शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

तरुण रक्तालाही दुष्काळाने हरवले

By admin | Updated: December 1, 2014 03:08 IST

पस्तिशी म्हणजे कुठल्याही संकटाशी चार हात करण्याचे वय. सलग दोन वर्षे निसर्गाने अवकृपा केली. तरीही नव्या जोमाने यंदा हाती तिफण पकडली.

औरंगाबाद : पस्तिशी म्हणजे कुठल्याही संकटाशी चार हात करण्याचे वय. सलग दोन वर्षे निसर्गाने अवकृपा केली. तरीही नव्या जोमाने यंदा हाती तिफण पकडली. पुन्हा निसर्गाने दगा दिला. शेतात घातलेला खर्चही निघाला नाही. आता कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाला कसे जगवायचे, या चिंतेत मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. पस्तिशीतील या शेतकऱ्यांना दुष्काळाने हरवले.तुळशीदास नारायण मंदलवाड (३२) याने रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंगाला विजेच्या मोटारीची वायर गुंडाळून स्टार्टरचे बटन दाबले आणि एका क्षणात स्वत:ला संपविले. काकांडी परिसरात त्याची तीन एकर जमीन आहे़ यंदा कमी पाऊस झाल्याने हाती काहीही लागले नाही. त्याचा पत्नी, चार मुली, आई आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. वसमत (जि. हिंगोली) तालुक्याच्या भेंडेगाव येथील ३५वर्षीय नामदेव संभाजी व्यवहारे याने यंदा खरीप हंगामात सोयाबीन व कापसाची लागवड केली होती. मात्र अत्यल्प पावसामुळे दोन्ही पिके हातातून गेली. त्यात २ लाखांचे कर्ज असल्याने त्याच्या विवंचनेतून शनिवारी रात्री पूर्णा-अकोला पॅसेंजर रेल्वेसमोर उडी घेऊन नामदेवने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.वैजापूर (औरंगाबाद) तालुक्यातील शिऊर येथील जगन रामराव पागरे (३५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. त्याची चार एकर शेती आहे. दुष्काळामुळे काहीच पिकले नाही. यामुळेच त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)- संबंधित वृत्त / ६> औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी मराठवाड्यातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. रविवारी यात आणखी तिघांची भर पडली.