शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

चौथ्या दिवशीही कामकाज रोखले

By admin | Updated: July 17, 2015 00:23 IST

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज सलग चौथ्या दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी कामकाज रोखून धरल्याने जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या.

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज सलग चौथ्या दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी कामकाज रोखून धरल्याने जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. विरोधकांना चर्चाच होऊ द्यायची नाही, राजकीय हेतूने सभागृहाचा वेळ वाया घालविला जात असल्याची टीका सभागृह नेते व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये कर्जमाफीवर चर्चेची मागणी केली. शेतकऱ्यांनी पेरणी करून २५ दिवस उलटले तरी पावसाची चिन्हे नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी, अशी मागणी मुंडे यांनी केली. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर विरोधी सदस्यांनी थेट वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. तेवढ्यात खडसे बोलायला उभे राहताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. त्यामुळे चिडलेल्या खडसेंनी विरोधकांना धारेवर धरले. विरोधक राजकीय हेतूने गोंधळ घालत आहेत. या गदारोळामुळे साडेतीन दिवस सभागृहाचे कामकाज चालू शकले नाही. जनतेचा पैसा विनाकारण वाया जात आहे. चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग निघेल; मात्र विरोधकांना चर्चाच करायची नाही, अशी टीका खडसे यांनी केली. तरीही विरोधकांची घोषणाबाजी सुरू राहिल्याने अखेर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी १ तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतरही परिस्थिती तीच राहिल्याने अनुक्रमे वीस मिनिटे आणि एक तासासाठी सभागृह तहकूब झाले. चौथ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेंव्हा मंत्री प्रकाश मेहता यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहन केले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यात चर्चा झाली. या वेळी विरोधकांचा गैरसमज झाला असून कर्जमाफी देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले नव्हते. तर, कर्जमाफी हा एकमेव मार्ग नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे विरोधकांनी चर्चेला सुरुवात करावी, असे आवाहन केले. प्रकाश मेहता यांच्या आवाहनानंतर सभागृहात नियम २६० अन्वये शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर चर्चेला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)खडसेंची खदखद सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापतींनी विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी द्यावी. नेत्यांच्या छोटेखानी भाषणानंतर लागलीच विरोधी सदस्यांनी गदारोळाला सुरुवात करावी, हा क्रम सलग चौथ्या दिवशी कायम राहिला.सभागृह नेते असणाऱ्या खडसेंना या काळात आपले बोलणेच पूर्ण करता आले नाही. त्यामुळे आज जेंव्हा खडसेंना बोलायची संधी मिळाली तेंव्हा, ‘सभागृह नेत्याला अधूनमधून का होईना बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आभारी आहे,’ असे म्हणत खडसेंनी आपली खदखद व्यक्त केली.