शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आई

By admin | Updated: August 2, 2014 14:22 IST

संगीत रंगभूमीची सम्राज्ञी असलेल्या जयमाला शिलेदार या आपल्यातून गेल्या त्याला आता वर्ष होत आलं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त (दि. ८ ऑगस्ट)त्यांच्या कन्येने आठवणींना दिलेला उजाळा..

- कीर्ती शिलेदार

 
तालाशिवाय सूर.. शब्दांशिवाय गाणं.. आणि तुझ्याशिवाय जगणं..! गेले वर्षभर मी आणि लता तुझ्याशिवाय जगण्याची धडपड करतो आहोत! नाना गेले तेव्हा आपण सगळेच हादरलो होतो.. एकमेकींना धीर देत पुन्हा उभ्या राहिलो. घरमालक, भाऊबंदांनी लादलेले कज्जे.. गंधर्व शताब्दीनंतर कर्जात बुडालेली ‘मराठी रंगभूमी’ या सर्वांनी खंबीरपणे तोंड देत पुन्हा स्थिरस्थावर झालो ते केवळ तुझ्या भक्कम पाठिंब्यामुळंच! तू असेपर्यंत सगळ्या संकटांना झेलत हसत-खेळत वावरलो.. तुझा प्रसन्न चेहरा म्हणजे आम्हा सर्वांची अदृश्य प्रेरणा होती.
आई, तू संगीत रंगभूमीची सम्राज्ञी होतीस. नटसम्राट बालगंधर्व म्हणजे, नाना आणि तुला परम दैवताप्रमाणे होते. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. संगीत नाटक हेच जीवनध्येय मानून तुम्ही एकत्र आलात.. संगीतनाट्य संस्था स्थापन केलीत. कालौघाचे कितीही फटके बसले, तरी तुम्ही आपल्या ध्येयापासून विचलित झाला नाही. आपल्या नाट्यवतरुळात हौशी आणि व्यावसायिक असे दोन प्रकार मानले जातात. तुम्हा दोघांचा कारभार अजबच.. पदरमोड करून हौसेनं तुम्ही व्यावसायिक संगीत नाटक केलंत! दोन पिढय़ांची कारकीर्द घडवत संगीत रंगभूमीचा नंदादीप सतत उजळत ठेवला.
नायिका म्हणून जवळजवळ ३0-४0 वर्षे तू तळपत राहिलीस. सगळ्या चांगल्या गाजलेल्या नायकांबरोबर कामं केलीस. तुझं रंगमंचावरचं वावरणं दिमाखदार असायचं. तुझ्या प्रतिभाशाली गायकीनं तुझ्या सगळ्या भूमिकांमध्ये आगळे रंग भरले. नाटक असो, नाहीतर मैफल.. तुझ्यावर रंगदेवता नेहमीच प्रसन्न राहिली. आम्हा नाठाळ मुलींना घडवणं.. तसं मुश्कील काम होतं! लताची दादागिरी.. माझा नकल्या स्वभाव.. छानपैकी धपाटे देऊन आम्हाला वठणीवर आणायचीस! आमच्या स्वतंत्र विचारांना नेहमी चालना दिलीस. तुम्ही दोघांनी आमच्यावर कोणतीही गोष्ट लादली नाही. लताची आणि माझी कारकीर्द सुरू झाल्यावर तुम्हाला खूप समाधान वाटलं होतं. प्रत्येक कार्यक्रमानंतर आणि प्रयोगानंतर त्याचं विश्लेषण करण्याची सवय तुम्ही आम्हाला लावलीत. आपल्या चौघांचं ते विश्‍व अपार आनंदानं डोलत असायचं!
आई, तुझं सगळ्यात मोठं कार्य कोणतं असेल, तर ते ज्ञानदानाचं! हातचं न राखता कितीतरी शिष्यांना तू नाट्यसंगीत शिकवलंस. नाट्यपद गाताना चेहर्‍यावर भाव यायला पाहिजेत या तुझ्या आग्रहातून तुझ्या शिष्या एकेक संगीत नाट्यप्रवेश निवडून सादर करू लागल्या. नवी पिढी सहजपणे घडत गेली. सत्याऐंशी वर्षांचं तुझं आयुष्य संगीताशी आणि संगीत नाटकाशी एकरूप झालेलं होतं. 
शेवटी-शेवटी जरी थकली होतीस तरी नाटकांच्या तालमी आणि प्रयोगांना हजर राहून त्या वातावरणाचा आनंद लुटत राहिलीस. तू आलीस की सगळं वातावरण प्रसन्नतेनं भरून जाई. तू कृतार्थ होतीस. परमेश्‍वरावर आणि स्वामी सर्मथांवरची अपार निष्ठा यांनी कृतकृत्य जीवन लाभलं. सगळे मानसन्मान तुझ्याकडं चालत आले. खूप शांतपणे तू या जगाचा निरोप घेतलास. अत्यंत साधेपणानं, अपार कष्टानं कर्तृत्व सिद्ध करून तू स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व घडवलंस. तू आज प्रत्यक्ष नाहीस पण असंख्य रसिकांच्या मनात आणि आम्हा मुलींच्या हृदयात तू निरंतर आहेस..
(लेखिका ज्येष्ठ गायिका आहेत.)