शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 4, 2014 18:54 IST

महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असे सांगत राज्याच्या विकासासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत देण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ४- एकेकाळी देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य असणारे, देशातील लाखो तरूणांना रोजगार देणारे महाराष्ट्र राज्य पिछाडीवर पडले असल्याचे सांगत महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले. मात्र बीडमधील सभेप्रमाणेच त्यांनी औरंगाबादमध्येही शिवसेनेवर बोलणे टाळले. 
आघाडी सरकारने १५ वर्षांत महाराष्ट्र उध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे, एकेकाळी गुजरात महाराष्ट्राकडे पाहून अनेक गोष्टी शिकला, मात्र आता तोच महाराष्ट्र राज्य पिछाडीवर आहे. साक्षरतेत महाराष्ट्राचा १२ वा क्रमांक आहे तर विकास दराच्या बाबतीत राज्य ६व्या स्थानावर आहे, इतर अनेक छोटी-छोटी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे निघून जात असताना महाराष्ट्र मात्र मागेच राहिला असे सांगत हे सर्व आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याची टीका त्यांनी केली. मात्र आता वातावरम बदलले असून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे असे ते म्हणाले. 
औरंगाबादमध्ये पर्यटनाच्या खूप संधी असून अजिंठा-एलोराच्यामुळे देश-विदेशातलील पर्यटक येथे आकर्षित होतील, तरूणांना रोजगार मिळेल मात्र त्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गरीबांच्या फायद्यांसाठी काँग्रेसने बँकांचे राष्ट्रीयकरण केले, मात्र बँकेत गरीब दिसतात का असा प्रश्न विचारत आमच्या सरकाराने गरीबांसाठी जन-धन योजना आणल्याचे व त्या अंतर्गत ३ हजार कोटी रुपये जमा झाल्याचे मोदींनी सांगितले. गेली ६० वर्ष ज्यांनी सत्ता गाजवली त्यांनी काही काम केले नसतानाही तेच लोक माझ्याकडे ६० दिवसांचा हिशोब मागत असल्याची टीकाही त्यांनी केली.