शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी ‘योगी’ पॅटर्न!

By admin | Updated: April 4, 2017 06:21 IST

योगी आदित्यनाथ सरकारने काढलेल्या एका अधिसूचनेचा आधार घेण्याच्या हालचाली महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत.

यदु जोशी,  मुंबई- राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून  ५०० मीटरच्या आतील दारूची दुकाने व  बार वाचविण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने काढलेल्या  एका अधिसूचनेचा आधार घेण्याच्या हालचाली महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. हायवेपासून ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने व बार बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दिवशीच, ३१ मार्चला योगी आदित्यनाथ सरकारने अधिसूचनेद्वारे दारू दुकाने व बारना अभय दिले. या अधिसूचनेनुसार उत्तर प्रदेशातील राज्य महामार्ग आणि बायपास असलेला शहरी भाग हा आता जिल्हा महामार्गाचा भाग बनले आहेत. तसे करताना शहरांमधील वळण रस्त्यांना मात्र राज्य राजमार्ग घोषित करण्यात आले आहे, म्हणजे स्टेट हायवे झाले. या प्रकारे आदित्यनाथ यांनी कोर्टाच्या कचाट्यातून हायवे व त्यापासून ५00 मीटरच्या अंतरातील दारू दुकाने वाचवली. कारण स्टेट हायवेबाबत कोर्टाचा काहीच आदेश नाही.महाराष्ट्रातही याच पॅटर्नप्रमाणे ज्या महापालिका, नगरपालिका हायवे स्वत:कडे घेण्यास इच्छुक नसतील, तिथे त्यांचे जिल्हा महामार्गांत रूपांतर करण्याचा विचार मंत्रालय पातळीवर सुरू झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सरकारने राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांना सुपुर्द केले वा जिल्हा महामार्ग म्हणून घोषित केले, तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल का, असा प्रश्नही समोर आला आहे. तथापि, काही ज्येष्ठ विधिज्ञांच्या मते त्यामुळे अवमान होण्याचा प्रश्नच नाही. कारण राज्य महामार्गांची मालकी वा त्यांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय हा ३१ मार्चनंतर घेतला, तरी त्याचे सरकारी परिपत्रक २००१ निघाले होते. ‘वळण रस्ता झालेला असेल, अशा ठिकाणचे राज्य व राष्ट्रीय महामार्ग हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करता येतील,’ असे त्या परिपत्रकात म्हटले होते. >प्रश्न रस्त्यांच्या देखभालीचादारू दुकाने वाचविण्यासाठी राज्य महामार्ग महापालिका, नगरपालिकांकडे सोपविणे दारू दुकाने आणि त्यातून मिळणारा महसूल यासाठी व्यवहार्य असला, तरी या रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती स्वत:च्या खजिन्यातून करणे या संस्थांना शक्य होईल का, हा प्रश्न आहे. >राष्ट्रीय महामार्गांलगत असलेली दुकाने/बार यांना अभय द्यायचे असेल, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे पर्यायाने केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील दुकाने वाचवायची, तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वाची असेल. >नितीन गडकरींची भूमिका महत्त्वाचीउत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर राखतानाच ही दुकाने वाचविण्यासाठी काय करता येईल, यावर विचार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करू.