शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या आईपासून अधिकारी काही बोध घेतील का?

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणे स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समरसून काम केले. आजचे अधिकारी बदल्या

निवृत्त आयएएस जोशींचा बदल्या टाळणाऱ्यांना सवालयदु जोशी - नागपूरमाझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणे स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समरसून काम केले. आजचे अधिकारी बदल्या टाळण्यावर भर देतात, याची खंत वाटते. आपल्या आईपासून कोणी याबाबत बोध घेईल का, असा आर्त सवाल माजी सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त डॉ. सुरेश जोशी यांनी आज केला. वर्षानुवर्षे मुंबई, ठाणे, पुण्यात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या गडचिरोली, गोंदियासह विदर्भात आणि मराठवाड्यात बदल्या करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली असल्याचे वृत्त लोकमतने आज दिल्यानंतर डॉ. जोशी यांनी लोकमतजवळ आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, माझी आई लीलाताई ग्रामसेविका झाली व नंतर १९५९ मध्ये मुख्य सेविका. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष तेव्हा दिग्गज नेते आणि अर्थतज्ज्ञ सी.डी. देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख होत्या. माझी आई बदलीनिमित्त गावोगावी फिरली. चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, वर्धा आदी जिल्ह्यांमधील खेडी, आदिवासी गावे तिने अक्षरश: पालथी घातली आणि समाज कल्याण केंद्रांची स्थापना केली. पगार अर्थातच तुटपुंजा होता; पण ती कार्याने भारावलेली होती आणि त्यासाठी तिने कुटुंबाचे हितही बाजूला ठेवले, अशी आठवण डॉ. जोशी यांनी सांगितली.अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी गेलेच पाहिजे. शासकीय नोकरीत बदल्या हा अविभाज्य भाग आहे आणि त्यात कोणीही टाळाटाळ करू नये, असा सल्लाही डॉ. जोशी यांनी दिला. सुरेश जोशी यांच्या आईच्या शेवटच्या तीन बदल्या झाल्या तेव्हा स्वत: जोशी हे आयएएस अधिकारी होते. ते १९७० चे आयएएस अधिकारी. त्यांच्या आई १९७९ मध्ये निवृत्त झाल्या. आपल्या आईची बदली त्यांना सहज रद्द करता आली असती. पण तो विचारही आपल्या मनात तेव्हा आला नाही आणि आईने एक शब्दाने मला बदली रद्द करायला सांगितले नाही, हे सांगताना जोशी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.