शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

सिंचन घोटाळे करणा-यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणार का? उद्धव यांचा भाजपाला प्रश्न

By admin | Updated: October 30, 2014 11:51 IST

ज्या विदर्भात राष्ट्रवादीवाल्यांनी जलसिंचनाचे मोठे घोटाळे केले त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - ज्या विदर्भात राष्ट्रवादीवाल्यांनी जलसिंचनाचे मोठे घोटाळे केले त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय असा सवाल उध्व ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच सेनेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबद्दल नाराजी दर्शवत भाजपाला टोमणेही मारले आहेत.
अल्पमतातले सरकार आम्ही बनवू आणि चालवून दाखवू ही भूमिका सध्या ठीक आहे, पण असे सरकार चालवून सत्तेचा भोग घेणे घटनाविरोधी आहे असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून नाराजी व्यक्त करत सौभाग्यवतीप्रमाणे सरकारचे पावित्र्य महत्त्वाचे आहे. शरद पवार यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व कॉंग्रेसमुक्त करण्याचे वचन देऊन आपण सत्तेवर आला असताना ज्यांनी विदर्भात जलसिंचन घोटाळा केला त्यांच्याच पाठिंब्यावर सरकार चालवणार का असा खडा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. सत्ताकारण सतीसावित्रीचे नसले तरी अगदीच ऐर्‍यागैर्‍याच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे राज्य चालू नये असा इशाराही भाजपाला देण्यात आला आहे. भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीला कायमचे गाडण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आहे, पण त्याच राष्ट्रवादीने पहिल्याच दिवशी पाठिंब्याचा खेळ करून दूध नासवण्याचा प्रयत्न केला. हे नासके दूध नव्या सरकारला बाळसे देणार असेल तर हा विषय फार न लांबवता इथेच पूर्णविराम दिलेला बरा असेही लेखात म्हटले आहे. मात्र राज्य स्थिर असावे व स्थिर राज्याचा मुख्यमंत्री स्थिर असावा, अशी अपेक्षा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असल्याचे सांगत लेखातून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे. विदर्भाच्या मनातील मागासलेपणाची जळमटे दूर करण्याची जबाबदारी फडणवीस यांची आहे. विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राने पोटाशी कवटाळला आहे व रायगडावरून त्याच्यावर पुष्पवृष्टी होत आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी हे सदैव स्मरणात ठेवावे असे सांगत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही मोकळ्या मनाने स्वागत करीत असल्याचेही लेखात नमूद करण्यात आले आहे.