शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तुम बिलकुल हम जैसे निकले!

By admin | Updated: October 18, 2015 02:26 IST

लेखनवाचन, विचारस्वातंत्र्यासह खाण्यापिण्यावरही लादले जाणारे निर्बंध, त्यापायी होणाऱ्या हत्या, पडणारे खून यासारख्या घटना एकीकडे आणि दुसरीकडे भूमिका घेत सरकारचा निषेध करत

- मेघना ढोके,  नाशिकलेखनवाचन, विचारस्वातंत्र्यासह खाण्यापिण्यावरही लादले जाणारे निर्बंध, त्यापायी होणाऱ्या हत्या, पडणारे खून यासारख्या घटना एकीकडे आणि दुसरीकडे भूमिका घेत सरकारचा निषेध करत आपापले पुरस्कार परत करणारे बुद्धिवादी लेखक-विचारवंत, त्यासंदर्भातही होणारे वाद-प्रतिवाद असा अस्वस्थ माहौल देशात खदखदत असताना सरहदपारहून एक बंडखोर लेखिका सांगतेय की, विखाराचा खातमा विखारानं नाही होऊ शकत, त्यासाठी शांतता आणि सौहार्दाची भूमिकाच घ्या; आणि जी चूक शेजारी पाकिस्ताननं केली, ती चूक ‘देश आणि समाज’ म्हणून तुम्ही करू नका! फहमिदा रियाज त्यांचं नाव. ‘तुम बिलकुल हम जैसे निकले’ असं म्हणणारी आणि पाकिस्तानातल्या धर्मवेड्यांच्या चुकांचा पाढा वाचत भारतीय जनतेला सावध राहा म्हणणारी त्यांची कविता सोशल नेटवर्किंग साईट्सवर फॉरवर्डच्या चक्रात सध्या लोकप्रिय झाली आहे. त्यांच्याशी थेट पाकिस्तानात कराचीला संपर्क साधला. तेव्हा ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, धार्मिक उन्मादाचा रस्ता जगणं खाक करून माणसांना जिवंतपणी नरकयातना कशा देतो याचं ढळढळीत उदाहरण असलेला देश तुमच्या शेजारी आहे, आमच्याकडे पाहा, आम्ही केली ती चूक तुम्ही करू नका!’ज्येष्ठ पाकिस्तानी कवी, लेखिका आणि कार्यकर्त्या म्हणून फहमिदा रियाज यांचं उर्दू साहित्यात मोठं नाव आहे. आपल्या लेखन आणि विचारस्वातंत्र्यांसाठी त्यांनी पाकिस्तानात अनंत यातना सोसल्या. जनरल झिया उल हक यांच्या कारकिर्दीत तर त्यांना आपल्या लेखनशैलीमुळे थेट तुरुंगवास भोगावा लागला. पाकिस्तानात जगणं दुश्वार झालं म्हणून स्वत:च्याच देशातून हद्दपार होत भारतात आश्रय घ्यावा लागला. १९८१ ते १९८७ या काळात त्या भारतात राहत होत्या आणि भारत सरकारनं त्यांना आसरा दिला होता. आपल्या लेखनासाठी हद्दपार होणं पत्करलेल्या फहमिदा रियाज यांचं म्हणणंच आहे की, लेखनस्वातंत्र्य फुकट मिळत नाही. लेखकाला आपल्या शब्दाची किंमत मोजावीच लागते. ती मोजली तर लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात. कथनी आणि करणीत अंतर दिसलं तर लोकांनी तरी काय म्हणून बुद्धिवाद्यांवर विश्वास ठेवावा?आपल्या परखड विचारांची जबर किंमत मोजलेल्या फहमिदा रियाज यांच्याशी झालेल्या संवादाचा विशेष वृत्तांत आजच्या मंथनमधे!