शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

दारूसाठी ‘योगी’ पॅटर्न!

By admin | Updated: April 4, 2017 06:21 IST

योगी आदित्यनाथ सरकारने काढलेल्या एका अधिसूचनेचा आधार घेण्याच्या हालचाली महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत.

यदु जोशी,  मुंबई- राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून  ५०० मीटरच्या आतील दारूची दुकाने व  बार वाचविण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने काढलेल्या  एका अधिसूचनेचा आधार घेण्याच्या हालचाली महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. हायवेपासून ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने व बार बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दिवशीच, ३१ मार्चला योगी आदित्यनाथ सरकारने अधिसूचनेद्वारे दारू दुकाने व बारना अभय दिले. या अधिसूचनेनुसार उत्तर प्रदेशातील राज्य महामार्ग आणि बायपास असलेला शहरी भाग हा आता जिल्हा महामार्गाचा भाग बनले आहेत. तसे करताना शहरांमधील वळण रस्त्यांना मात्र राज्य राजमार्ग घोषित करण्यात आले आहे, म्हणजे स्टेट हायवे झाले. या प्रकारे आदित्यनाथ यांनी कोर्टाच्या कचाट्यातून हायवे व त्यापासून ५00 मीटरच्या अंतरातील दारू दुकाने वाचवली. कारण स्टेट हायवेबाबत कोर्टाचा काहीच आदेश नाही.महाराष्ट्रातही याच पॅटर्नप्रमाणे ज्या महापालिका, नगरपालिका हायवे स्वत:कडे घेण्यास इच्छुक नसतील, तिथे त्यांचे जिल्हा महामार्गांत रूपांतर करण्याचा विचार मंत्रालय पातळीवर सुरू झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सरकारने राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांना सुपुर्द केले वा जिल्हा महामार्ग म्हणून घोषित केले, तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल का, असा प्रश्नही समोर आला आहे. तथापि, काही ज्येष्ठ विधिज्ञांच्या मते त्यामुळे अवमान होण्याचा प्रश्नच नाही. कारण राज्य महामार्गांची मालकी वा त्यांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय हा ३१ मार्चनंतर घेतला, तरी त्याचे सरकारी परिपत्रक २००१ निघाले होते. ‘वळण रस्ता झालेला असेल, अशा ठिकाणचे राज्य व राष्ट्रीय महामार्ग हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करता येतील,’ असे त्या परिपत्रकात म्हटले होते. >प्रश्न रस्त्यांच्या देखभालीचादारू दुकाने वाचविण्यासाठी राज्य महामार्ग महापालिका, नगरपालिकांकडे सोपविणे दारू दुकाने आणि त्यातून मिळणारा महसूल यासाठी व्यवहार्य असला, तरी या रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती स्वत:च्या खजिन्यातून करणे या संस्थांना शक्य होईल का, हा प्रश्न आहे. >राष्ट्रीय महामार्गांलगत असलेली दुकाने/बार यांना अभय द्यायचे असेल, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे पर्यायाने केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील दुकाने वाचवायची, तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वाची असेल. >नितीन गडकरींची भूमिका महत्त्वाचीउत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर राखतानाच ही दुकाने वाचविण्यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करू.