शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शाहरूख, आमीर के अब आयेंगे बुरे दिन?

By admin | Updated: May 20, 2014 02:57 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींविषयी अनेक मतप्रवाह निर्माण झाले होते. त्यात बॉलीवूडकरही मागे नव्हते.

अनुज अलंकार, मुंबई - लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींविषयी अनेक मतप्रवाह निर्माण झाले होते. त्यात बॉलीवूडकरही मागे नव्हते. एकीकडे देशात मोदी पंतप्रधान झाल्यास चांगले दिवस येतील, असे सांगितले जात असतानाच काही कलाकारांनी केलेल्या वक्तव्याने वादही झाले. सलमान खान कुटुंबीय, अजय देवगण, अक्षय कुमार हे मोदींचे समर्थक मानले जातात. त्यांनी नेहमीच मोदींना साथ दिली आहे. तर शाहरूख खान, आमीर खान, मुकेश भट्ट अशा अनेक कलाकारांनी मोदींना विरोध केला होता. शाहरूखने तर टिष्ट्वटरवरून मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडेन, असेही वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या निकालानुसार मोदीच पंतप्रधान होणार हे आता स्पष्टच झाले आहे. या गोष्टींचा अनेकांना आनंद होत असताना बॉलीवूडमधील शाहरूख, आमीर यांच्यासाठी मात्र वाईट दिवसांना सुरुवात झाली आहे, अशी चर्चा सुरू आहे. मध्यंतरी शाहरूखने टिष्ट्वटरच्या माध्यमातून मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन, असे म्हटले होते. शाहरूखच्या या वक्तव्याची आठवण सोशल मीडियाकडून होत असून, देश कधी सोडणार?, अशा आशयाचे अनेक संदेश व्यक्त होत आहेत. यामुळे चिडलेल्या शाहरूखने रविवारी संध्याकाळी पुन्हा टिष्ट्वट करून आपल्यावरील आरोपाचे खंडन करीत आपल्याविरुद्ध चाललेली बदनामी बंद करावी, असे आवाहन केले. त्यामुळे लोकांना त्याची मजा घेण्यासाठी अधिकच संधी मिळाली आहे. सुरुवातीपासूनच शाहरूख काँग्रेस समर्थक आहे. राहुल आणि प्रियंकासोबत त्याचे अगदी जवळचे संबंध आहेत. शाहरूखच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यात दोघेही अनेकदा येतात. तसेच त्यांच्यासाठी शाहरूखच्या चित्रपटाचे विशेष खेळ आयोजित केले जातात, हे सर्वश्रुत आहे. त्यातच शाहरूखने मोदींविरोधात दिलेल्या टिष्ट्वटमुळे आपण भाजपाच्या विरोधात आहोत हेच त्याने दाखवून दिले. शाहरूखपेक्षा आमीर खानसोबत मोदींचे संबंध सुरुवातीपासूनच वाईट आहेत. खरेतर, आमीर काँग्रेसचा समर्थक नाही. वैचारिकदृष्ट्या तो आम आदमी पक्षाच्या जवळचा मानला जातो. पण त्याने कधीही मोदींच्या विचारसरणीला तसेच भाजपालाही समर्थन दिलेले नाही हे तितकेच खरे. मोदींचा आमीरवर राग असण्याचे खरे कारण नर्मदा बचाव आंदोलनातील त्याचा सहभाग हे आहे. त्याने त्यास समर्थन दिल्यावर मोदी त्याच्यावर नाराज झाले होते. आंदोलनाला आमीरने दिलेली साथ, त्या वेळी केलेले व्यक्तव्य हा गुजरातचा अपमान असल्याची मोदींची धारणा होती. या नाराजीचा परिणाम आमीरच्या ‘फना’ चित्रपटावरही दिसून आला. त्या काळात हा चित्रपट गुजरातमधील एकाही चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला नाही. त्यामुळेही वाद निर्माण झाले होते. यांपैकी सलमान खान मात्र मोदींच्या जवळचा मानला जातो. जानेवारीत त्याचा ‘जय हो’ चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्या काळात अहमदाबादमध्ये प्रमोशनसाठी गेल्यावर मोदींची भेट घेत त्याने मोदींबरोबर पतंगबाजी केली होती. मोदींनीही त्या वेळी त्याचे मोकळेपणाने कौतुक केले होते. हा चित्रपट आपटला. मात्र सलमानच्या मोदीप्रेमाचा राग मुस्लीम समुदायाच्या एका वर्गाला आल्याने ‘जय हो’ चित्रपटावर परिणाम होऊन तो फ्लॉप ठरला, असेही म्हटले गेले. सलमानच्या कुटुंबीयांनीही नेहमी मोदींना साथ दिली आहे. मोदींच्या उर्दू वेबसाईटचे उद्घाटन सलमानचे वडील सलीम खान यांनी केले. तेव्हाही खूप चर्चा झाली. सलीम खान यांनी नेहमीच नरेंद्र मोदींचे कौतुुुक केले आहे; तसेच मोदींचेही सलीम खान यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. एकंदरीत मोदींविषयी बॉलीवूडमध्ये विविध मतप्रवाह असताना मोदी पंतप्रधान झाल्यावर हे मत बदलते की काही नवीन ऐकायला मिळते, ते येणार्‍या काळात कळेलच.