शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

विजेते कामगार बेपत्ता

By admin | Updated: July 13, 2015 01:49 IST

गिरणी कामगारांच्या घराच्या लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्या ३५६ गिरणी कामगारांचा म्हाडाने आवाहनामार्फत शोध घेतल्यानंतरही अद्यापपर्यंत या कामगारांचा

तेजस वाघमारे , मुंबईगिरणी कामगारांच्या घराच्या लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्या ३५६ गिरणी कामगारांचा म्हाडाने आवाहनामार्फत शोध घेतल्यानंतरही अद्यापपर्यंत या कामगारांचा थांगपत्ता लागलेला नाही. म्हाडाने विजेत्या कामगारांना कागदपत्रे सादर करण्याच्या केलेल्या आवाहनाला किरकोळ प्रतिसाद लाभल्याने म्हाडाने अखेर ही घरे प्रतीक्षा यादीतील कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे.मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार २८ जून २0१२ रोजी म्हाडाने ६ हजार ९२५ गिरणी कामगारांच्या घराची लॉटरी काढली. या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या कामगारांकडून म्हाडाने कागदपत्रे मागविली होती. त्यानुसार विजेत्या कामगारांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर म्हाडामार्फत छाननीची प्रक्रिया पूर्ण करुन सुमारे ५ हजार ५९५ गिरणी कामगारांना घराचा ताबा देण्यात आला आहे.गिरणी कामगारांच्या लॉटरीत यशस्वी झालेल्या ३९६ गिरणी कामगारांनी गेल्या तीन वर्षांमध्ये म्हाडाकडे पाठपुरावा केलेला नाही. कागदपत्रे सादर न केलेल्या विजेत्या कामगारांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन म्हाडाने केले होते. त्यासाठी १५ जूनपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये केवळ ४0 विजेत्या कामगारांनी म्हाडाकडे कागदपत्रे सादर केली. उर्वरित ३५६ विजेत्या कामगारांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे म्हाडाकडे सादर केलेली नाहीत. त्यामुळे म्हाडाने लॉटरीमधील प्रतिक्षा यादीतील कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने शासनाकडे पाठविला असल्याचे, म्हाडाच्या मिळकत व्यवस्थापन विभागाचे उपमुख्य अधिकारी विशाल देशमुख यांनी सांगितले.या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळाल्यास प्रतीक्षा यादीतील ३५६ गिरणी कामगारांचे घराचे स्वप्न पूर्ण पूर्ण होणार आहे.