शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

एसटीचे संचालकपद शोभेपुरते ठरणार?

By admin | Updated: September 13, 2014 04:37 IST

विधानसभा निवडणुका आणि त्वरित लागणारी आचारसंहिता पाहता राष्ट्रवादीने चार पदाधिकाऱ्यांची एसटीच्या संचालक मंडळावर वर्णी लावली.

मुंबई : विधानसभा निवडणुका आणि त्वरित लागणारी आचारसंहिता पाहता राष्ट्रवादीने चार पदाधिकाऱ्यांची एसटीच्या संचालक मंडळावर वर्णी लावली. मात्र आता शुक्रवारी राज्याच्या निवडणुकांच्या जाहीर झालेल्या तारखेमुळे आचारसंहिता लागली असून, संचालक मंडळाची एकही बैठक यापुढे होणार नाही. मुळात ज्याची सत्ता त्या पक्षाचे सदस्य असा नियम संचालक सदस्य मंडळासाठी असून, येत्या विधानसभा निवडणुकीत वेगळा निकाल लागल्यास पुन्हा नवीन सदस्य येऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीने या सदस्यांची वर्णी लावून नेमके साध्य केले काय, असा प्रश्न एसटीच्या वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसने मात्र अद्याप एकही सदस्य नेमलेला नाही. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळावर १२ सदस्य असतात. यात एसटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कामगार आयुक्त आणि परिवहन आयुक्त यांचा समावेश असतो. तर उर्वरित आठ अशासकीय सदस्य असतात. राज्यात ज्यांची सत्ता त्यांचे सदस्य असा नियम असून, सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने आठही सदस्य या पक्षाचे असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळ आठही सदस्य काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नेमले नव्हते. मुळात राष्ट्रवादीकडून जरी चार पदाधिकाऱ्यांची सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली असली तरी त्याचा फारसा फायदा ना पक्षाला ना या सदस्यांना मिळणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे एसटीच्या संचालक मंडळाची एकही बैठक होणार नाही. त्यामुळे या नवीन सदस्यांना थेट निवडणुका झाल्यानंतरच संचालक मंडळाच्या बैठकीला हजर राहावे लागेल. पण या सदस्यांसमोर आणखी एक अडचण म्हणजे विधानसभा निवडणुकीत वेगळा निकाल लागल्यास नवीन आलेल्या सत्तेमुळे पायउतारही होण्याची वेळ येऊ शकते, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले. याबाबत एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. संचालक मंडळाच्या या सदस्यांचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो. मात्र येणारी नवीन सत्ता हे सदस्य पुढे ठेवायचे की नाही याचा निर्णय घेईल. सध्या एसटी आर्थिक संकटात असून, त्यामुळे नवीन सदस्य नेमून त्यांना भत्ता, महामंडळाच्या वेगवेगळ्या समित्यांवर नियुक्त्या करून महामंडळावर भार न टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. त्या-त्या जिल्ह्यात या पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत कुठलाही फटका बसू नये यासाठीच ही वर्णी लावण्यात आली. मात्र ती कितपत यशस्वी ठरेल हा मोठा प्रश्न आहे.