शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

यशवंतराव यांनीही साजरी केली होती सैनिकांसोबत दिवाळी

By admin | Updated: November 1, 2016 18:52 IST

काश्मीरच्या सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. दररोज एखादा दुसरा भारतीय जवान शहीद झाल्याची बातमी कानावर येत आहे. अशा परिस्थितीत सैनिकांचे

आॅनलाइन लोकमत
क-हाड (सातारा), दि. 01 : काश्मीरच्या सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. दररोज एखादा दुसरा भारतीय जवान शहीद झाल्याची बातमी कानावर येत आहे. अशा परिस्थितीत सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली अन् लाखो भारतीयांना माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आठवण आली. पंतप्रधान मोदी यांचा सीमेवरील दिवाळीच्या फोटोबरोबर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही सीमेवरील सैनिकांबरोबरील दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर सध्या फिरत आहेत.
सध्या पाकिस्तान बरोबर चीनने देखील भारताविरोधातील आपल्या कुरापती वाढविल्या आहेत. सीमेवरील खडाजंगीत भारतीय जवान शहीद होताना पाहायला मिळत आहेत. उरी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. मात्र, त्यांचे वीरमरण वाया न जाऊ देता ‘सर्जिकल स्ट्राईक’ च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी त्याला चोख उत्तर दिले. मात्र, तरीही शेजारील काही राष्ट्रांकडून कुरघोड्या थांबलेल्या दिसत नाहीत. अशावेळी सैनिकांचे मनोबल, मनोधैर्य वाढविणे अत्यावश्यक आहे. तीच बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी आपली दिवाळी चीनच्या सीमेवर सैनिकांबरोबर साजरी केली. ही बाब कौतुकाची आहे. अशावेळी ‘हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ या काव्यपक्ती ज्यांच्यासाठी गायल्या जातात. त्या यशवंतराव यांची आठवण प्रकर्षाने होते.
१९६२ मध्ये भारताला अपमानास्पद परिस्थितीत सीमेवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळची राजकीय परिस्थितीही अस्थिर होती. निर्णय क्षमतेचा अभाव जाणवत होता. तेव्हा पंतप्रधान असणाºया पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणा-या क-हाडच्या सुपुत्राला संरक्षणमंत्री म्हणून बोलावले. हाकेला साथ देत चव्हाण हे संरक्षणमंत्री म्हणून कामाला लागले. पराभवाची कारण मिमांसा शोधली. त्रुटींचा आढावा घेतला. अन् सैन्य दलाचे पुर्नगठण करीत सक्षम संरक्षणदल उभे करण्याचे काम केले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी देखील असेच सीमेवर जाऊन सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली होती. नरेंद्र मोदी आज तीच वाट चोखाळत आहेत. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून केलेले काम, घेतलेले निर्णय खरच इतरांच्या अभ्यासासाठी योग्य आहेत. त्यांनीही संरक्षणमंत्री असताना सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी ससाजरी केली होती.
- मोहनराव डकरे, सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, क-हाड