शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

कामगारांचा तो ऐतिहासिक संप

By admin | Updated: June 14, 2014 18:28 IST

संघटना नाही. संपाचा आदेश नाही, संपासाठी कामगारांची स्वत:ची मागणी नाही, असंतोषाच्या जनकाच्यावरील अन्यायाविरूद्ध संप. साम्राज्यशाहीच्या दडपशाही विरोधात संप. कामगार क्षेत्रातील न भूतो न भविष्यती अशी ही घटना. त्याला दिलेला उजाळा..

 सूर्यकांत परांजपे

 
कार्तिकी यात्रेनिमित्त भव्य स्वदेशी संमेलन व प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याठिकाणी टिळकांनी स्वदेशीचा अर्थ स्पष्ट केला. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून जनतेचे कर्तव्य संपत नाही, तर स्वत:च्या राज्याची-स्वराज्याची मागणी केली पाहिजे, असे सांगून हा मंत्र खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यांनी जनसमुदायाला सांगितले, की देशाची स्थिती कठीण होत चालली आहे. दडपशाहीचे कायदे पास होत आहेत. तुम्ही ज्या श्रद्धेने पंढरपूरला येता त्या श्रद्धेने, निष्ठेने, कळकळीने देशाचा विचार करा. या स्थितीची खेड्यापाड्यांपर्यंत चर्चा करा. आज जनतेकडे शस्त्रे नसली तरी स्वदेशीचे प्रभावी अस्त्र आहे आणि त्याचा वापर करा. १५ डिसेंबर १९0७ रोजी चिंचपोकळी येथे तेल्या-तांबोळय़ांच्या पुढार्‍यांचे मजुरांसमोर भाषण झाले. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले, की स्वदेशी हा पोटापाण्याशी निगडीत विषय आहे. मी गिरणीतील कापड घेतो म्हणून तुम्हाला मजुरी मिळते. स्वदेशीपासून तुमचा फायदा आहे. उदरनिर्वाहासाठी तुम्ही येथे येता. उद्योगधंदे आहेत. म्हणून स्वदेशीचा हेतू तुम्हाला उद्योगधंदे मिळावेत, जे आहेत ते भरभराटीस येवून तुमचे कल्याण व्हावे हा आहे. तुम्ही २ लाख आहात. तुम्ही ही स्थिती समजावून घ्यावी व समजल्यावर इतरांना सांगावी, हेही त्यांनी सांगितले. हा तर्क जनतेच्या मनाला भिडला. स्वदेशी चळवळीचा परिणाम म्हणून भारतातील ब्रिटिश कापडाची आयात घटली. १९0७ मध्ये मँचेस्टरमधून होणार्‍या कापडाची आयात ४ कोटी २५ लाख यार्डने घटली. टिळकांनी सांगितले, की काबाडकष्ट करून निर्वाह करणार्‍या बहुसंख्य लोकांची स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देशस्थिती सुधारली, असे म्हणता येणार नाही.
अशा तर्‍हेने असंतोषाच्या जनकाच्या या आवाहनाने शेतकरी, कामकरी, व्यापारी, शेठजी, विचारवंत असे सर्वजण जनशक्तीत सामील झाले. सुरत येथील काँग्रेसच्या अधिवेशनात लोकमान्यांनी भाकीत केले, की आता देशात दडपशाही सुरू होणार. त्यांचे भाकीत खरे ठरले. मोठय़ा प्रमाणात दडपशाही सुरू झाली. सुशीलचंद्र सेन नावाच्या कोवळय़ा मुलाला सेशन जज्ज किंग्ज फोर्ड यांनी फटक्यांची शिक्षा सुनावली होती. याची प्रतिक्रिया म्हणून किंग्जफोर्ड यांचे दिशेने अँसिड बाँब फेकला गेला. त्यात केनेडी नावाची स्त्री व तिची मुलगी मृत्युमुखी पडली. यामुळे सरकारच्या दडपशाहीचे होमकुंड पेटले व त्यात अनेकांच्या आहुत्या पडू लागल्या.
दडपशाहीमुळे लोकमान्य अस्वस्थ झाले. १२ मे १९0८ रोजी ‘देशाचे दुर्दैव’ या लेखाद्वारे राज्यकर्त्यांच्या बेजबाबदारपणावर टिका केली. ९ जून १९0८ रोजी ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हा अग्रलेख प्रसिद्ध करून दडपशाहीमुळे माथेफिरू निर्माण होतात, असे म्हटले. या लेखातून सरकार विषयी जनतेमध्ये द्वेष व तिरस्कार उत्पन्न केला व तसा प्रयत्न केला असे आरोप करून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला. त्यांना २४ जून १९0८ रोजी अटक झाली.
१३ जुलै १९0८ रोजी खटल्याची सुनावणी सुरू झाली. टिळकांनी स्वत: संपूर्ण केस चालवली. उलट तपास घेतला. न्यायालयासमोर २३ तास भाषण केले. राजद्रोहासंबंधी काय समज आहे हे दाखविण्यासाठी इंग्लिश लॉ रिपोर्टातील अनेक उदाहरणे दिली. विलायतेत वर्तमानपत्रांना जी सवलत मिळते ती मला मिळाली पाहिजे, अशी मागणी लोकमान्यांनी केली.
राष्ट्रीय चळवळ मोडून काढण्याचा चंग बांधलेले सरकार टिळकांना दोषी धरणार हे निश्‍चित होते. राजद्रोहाचे आरोप असलेल्या खटल्याचा निकाल २२ जुलै १९0८ रोजी रात्री १0 वाजता लागला. राजद्रोहासाठी न्यायमूर्ती दावर यांनी लोकमान्यांना ६ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून एक हजार रुपयांचा दंडही केला. शिक्षा भोगण्यासाठी त्यांची रवानगी मंडालेच्या कारागृहात केली गेली.
शिक्षेची अटकळ कामगारांनी बांधली होती. त्यामुळे शिक्षेची वार्ता ऐकण्यापूर्वीच संपाला थोड्याफार प्रमाणात सुरूवात झाली होती. प्रत्यक्ष शिक्षेची बातमी कानी पडताच शिक्षेचा व साम्राज्यशाहीच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी कामगारांनी कडक हरताळ पाळण्याचा निर्णय केला. शिक्षेच्या प्रत्येक वर्षाला एक याप्रमाणे कामगारांनी ६ दिवस कापड गिरण्यांत संप केला. कामगारांच्या संपात दुकानदारही सामील झाले होते. संपाचे ६ दिवस झाले तरी ते दुकाने उघडण्याच्या मनस्थितीत नव्हते. कामगारांची तीच अवस्था होती.
खटल्याच्या सुनावणीच्यावेळी कामगारांचे थवेच्याथवे हायकोर्टाकडे जायचे. लोकमान्यांबद्दल कामगारांच्या मनात एवढा आदर होता, की त्यांच्या अटकेच्या बातमीने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. १६ जुलै १९0८ रोजी खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी क्विन व लक्ष्मीदास गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला. इतर गिरण्यांत जाऊन दंगल केली. १९ व  २0 जुलैला सर्वच गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला.
संघटना नाही. संपाचा आदेश नाही, संपासाठी कामगारांची स्वत:ची मागणी नाही, असंतोषाच्या जनकाच्यावरील अन्यायाविरूद्ध संप. साम्राज्यशाहीच्या दडपशाही विरोधात संप. कामगार क्षेत्रातील न भूतो न भविष्यती अशी ही घटना होती.
(लेखक कामगार क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)