शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 4, 2014 18:54 IST

महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असे सांगत राज्याच्या विकासासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत देण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ४- एकेकाळी देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य असणारे, देशातील लाखो तरूणांना रोजगार देणारे महाराष्ट्र राज्य पिछाडीवर पडले असल्याचे सांगत महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले. मात्र बीडमधील सभेप्रमाणेच त्यांनी औरंगाबादमध्येही शिवसेनेवर बोलणे टाळले. 
आघाडी सरकारने १५ वर्षांत महाराष्ट्र उध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे, एकेकाळी गुजरात महाराष्ट्राकडे पाहून अनेक गोष्टी शिकला, मात्र आता तोच महाराष्ट्र राज्य पिछाडीवर आहे. साक्षरतेत महाराष्ट्राचा १२ वा क्रमांक आहे तर विकास दराच्या बाबतीत राज्य ६व्या स्थानावर आहे, इतर अनेक छोटी-छोटी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे निघून जात असताना महाराष्ट्र मात्र मागेच राहिला असे सांगत हे सर्व आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याची टीका त्यांनी केली. मात्र आता वातावरम बदलले असून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे असे ते म्हणाले. 
औरंगाबादमध्ये पर्यटनाच्या खूप संधी असून अजिंठा-एलोराच्यामुळे देश-विदेशातलील पर्यटक येथे आकर्षित होतील, तरूणांना रोजगार मिळेल मात्र त्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गरीबांच्या फायद्यांसाठी काँग्रेसने बँकांचे राष्ट्रीयकरण केले, मात्र बँकेत गरीब दिसतात का असा प्रश्न विचारत आमच्या सरकाराने गरीबांसाठी जन-धन योजना आणल्याचे व त्या अंतर्गत ३ हजार कोटी रुपये जमा झाल्याचे मोदींनी सांगितले. गेली ६० वर्ष ज्यांनी सत्ता गाजवली त्यांनी काही काम केले नसतानाही तेच लोक माझ्याकडे ६० दिवसांचा हिशोब मागत असल्याची टीकाही त्यांनी केली.