शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

तरुण रक्तालाही दुष्काळाने हरवले

By admin | Updated: December 1, 2014 03:08 IST

पस्तिशी म्हणजे कुठल्याही संकटाशी चार हात करण्याचे वय. सलग दोन वर्षे निसर्गाने अवकृपा केली. तरीही नव्या जोमाने यंदा हाती तिफण पकडली.

औरंगाबाद : पस्तिशी म्हणजे कुठल्याही संकटाशी चार हात करण्याचे वय. सलग दोन वर्षे निसर्गाने अवकृपा केली. तरीही नव्या जोमाने यंदा हाती तिफण पकडली. पुन्हा निसर्गाने दगा दिला. शेतात घातलेला खर्चही निघाला नाही. आता कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाला कसे जगवायचे, या चिंतेत मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. पस्तिशीतील या शेतकऱ्यांना दुष्काळाने हरवले.तुळशीदास नारायण मंदलवाड (३२) याने रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंगाला विजेच्या मोटारीची वायर गुंडाळून स्टार्टरचे बटन दाबले आणि एका क्षणात स्वत:ला संपविले. काकांडी परिसरात त्याची तीन एकर जमीन आहे़ यंदा कमी पाऊस झाल्याने हाती काहीही लागले नाही. त्याचा पत्नी, चार मुली, आई आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. वसमत (जि. हिंगोली) तालुक्याच्या भेंडेगाव येथील ३५वर्षीय नामदेव संभाजी व्यवहारे याने यंदा खरीप हंगामात सोयाबीन व कापसाची लागवड केली होती. मात्र अत्यल्प पावसामुळे दोन्ही पिके हातातून गेली. त्यात २ लाखांचे कर्ज असल्याने त्याच्या विवंचनेतून शनिवारी रात्री पूर्णा-अकोला पॅसेंजर रेल्वेसमोर उडी घेऊन नामदेवने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.वैजापूर (औरंगाबाद) तालुक्यातील शिऊर येथील जगन रामराव पागरे (३५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. त्याची चार एकर शेती आहे. दुष्काळामुळे काहीच पिकले नाही. यामुळेच त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)- संबंधित वृत्त / ६> औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी मराठवाड्यातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. रविवारी यात आणखी तिघांची भर पडली.