शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
5
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
6
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
9
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
10
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
11
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
12
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
13
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
14
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
15
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
16
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
17
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
18
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
19
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
20
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

शेतीला जागतिक बँकेचे सहाय्य

By admin | Updated: August 12, 2016 04:33 IST

विदर्भ, मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा खोऱ्यामधील खारपाण (क्षारयुवक्त) पट्टयातील सुमारे ९०० गावांमध्ये जागतिक

मुंबई : विदर्भ, मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा खोऱ्यामधील खारपाण (क्षारयुवक्त) पट्टयातील सुमारे ९०० गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. हवामानातील लक्षणीय बदलांमुळे राज्यात दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई आणि अतिवृष्टी यासारखी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे कृषी उत्पादन व उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात घट होऊन कृषी विकासाचा दर लक्षणीयरित्या घटू शकतो. या नैसिर्गक आव्हानाला सामोरे जाण्याबरोबरच कृषी क्षेत्र शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हवामान बदलानुकूल असा कृषी क्षेत्राचा विकास करणारा हा प्रकल्प असेल. कृषी विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने असे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.हवामान अनुकूल कृषी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल, प्रकल्प अंमलबजावणीचा कृती आराखडा आणि विविध कार्यप्रणाली पुस्तिका तयार करण्यात येणार आहे.प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथे प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक २३ पदांच्या निर्मितीस मान्यतादेण्यात आली. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून ४ हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. खासगी आयुर्वेद-युनानी महाविद्यालयांत पेन्शनशासन अनुदानित खासगी १६ आयुर्वेद आणि ३ युनानी १९ महाविद्यालयांसह एका संलग्न रुग्णालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व उपदान देण्याचा निर्णयही झाला. कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयात निश्चित केलेल्या दिनांकापूर्वीचे प्रत्यक्ष निवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.प्रत्येक जिल्ह्यात खनिज प्रतिष्ठानखाणबाधित क्षेत्र आणि नागरिकांचा विकास करण्यासाठी बृह्नमुंबई वगळून प्रत्येक जिल्ह्यात खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रतिष्ठानचा कक्ष राहणार आहे. हे प्रतिष्ठान एक विश्वस्त संस्थाम्हणून ना नफा - ना तोटा तत्त्वावर कार्य करणार आहे. पालकमंत्री प्रतिष्ठानचे पदसिद्ध अध्यक्ष तर प्राधान्याने खाण बाधित क्षेत्रातील विधानसभा - विधानपरिषद सदस्यांपैकी ३ सदस्य पदसिद्ध सदस्य असणार आहेत. रास्तभाव दुकानदारांच्या रिबेटमध्ये ७३ टक्के वाढराज्यातील शिधावाटप दुकानदारांच्या वाहतूक रिबेटमध्ये प्रति क्विंटल ७३ टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. २००५ नंतर प्रथमच अशी वाढ करण्यात आली आहे.राज्यातील रास्तभाव दुकानदारांना तीन प्रकारानुसार वाहतूक रिबेटदिले जात असून त्यात ७३ टक्के वाढ होणार आहे. नव्या दरानुसार मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र व पुणे, नागपूर, सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी (अंतर विचारात न घेता) ८.४३ रु पयांऐवजी १४.५८ रुपये, उर्वरित महाराष्ट्रात गोदामापासून २० किलोमीटर अंतरापर्यंत ९.५६ ऐवजी १६.५३ रु पये तर गोदामापासून २० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास ११.२४ ऐवजी १९.४४ रूपये रिबेट प्रति क्विंटलनुसार मंजूर करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)