शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

यंदा ८ ते १० टक्के विकास अपेक्षित -जेटली

By admin | Updated: July 13, 2015 04:42 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत कर संकलनात होत असलेली भरीव वाढ, देशभरात पावसाची समाधानकारक स्थिती आणि आर्थिक सुधारणांवर सरकारचा असलेला भर

राजरत्न सिरसाट / अकोला: पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, तापमानात वाढ झाल्याने ३ लाख हेक्टरवरील पिके कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट समोर दिसत असल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्हय़ात तीन लाख हेक्टरच्यावर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. पण सलग २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, माना टाकणार्‍या पिकांना जगविण्यासाठी शेतकर्‍यांना लोट्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. सलग तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजू लागली आहेत. जिल्ह्यातील खरीप पिकाचे क्षेत्रफळ ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर असून, आतापर्यंत ३ लाख हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला आहे. या पिकाला पाण्याची भरपूर व नितांत गरज असते. जून महिन्यात आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली; पण त्यानंतर २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी सैरभैर झाला आहे. २0 जूननंतर ज्यांनी पेरणी केली, त्यातील अर्धे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी अगोदरच प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे पीक जगले पाहिजे म्हणून शेतकरी लोट्याने पाणी देऊन पिके जगविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

पावसाची नितांत गरज

येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास उर्वरित पिके जळण्याची शक्यता आहे. प्रखर तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्याने पिकांना जमिनीतील ओलाव्याचा आधार संपला आहे. त्यामुळे आता पाणीच हवे आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादनावर होणार परिणाम

यंदा वेळेवर झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण, याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, कापसाचे उत्पादन २५ ते ३0 टक्के घटण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

पिकांची वाढ खुंटली

जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर अनेकांनी पेरणी केली, पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून, त्यांनी माना टाकल्या आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यांना पाण्याचा काटेकोर वापर करावा लागत आहे. ज्यांच्याकडे कोणतीच सोय नाही, त्यांना पिके जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कीटकनाशकांचा खर्च वाढतोय!

पावसाच्या दीर्घ उघाडीमुळे सोयाबीन, कापूस पिकावर कीड, रोगराई वाढत असून, शेतकर्‍यांना कीटकनाशके, खताचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक बोजा वाढत असून, शेतकर्‍यांना विविध ठिकाणाहून कर्ज काढावे लागत आहे.