शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

न्यायालय निर्णयावर जिल्हा परिषदेची मदार

By admin | Updated: October 25, 2016 02:26 IST

पनवेल महानगरपालिका १ आॅक्टोबर रोजी अस्तित्वात आली. मात्र जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्हा परिषदेच्या ६१ जागांचे आरक्षण सोमवारी सोडत पद्धतीने जाहीर केले.

- आविष्कार देसाई, अलिबाग

पनवेल महानगरपालिका १ आॅक्टोबर रोजी अस्तित्वात आली. मात्र जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्हा परिषदेच्या ६१ जागांचे आरक्षण सोमवारी सोडत पद्धतीने जाहीर केले. रायगड जिल्हा परिषदेचे मतदारसंघ प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट होण्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे हे आरक्षण अंतिम आहे यावर प्रशासनाने अद्याप शिक्कामोर्तब केले नसून निकाल सकारात्मक लागल्यास काढण्यात आलेले आरक्षण रद्द होऊन ते नव्याने काढावे लागणार आहे.नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका यांच्या निवडणुका या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांआधी होणार आहेत. पनवेल महानगरपालिका निर्माण करण्याबाबत मतमतांतरे आहेत. राज्य सरकारने अधिसूचना काढून पनवेल महानगरपालिकेला हिरवा कंदील दिला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने शेकापच्या जिल्हा परिषदेमधील महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम यांचे सदस्यत्व काहीच दिवसांपूर्वी रद्द केले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीचा फटका जिल्हा परिषदेचे दुसरे सदस्य रामचंद्र कारावकर यांनाही बसला आहे. तळोजे निर्वाचन गणातील हरेश केणी, प्रमिला पाटील (आंबे), ज्ञानेश्वर पाटील (नावडे), ज्योत्स्ना पडहिरे (कळंबोली), गोपाळ भगत (कळंबोली) यांचेही पंचायत समिती सदस्यत्व रद्द झाले आहे. पनवेल नगरपालिकेवर नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधेवर प्रचंड ताण येत आहे. ही बाब ओळखून सरकारी पातळीवर पनवेल महानगरपालिका निर्माण करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही होत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाचा निर्णय अद्याप बाकी आहे; तर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मार्च महिन्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर केले. तसेच पंचायत समितीचेही आरक्षण काढले आहे. परंतु न्यायालयाचा निर्णय पनवेल महानगरपालिकेच्या बाजूने लागल्यास काढण्यात आलेले आरक्षण रद्द करून नव्याने काढावे लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.बदलाची शक्यता : सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आरक्षण हे पनवेल महापालिकेच्या निर्मितीपूर्वीचे मतदारसंघ गृहीत धरून काढले आहे. एकूण ६१ जागांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे, परंतु न्यायालयाचा निर्णय सकारात्मक लागल्यास पनवेलमधील मतदारसंघ १६वरून ८वर येतील, तसेच अलिबाग, कर्जत, पेण, महाड, खालापूर आणि उरण येथे प्रत्येकी एक जागा वाढेल. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण ५९ जागांसाठी आरक्षण काढावे लागेल. ५९ जागांची स्थिती राहिल्यास पूर्वीप्रमाणेच मतदारसंघ राहतील.