशात दडपशाही सुरू होणार. त्यांचे भाकीत खरे ठरले. मोठय़ा प्रमाणात दडपशाही सुरू झाली. सुशीलचंद्र सेन नावाच्या कोवळय़ा मुलाला सेशन जज्ज किंग्ज फोर्ड यांनी फटक्यांची शिक्षा सुनावली होती. याची प्रतिक्रिया म्हणून किंग्जफोर्ड यांचे दिशेने अँसिड बाँब फेकला गेला. त्यात केनेडी नावाची स्त्री व तिची मुलगी मृत्युमुखी पडली. यामुळे सरकारच्या दडपशाहीचे होमकुंड पेटले व त्यात अनेकांच्या आहुत्या पडू लागल्या.
दडपशाहीमुळे लोकमान्य अस्वस्थ झाले. १२ मे १९0८ रोजी ‘देशाचे दुर्दैव’ या लेखाद्वारे राज्यकर्त्यांच्या बेजबाबदारपणावर टिका केली. ९ जून १९0८ रोजी ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हा अग्रलेख प्रसिद्ध करून दडपशाहीमुळे माथेफिरू निर्माण होतात, असे म्हटले. या लेखातून सरकार विषयी जनतेमध्ये द्वेष व तिरस्कार उत्पन्न केला व तसा प्रयत्न केला असे आरोप करून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला. त्यांना २४ जून १९0८ रोजी अटक झाली.
१३ जुलै १९0८ रोजी खटल्याची सुनावणी सुरू झाली. टिळकांनी स्वत: संपूर्ण केस चालवली. उलट तपास घेतला. न्यायालयासमोर २३ तास भाषण केले. राजद्रोहासंबंधी काय समज आहे हे दाखविण्यासाठी इंग्लिश लॉ रिपोर्टातील अनेक उदाहरणे दिली. विलायतेत वर्तमानपत्रांना जी सवलत मिळते ती मला मिळाली पाहिजे, अशी मागणी लोकमान्यांनी केली.
राष्ट्रीय चळवळ मोडून काढण्याचा चंग बांधलेले सरकार टिळकांना दोषी धरणार हे निश्‍चित होते. राजद्रोहाचे आरोप असलेल्या खटल्याचा निकाल २२ जुलै १९0८ रोजी रात्री १0 वाजता लागला. राजद्रोहासाठी न्यायमूर्ती दावर यांनी लोकमान्यांना ६ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून एक हजार रुपयांचा दंडही केला. शिक्षा भोगण्यासाठी त्यांची रवानगी मंडालेच्या कारागृहात केली गेली.
शिक्षेची अटकळ कामगारांनी बांधली होती. त्यामुळे शिक्षेची वार्ता ऐकण्यापूर्वीच संपाला थोड्याफार प्रमाणात सुरूवात झाली होती. प्रत्यक्ष शिक्षेची बातमी कानी पडताच शिक्षेचा व साम्राज्यशाहीच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी कामगारांनी कडक हरताळ पाळण्याचा निर्णय केला. शिक्षेच्या प्रत्येक वर्षाला एक याप्रमाणे कामगारांनी ६ दिवस कापड गिरण्यांत संप केला. कामगारांच्या संपात दुकानदारही सामील झाले होते. संपाचे ६ दिवस झाले तरी ते दुकाने उघडण्याच्या मनस्थितीत नव्हते. कामगारांची तीच अवस्था होती.
खटल्याच्या सुनावणीच्यावेळी कामगारांचे थवेच्याथवे हायकोर्टाकडे जायचे. लोकमान्यांबद्दल कामगारांच्या मनात एवढा आदर होता, की त्यांच्या अटकेच्या बातमीने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. १६ जुलै १९0८ रोजी खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी क्विन व लक्ष्मीदास गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला. इतर गिरण्यांत जाऊन दंगल केली. १९ व  २0 जुलैला सर्वच गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला.
संघटना नाही. संपाचा आदेश नाही, संपासाठी कामगारांची स्वत:ची मागणी नाही, असंतोषाच्या जनकाच्यावरील अन्यायाविरूद्ध संप. साम्राज्यशाहीच्या दडपशाही विरोधात संप. कामगार क्षेत्रातील न भूतो न भविष्यती अशी ही घटना होती.
(लेखक कामगार क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)