शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जीवन-मृत्यूच्या प्रवासाचा 'हिरवा' थरार...

By admin | Updated: June 25, 2016 14:36 IST

श्वासोच्छ्वास तर सुरू आहे, तरीही जिवंत म्हणता येत नाही.. मृत तर नक्कीच नाही. ‘ब्रेनडेड’! त्या व्यक्तीला खरोखरच जिवंत ठेवायचं तर एकच पर्याय. त्याच्या अवयवांचं लवकरात लवकर दुसऱ्या कोणातरी गरजूच्या शरीरात प्रत्यारोपण करायचं आणि त्याचं हृदय धडधडत ठेवायचं. हातात वेळ अत्यंत मोजका आणि प्रवास तर अत्यंत जिकिरीचा. मग क्षणाक्षणाला पुन्हा सुरू होतो जीवन-मरणाचा प्रश्न...

 पवन देशपांडेतरुण वय. सळसळतं रक्त. श्वास सुरू आहे; पण मेंदूनं साथ सोडलेली. म्हटलं तर जिवंत, म्हटलं तर मृत.. अचानक झालेला अपघात आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालेलं.  ब्रेनडेड!डॉक्टरांनी हे सांगितलं आणि घरच्यांवर आभाळच कोसळलं. त्याही स्थितीत छातीवर दगड ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि देहानं नाही तरी अवयवांच्या रूपात त्याला जिवंत ठेवायचं ठरवलं.त्याच्या स्वत:च्या शरीरात जरी नाही तरी दुसऱ्या कुणाच्या तरी शरीरात त्याचं हृदय धडधडत राहावं यासाठी त्यांनी ब्रेनडेड झालेल्या आपल्या तरुण मुलाचं हृदय दान करण्याचं ठरवलं.त्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झाला एक वेगवान प्रवास..हृदयाची गती वाढावी तशी पुढील सारी चक्र वेगानं धावायला लागली.सुरतमध्ये रात्र चढत होती तशी नातेवाईक-नर्स-वॉर्डबॉय-डॉक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर यांच्यापासून ते एअरपोर्ट-रस्ते वाहतूक व्यवस्थापन करणाऱ्या पोलिसांच्या यंत्रणा अशा साऱ्यांचीच धावपळ सुरू झाली. कारण अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या तरुणाचं हृदय काढून ते थेट मुंबईत मुलुंडमध्ये न्यायचं होतं. जिवंत राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका रुग्णासाठी.हृदयाचा हा प्रवास होता सुरतपासून ते मुंबई-मुलुंडपर्यंतचा. कोठेच थांबलो नाही तर रस्ते मार्गे जवळपास पाच ते सहा तासांचा. त्यानंतर शस्त्रक्रिया. म्हणजे आणखी एखादा तास. पण हृदय काढून घेतल्यापासून ते हृदय पुन्हा एका नव्या शरीरात प्रत्यारोपीत करण्याची ही प्रक्रिया तब्बल चार ते सहा तासांच्या आत करायची होती. कमीत कमी वेळेत ही सगळी प्रक्रिया पार पाडणं हे हृदय बसविण्यात येणाऱ्या रुग्णासाठी आवश्यक होतं. पण प्रवास लांबचा होता. पर्याय एकच होता. विमानाचा. सुरतहून हृदय हवाईमार्गे थेट मुंबईत आणायचं. पुढे रस्ते मार्गे शक्य तेवढ्या वेळेत मुलुंडच्या रुग्णालयात पोहोचवायचं. त्यासाठी रस्ताही मोकळा असणं महत्त्वाचं होतं. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली.डॉक्टर पोहोचले होते. रुग्णवाहिका सज्ज होती. शिवाय सुरत आणि मुंबईतही ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. हवाई वाहतूक नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेनं मार्ग मोकळा करून दिला होताच.शस्त्रक्रिया पार पाडून हृदय निघालं. सुरतच्या रुग्णालयापासून ते मुंबईत मुलुंडच्या रुग्णालयापर्यंत त्याचा प्रवास केवळ ५५ मिनिटांत झाला. ही किमया साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी जवळपास ५०० जणांची टीम कार्यरत होती...कसं शक्य झालं हे?अलीकडच्या काळात असे काही आश्चर्यकारक प्रसंग आपण अनुभवले. भरमसाठ ट्रॅफिक असलेल्या एखाद्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायलाही बऱ्याचदा तास, अर्धा तास निघून जातो. अशा परिस्थितीत इतक्या लांबचा प्रवास आणि तोही काही मिनिटांत!पण असं झालं खरं.त्यामुळे ‘मृत’ व्यक्ती तर आपल्या अवयवांच्या रूपानं जिवंत राहिलीच; पण मृत्यूशय्येवरच्या रुग्णालाही जीवदान मिळालं!इंदूर-दिल्ली, इंदूर-मुंबई, नाशिक-पुणे, औरंगाबाद-मुंबई, औरंगाबाद-पुणे.. असे अनेक ‘जिवंत’, थरारक आणि यशस्वी प्रवास अलीकडच्या काळात घडले, घडू शकले.त्याचं प्रमुख कारण ‘ग्रीन कॉरिडॉर.ही खरं तर युरोपियन संकल्पना; पण आता सगळीकडेच तिचा उपयोग केला जातोय. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे वाहतुकीचा असा खास मार्ग, ज्यात सारे सिग्नल्स मॅन्युअल मोडनं आॅपरेट केले जातात आणि आपल्या गरजेनुसार वाहतुकीचं नियंत्रण केलं जातं.हाच ग्रीन कॉरिडॉर आता अनेकांसाठी संजीवनी ठरतोय..पण या ‘ग्रीन कॉरिडॉर’वरचा हा जिवंत प्रवास नेमका होतो तरी कसा? कोण कोण त्यात, कसं सहभागी होतं?ती कहाणीही गंभीर, तरीही तितकीच रोचक आहे.