शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

यंदा ८ ते १० टक्के विकास अपेक्षित -जेटली

By admin | Updated: July 13, 2015 04:42 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत कर संकलनात होत असलेली भरीव वाढ, देशभरात पावसाची समाधानकारक स्थिती आणि आर्थिक सुधारणांवर सरकारचा असलेला भर

राजरत्न सिरसाट / अकोला: पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, तापमानात वाढ झाल्याने ३ लाख हेक्टरवरील पिके कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट समोर दिसत असल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्हय़ात तीन लाख हेक्टरच्यावर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. पण सलग २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, माना टाकणार्‍या पिकांना जगविण्यासाठी शेतकर्‍यांना लोट्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. सलग तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजू लागली आहेत. जिल्ह्यातील खरीप पिकाचे क्षेत्रफळ ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर असून, आतापर्यंत ३ लाख हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला आहे. या पिकाला पाण्याची भरपूर व नितांत गरज असते. जून महिन्यात आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली; पण त्यानंतर २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी सैरभैर झाला आहे. २0 जूननंतर ज्यांनी पेरणी केली, त्यातील अर्धे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी अगोदरच प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे पीक जगले पाहिजे म्हणून शेतकरी लोट्याने पाणी देऊन पिके जगविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

पावसाची नितांत गरज

येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास उर्वरित पिके जळण्याची शक्यता आहे. प्रखर तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्याने पिकांना जमिनीतील ओलाव्याचा आधार संपला आहे. त्यामुळे आता पाणीच हवे आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादनावर होणार परिणाम

यंदा वेळेवर झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण, याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, कापसाचे उत्पादन २५ ते ३0 टक्के घटण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

पिकांची वाढ खुंटली

जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर अनेकांनी पेरणी केली, पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून, त्यांनी माना टाकल्या आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यांना पाण्याचा काटेकोर वापर करावा लागत आहे. ज्यांच्याकडे कोणतीच सोय नाही, त्यांना पिके जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कीटकनाशकांचा खर्च वाढतोय!

पावसाच्या दीर्घ उघाडीमुळे सोयाबीन, कापूस पिकावर कीड, रोगराई वाढत असून, शेतकर्‍यांना कीटकनाशके, खताचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक बोजा वाढत असून, शेतकर्‍यांना विविध ठिकाणाहून कर्ज काढावे लागत आहे.