शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

रस्त्याअभावी ऊस गाळपाविना शेतातच

By admin | Updated: March 6, 2017 01:32 IST

मुरूम (ता. बारामती) येथील म्हसोबावस्ती हद्दीमधील सुमारे ४० एकर क्षेत्रातील ऊस रस्ताच नसल्याने गाळपाअभावी शेतातच उभा आहे.

सोमेश्वरनगर : मुरूम (ता. बारामती) येथील म्हसोबावस्ती हद्दीमधील सुमारे ४० एकर क्षेत्रातील ऊस रस्ताच नसल्याने गाळपाअभावी शेतातच उभा आहे. याबाबत रस्त्याचा वाद मिटविण्याबाबत ग्रामस्थ हतबल झाल्यामुळे अखेर हा वाद तहसीलदारांकडे गेला आहे.मात्र, याबाबत अजूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. मुरूम (ता. बारामती) गावच्या अंतर्गत येणाऱ्या म्हसोबावस्ती या ठिकाणी सुमारे अडीचशे एकर क्षेत्र आहे. यातील जवळपास २५ शेतकऱ्यांचा ४० एकर ऊस आहे. मात्र, हा रस्ता अडविला गेल्याने ४० एकर क्षेत्रातील ऊस शेतातच वाळून चालला आहे. तर दुसरीकडे सोमेश्वर कारखाना अजून केवळ दोन दिवस सुरू असल्याने रस्त्याचा वाद लवकरात लवकर मिटणे आवश्यक आहे. कारखाना बंद झाल्यास या शेतकऱ्यांना माळेगाव कारखान्याला ऊस घातल्याशिवाय पर्याय नाही. या ४० एकर क्षेत्रातील १५ एकर ऊस जळाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या उसाला चांगला दर असून ४० एकरातील जवळपास दीड हजार टन रस्त्याअभावी शेतातच उभा आहे. जर रस्त्याचा वाद मिटला नाही तर या २५ शेतकऱ्यांचे जवळपास ५० लाख रुपयांच्या आसपास नुकसान होणार आहे. गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी अडविलेल्या रस्त्याबाबत अनेक वेळा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्यांना अपयश आले. यानंतर याबाबत बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार हनुमंत पाटील हे घटनास्थळी भेट देऊन ज्यांनी रस्ता अडविला आहे. त्यांनर रस्ता मोकळा करून द्यावा, असे सांगून पिकाचे नुकसान होऊ देऊ नका अशी विनंती केली. मात्र कालही रस्ता वाहतुकीस खुला न झाल्याने आज या २५ शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठले. (वार्ताहर)>हा रस्ता कुठे गायब होतो...सोमेश्वर कारखाना १९६५मध्ये स्थापन झाला. तेव्हापासून मुरूम गावातील म्हसोबावस्ती याठिकाणी अडीचशे एकर क्षेत्राचा रस्ता सुरू होता. कारखाना स्थापनेपासून याच रस्त्याने सोमेश्वर कारखान्याला ऊस घातला गेला आहे. मग आत्ताच अचानक हा रस्ता कुठे गायब होतो, असा सवाल मुरूम ग्रामस्थांनी केला आहे.