शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

यंदा ८ ते १० टक्के विकास अपेक्षित -जेटली

By admin | Updated: July 13, 2015 04:42 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत कर संकलनात होत असलेली भरीव वाढ, देशभरात पावसाची समाधानकारक स्थिती आणि आर्थिक सुधारणांवर सरकारचा असलेला भर

राजरत्न सिरसाट / अकोला: पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, तापमानात वाढ झाल्याने ३ लाख हेक्टरवरील पिके कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट समोर दिसत असल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्हय़ात तीन लाख हेक्टरच्यावर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. पण सलग २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, माना टाकणार्‍या पिकांना जगविण्यासाठी शेतकर्‍यांना लोट्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. सलग तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजू लागली आहेत. जिल्ह्यातील खरीप पिकाचे क्षेत्रफळ ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर असून, आतापर्यंत ३ लाख हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला आहे. या पिकाला पाण्याची भरपूर व नितांत गरज असते. जून महिन्यात आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली; पण त्यानंतर २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी सैरभैर झाला आहे. २0 जूननंतर ज्यांनी पेरणी केली, त्यातील अर्धे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी अगोदरच प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे पीक जगले पाहिजे म्हणून शेतकरी लोट्याने पाणी देऊन पिके जगविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

पावसाची नितांत गरज

येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास उर्वरित पिके जळण्याची शक्यता आहे. प्रखर तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्याने पिकांना जमिनीतील ओलाव्याचा आधार संपला आहे. त्यामुळे आता पाणीच हवे आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादनावर होणार परिणाम

यंदा वेळेवर झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण, याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, कापसाचे उत्पादन २५ ते ३0 टक्के घटण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

पिकांची वाढ खुंटली

जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर अनेकांनी पेरणी केली, पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून, त्यांनी माना टाकल्या आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यांना पाण्याचा काटेकोर वापर करावा लागत आहे. ज्यांच्याकडे कोणतीच सोय नाही, त्यांना पिके जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कीटकनाशकांचा खर्च वाढतोय!

पावसाच्या दीर्घ उघाडीमुळे सोयाबीन, कापूस पिकावर कीड, रोगराई वाढत असून, शेतकर्‍यांना कीटकनाशके, खताचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक बोजा वाढत असून, शेतकर्‍यांना विविध ठिकाणाहून कर्ज काढावे लागत आहे.