शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

होय, खुल्या अर्थव्यवस्थेचे आम्हीही समर्थक पण... :राजू शेट्टी

By admin | Updated: July 9, 2017 19:02 IST

शेतकरी संघटनेचे नेते स्व़ शरद जोशी यांनी मांडलेली खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आम्हालाही मान्य आहे, पण त्यासाठी

रमाकांत पाटील / ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 9 - शेतकरी संघटनेचे नेते स्व़ शरद जोशी यांनी मांडलेली खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आम्हालाही मान्य आहे, पण त्यासाठी कायद्यात बदलासह अनेक अडथळे असल्याने ते होईल तेव्हा होवो पण आज शेतकऱ्यांना स्वाभीमानाने उभे करायचे असेल तर त्याच्या मालाला हमीभावासाठी स्वामिनाथन आयोग लागू झालाच पाहिजे. अशी ठाम भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या ६ जुलैपासून मंदसोर, मध्यप्रदेश पासून किसान मुक्तीयात्रा निघाली आहे़ मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमार्गे विविध राज्यातून येत्या १८ जुलैला ही यात्रा दिल्लीला पोहचणार आहे़ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर पहिलीच पिपळीमंडी येथील श्रध्दांजली सभा मध्यप्रदेश सरकारच्या विरोधामुळे नियोजीत स्थळी होऊ शकली नाही़ उलट पोलिसांनी नेत्यांना अटक करुन त्यांच्याच वाहनात या आंदोलकांना यात्रेच्याच मार्गावर २५ किलोमीटर दळोदा येथे नेऊन सोडले़ या संघर्षानंतर महाराष्ट्रात यात्रेचे प्रवेश होण्यापूर्वीच शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रवी देवांग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या यात्रेला विरोध दर्शविला आहे़ या यात्रेची भूमिका व मागणी म्हणजे, शेतकऱ्यांना पुन्हा पारतंत्र्य नेण्याचाच प्रकार असल्याचा आरोप संबंधित नेत्यांवर करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमिवर रविवारी या किसान मुक्ती यात्रेतील प्रमुख नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले शेतकरी संघटनेचा नेत्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते़ कारण या संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रवी देवांग यांच्याशी काही दिवसांपूर्वीच या यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली़ त्यात त्यांचाही सहभाग होता़ मग त्यावेळी त्यांना राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांचा विचारसरणीसंदर्भात माहिती नव्हती का? त्याचवेळी त्यांनी विरोध का दर्शविला नाही़ जेव्हा यात्रा महाराष्ट्रात येते त्याच्या पूर्वसंध्येला ते विरोध दर्शवितात़ खरे तर, आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे़ शेतकऱ्यांना पुन्हा स्वाभीमानाने उभे करण्यासाठी प्रयत्न अपेक्षीत आहेत़ त्यामुळे स्व़ शरद जोशी यांची खुल्या अर्थव्यवस्थे संदर्भातील मागणीला आमचा विरोध नाही़ त्याला आमचेही समर्थन आहे़ पण, ही अर्थव्यवस्था येण्यासाठी अन्नधान्य, जिवनावश्यक वस्तू कायदा कलमच्या १९५५ चा कायद्यात बदल होण्याची गरज आहे़ या शिवाय अन्यही अनेक महत्वाच्या बाबी आहेत़ त्याची तत्काळ अंमलबजावणी शक्य नाही़ ते होईल तेव्हा होवो त्याचेही स्वागतच आहे़ पण आज शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्तीची गरज आहे़ शिवाय, त्याच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून स्वामिनाथन आयोगाने सांगितल्या प्रमाणे उत्पादन खर्चावर दीड पटीने भाव मिळणे गरजेचे आहे़ जर शेतीमालाल भाव मिळाला नाही, तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतील़ त्यामुळे या मागण्या त्वरीत लागू कराव्या यासाठी मंसुरपासून दिल्लीपर्यंतची ही यात्रा आम्ही काढली आहे़ यासंदर्भात दिल्लीला जावून जंतरमंतरवर मंदसोर येथे पोलिसांच्या गोळीबारात मुत्यूमुखी पडलेल्या ६ शेतकऱ्यांचे अस्थिकलश ठेवणार आहोत़ सर्व खासदारांना त्याच ठिकाणी श्रध्दांजलीसाठी आपण बोलावणार आहोत़ जे खासदार येतील ते शेतकऱ्यांचे समर्थक म्हणून त्यांचे स्वागत करु़ जे येणार नाहीत़ त्यांना शेतकरी विरोधक म्हणून शेतकऱ्यांसमोर उघडे पाडू़या संदर्भात संसदेच्या आगामी अधिवेशनातही आपण प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधणार आहोत़