शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जीवन-मृत्यूच्या प्रवासाचा 'हिरवा' थरार...

By admin | Updated: June 25, 2016 14:36 IST

श्वासोच्छ्वास तर सुरू आहे, तरीही जिवंत म्हणता येत नाही.. मृत तर नक्कीच नाही. ‘ब्रेनडेड’! त्या व्यक्तीला खरोखरच जिवंत ठेवायचं तर एकच पर्याय. त्याच्या अवयवांचं लवकरात लवकर दुसऱ्या कोणातरी गरजूच्या शरीरात प्रत्यारोपण करायचं आणि त्याचं हृदय धडधडत ठेवायचं. हातात वेळ अत्यंत मोजका आणि प्रवास तर अत्यंत जिकिरीचा. मग क्षणाक्षणाला पुन्हा सुरू होतो जीवन-मरणाचा प्रश्न...

 पवन देशपांडेतरुण वय. सळसळतं रक्त. श्वास सुरू आहे; पण मेंदूनं साथ सोडलेली. म्हटलं तर जिवंत, म्हटलं तर मृत.. अचानक झालेला अपघात आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालेलं.  ब्रेनडेड!डॉक्टरांनी हे सांगितलं आणि घरच्यांवर आभाळच कोसळलं. त्याही स्थितीत छातीवर दगड ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि देहानं नाही तरी अवयवांच्या रूपात त्याला जिवंत ठेवायचं ठरवलं.त्याच्या स्वत:च्या शरीरात जरी नाही तरी दुसऱ्या कुणाच्या तरी शरीरात त्याचं हृदय धडधडत राहावं यासाठी त्यांनी ब्रेनडेड झालेल्या आपल्या तरुण मुलाचं हृदय दान करण्याचं ठरवलं.त्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झाला एक वेगवान प्रवास..हृदयाची गती वाढावी तशी पुढील सारी चक्र वेगानं धावायला लागली.सुरतमध्ये रात्र चढत होती तशी नातेवाईक-नर्स-वॉर्डबॉय-डॉक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर यांच्यापासून ते एअरपोर्ट-रस्ते वाहतूक व्यवस्थापन करणाऱ्या पोलिसांच्या यंत्रणा अशा साऱ्यांचीच धावपळ सुरू झाली. कारण अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या तरुणाचं हृदय काढून ते थेट मुंबईत मुलुंडमध्ये न्यायचं होतं. जिवंत राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका रुग्णासाठी.हृदयाचा हा प्रवास होता सुरतपासून ते मुंबई-मुलुंडपर्यंतचा. कोठेच थांबलो नाही तर रस्ते मार्गे जवळपास पाच ते सहा तासांचा. त्यानंतर शस्त्रक्रिया. म्हणजे आणखी एखादा तास. पण हृदय काढून घेतल्यापासून ते हृदय पुन्हा एका नव्या शरीरात प्रत्यारोपीत करण्याची ही प्रक्रिया तब्बल चार ते सहा तासांच्या आत करायची होती. कमीत कमी वेळेत ही सगळी प्रक्रिया पार पाडणं हे हृदय बसविण्यात येणाऱ्या रुग्णासाठी आवश्यक होतं. पण प्रवास लांबचा होता. पर्याय एकच होता. विमानाचा. सुरतहून हृदय हवाईमार्गे थेट मुंबईत आणायचं. पुढे रस्ते मार्गे शक्य तेवढ्या वेळेत मुलुंडच्या रुग्णालयात पोहोचवायचं. त्यासाठी रस्ताही मोकळा असणं महत्त्वाचं होतं. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली.डॉक्टर पोहोचले होते. रुग्णवाहिका सज्ज होती. शिवाय सुरत आणि मुंबईतही ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. हवाई वाहतूक नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेनं मार्ग मोकळा करून दिला होताच.शस्त्रक्रिया पार पाडून हृदय निघालं. सुरतच्या रुग्णालयापासून ते मुंबईत मुलुंडच्या रुग्णालयापर्यंत त्याचा प्रवास केवळ ५५ मिनिटांत झाला. ही किमया साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी जवळपास ५०० जणांची टीम कार्यरत होती...कसं शक्य झालं हे?अलीकडच्या काळात असे काही आश्चर्यकारक प्रसंग आपण अनुभवले. भरमसाठ ट्रॅफिक असलेल्या एखाद्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायलाही बऱ्याचदा तास, अर्धा तास निघून जातो. अशा परिस्थितीत इतक्या लांबचा प्रवास आणि तोही काही मिनिटांत!पण असं झालं खरं.त्यामुळे ‘मृत’ व्यक्ती तर आपल्या अवयवांच्या रूपानं जिवंत राहिलीच; पण मृत्यूशय्येवरच्या रुग्णालाही जीवदान मिळालं!इंदूर-दिल्ली, इंदूर-मुंबई, नाशिक-पुणे, औरंगाबाद-मुंबई, औरंगाबाद-पुणे.. असे अनेक ‘जिवंत’, थरारक आणि यशस्वी प्रवास अलीकडच्या काळात घडले, घडू शकले.त्याचं प्रमुख कारण ‘ग्रीन कॉरिडॉर.ही खरं तर युरोपियन संकल्पना; पण आता सगळीकडेच तिचा उपयोग केला जातोय. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे वाहतुकीचा असा खास मार्ग, ज्यात सारे सिग्नल्स मॅन्युअल मोडनं आॅपरेट केले जातात आणि आपल्या गरजेनुसार वाहतुकीचं नियंत्रण केलं जातं.हाच ग्रीन कॉरिडॉर आता अनेकांसाठी संजीवनी ठरतोय..पण या ‘ग्रीन कॉरिडॉर’वरचा हा जिवंत प्रवास नेमका होतो तरी कसा? कोण कोण त्यात, कसं सहभागी होतं?ती कहाणीही गंभीर, तरीही तितकीच रोचक आहे.