शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 4, 2014 18:54 IST

महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असे सांगत राज्याच्या विकासासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत देण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ४- एकेकाळी देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य असणारे, देशातील लाखो तरूणांना रोजगार देणारे महाराष्ट्र राज्य पिछाडीवर पडले असल्याचे सांगत महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले. मात्र बीडमधील सभेप्रमाणेच त्यांनी औरंगाबादमध्येही शिवसेनेवर बोलणे टाळले. 
आघाडी सरकारने १५ वर्षांत महाराष्ट्र उध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे, एकेकाळी गुजरात महाराष्ट्राकडे पाहून अनेक गोष्टी शिकला, मात्र आता तोच महाराष्ट्र राज्य पिछाडीवर आहे. साक्षरतेत महाराष्ट्राचा १२ वा क्रमांक आहे तर विकास दराच्या बाबतीत राज्य ६व्या स्थानावर आहे, इतर अनेक छोटी-छोटी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे निघून जात असताना महाराष्ट्र मात्र मागेच राहिला असे सांगत हे सर्व आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याची टीका त्यांनी केली. मात्र आता वातावरम बदलले असून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे असे ते म्हणाले. 
औरंगाबादमध्ये पर्यटनाच्या खूप संधी असून अजिंठा-एलोराच्यामुळे देश-विदेशातलील पर्यटक येथे आकर्षित होतील, तरूणांना रोजगार मिळेल मात्र त्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गरीबांच्या फायद्यांसाठी काँग्रेसने बँकांचे राष्ट्रीयकरण केले, मात्र बँकेत गरीब दिसतात का असा प्रश्न विचारत आमच्या सरकाराने गरीबांसाठी जन-धन योजना आणल्याचे व त्या अंतर्गत ३ हजार कोटी रुपये जमा झाल्याचे मोदींनी सांगितले. गेली ६० वर्ष ज्यांनी सत्ता गाजवली त्यांनी काही काम केले नसतानाही तेच लोक माझ्याकडे ६० दिवसांचा हिशोब मागत असल्याची टीकाही त्यांनी केली.