शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

जि.प.ला योजनेतून डावलले

By admin | Updated: April 23, 2015 05:01 IST

सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असतानाही कोट्यवधीच्या योजना केवळ मंत्री व अधिकाऱ्यांभोवती कशा केंद्रित आहेत, याचा प्रत्यय समाजकल्याण विभागाच्या सौर पथदिव्यांच्या योजनेत येत आहे.

पुणे : सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असतानाही कोट्यवधीच्या योजना केवळ मंत्री व अधिकाऱ्यांभोवती कशा केंद्रित आहेत, याचा प्रत्यय समाजकल्याण विभागाच्या सौर पथदिव्यांच्या योजनेत येत आहे. कोट्यवधी रुपयांची ही योजना जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना डावलून केवळ प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सरपंचांचा योजनेत सहभाग आहे; पण केवळ गावात सौरदिवा बसला, ही पोचपावती देण्यापुरता! राज्यातील दलितवस्त्यांत योजनेंतर्गत १ लाख ९३ हजार २४२ सौर पथदिवे बसविले जात आहेत. त्यातील एका दिव्याची किंमत १७ हजार रुपये आहे. ३४० कोटी रुपयांच्या योजनेत जनतेचा सहभाग काय, याचे उत्तर मात्र धक्कादायक आहे.योजनेची अंमलबजावणी केवळ समाजकल्याण मंत्री व अधिकारी स्तरावर सुरू आहे. योजनेसाठी समाजकल्याण उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्णात समिती नेमण्यात आली आहे. सदस्यांमध्ये जिल्हा परिषदांचे समाजकल्याण अधिकारी, विभागाचे सहायक आयुक्त, सहायक संचालक (लेखा), समाजकल्याण अधिकारी वर्ग-२ असे सर्व अधिकारी मंडळीच आहेत. समाजकल्याण विभागाने ठरविलेल्या पुरवठादारांना मान्यता देणे, दलितवस्त्यांची निवड करून तेथे दिवे बसवून घेणे, दिव्यांची पाच वर्षे देखभाल ठेवणे ही सर्व कामे समितीकडे सोपविण्यात आली आहेत. वरिष्ठांनीच योजना आखलेली असल्याने समितीचे सदस्य योजनेतील उणिवांबाबत बोलणार तरी कसे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिव्यांच्या देखभालीसाठी ही समिती गावांचा दौरा करेल का, हाही एक प्रश्न आहे. वास्तविक सौरदिवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसविले जात आहेत. मात्र, वस्त्यांची निवड व देखभाल यात जि. प., सरपंच अथवा ग्रामसभेचा कोणताही सहभाग नाही. सौरदिवा ३० दिवस चालू होता, असे एक प्रमाणपत्र केवळ सरपंच अथवा ग्रामसेवकाकडून घेतले जात आहे. येथेही सरपंचाला ग्रामसेवक हा पर्याय देण्यात आला आहे.तपासण्यांचे अहवालच नाहीत योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या समितीत केवळ अधिकारीच का? समितीचे निकष काय?, असे प्रश्न ‘लोकमत’ने माहिती अधिकारात समाजकल्याण आयुक्तालयाला विचारल्यावर एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. योजनेचे दोन वर्षांचे तांत्रिक व क्षेत्रीय तपासण्यांचे अहवाल मागविले असता ते सुद्धा आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. योजनेचे नियम कुणी व कसे ठरविले? तसेच योजनेची तपासणी होत आहे का? असे प्रश्न त्यामुळे निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)