शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बढत्यांमधील ३३ टक्के आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:49 IST

सरकारी आणि निमसरकारी नोकºयांमध्ये सर्व पातळ््यांवर मागास वर्गांसाठी ३३ टक्के राखीव जागा ठेवण्याचा राज्य शासनाचा १३ वर्षांपूर्वीचा शासन निर्णय (जीआर) मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्याने, या काळात हजारो कर्मचाºयांना दिल्या गेलेल्या बढत्यांवर गंडांतर येणार आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई : सरकारी आणि निमसरकारी नोकºयांमध्ये सर्व पातळ््यांवर मागास वर्गांसाठी ३३ टक्के राखीव जागा ठेवण्याचा राज्य शासनाचा १३ वर्षांपूर्वीचा शासन निर्णय (जीआर) मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्याने, या काळात हजारो कर्मचाºयांना दिल्या गेलेल्या बढत्यांवर गंडांतर येणार आहे.सन २००१ मध्ये केलेल्या आरक्षण कायद्यानुसार, बढत्यांमधील आरक्षणाचा हा ‘जीआर’ २५ मे २००४ रोजी काढण्यात आला होता. सुरुवातीस त्यास उच्च न्यायालयात त्यास आव्हान दिले गेले. नंतर हे प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट)कडे वर्ग झाले व ‘मॅट’ने नोव्हेंबर २०१४ मध्ये तो घटनाबाह्य ठरवून रद्द केला. त्याविरुद्ध राज्य सरकार व मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी केलेल्या रिट याचिकांवर निकाल देताना, उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद झाले. न्या. अनूप मोहता यांनी हा ‘जीआर’ वैध ठरविला, तर न्या. अमजद सैयद यांनी तो घटनाबाह्य ठरविला. त्यामुळे मुख्य न्यायमूर्तींनी या याचिका न्या. एम. एस. सोनक या तिसºया न्याायधीशाकडे सोपविल्या. आता न्या. सोनक यांनीही न्या. सैयद यांच्याशी सहमती दर्शविल्याने, हा ‘जीआर’ दोन विरुद्ध एक अशा बहुमताच्या निकालाने घटनाबाह्य ठरला. यानुसार, पुढील औपचारिक आदेश देण्यासाठी आता हे प्रकरण पुन्हा मूळ खंडपीठापुढे जाईल.या ‘जीआर’नुसार बढत्यांमध्ये अनुसूचित जातींसाठी १३ टक्के, अनुसूचित जमातींसाठी सात टक्के व भटके, विमुक्त, विशेष मागासवर्ग आणि इतर मागासवर्ग अशांसाठी मिळून १३ टक्के आरक्षण ठेवण्यात आले होते. हे आरक्षण दोन वेगवेगळ््या कारणांसाठी घटनाबाह्य ठरविले गेले.राज्यघटनेच्या अनुच्छेद १६ (४ए) अन्वये सरकारला फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी बढत्यांमध्ये राखीव जागाठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्याखेरीज इतरांसाठी बढत्यांमध्ये केलेली आरक्षणाची तरतूद घटनाबाह्य ठरते.अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण घटनाबाह्य ठरविताना न्यायालयाने म्हटले की, हे आरक्षणही अनुच्छेद १६(४ए)च्या कक्षेत बसणारे नाही.याचे कारण असे की, ठरावीक समाजवर्ग मागास आहे, त्या समाजवर्गाला सरकारी नोकºयांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही आणि या वर्गांना आरक्षण दिल्याने, प्रशासनाच्या एकूण कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होणार नाही, या तिन्ही बाबतीत निर्णय घेण्यासाठी सबळ आकडेवारी उपलब्ध असेल, तरच सरकार असे आरक्षण ठेवू शकते. प्रस्तुत प्रकरणात असा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे कोणताही सबळ आकडेवारी नव्हती.सरकारने अशी आकडेवारी गोळा करून नव्याने निर्णय घ्यावा आणि विशेष मागासवर्गीयांचे दोन टक्के आरक्षण ५० टक्क्यांहून जास्तीचे असल्याने त्यावर मागासवर्ग आयोगाने फेरविचार करावा, असे निर्देशही न्या. सैयद यांनी दिले होते. आता न्या. सोनक यांनी त्याच्याशी असहमती दर्शविली. त्यामुळे ते बहुमताच्या निकालाने रद्द होतील.‘मॅट’ने सन २००१ चा आरक्षणाचा कायदाही घटनाबाह्य ठरवून रद्द केला होता, परंतु तिन्ही न्यायमूर्तींनी तो निकाल चुकीचा व अनाठायी ठरवून रद्द केला. त्यामुळे या कायद्याची वैधता अबाधित राहिली आहे व ती भविष्यात यथायोग्य प्रकरणात तपासली जाईल.गेल्या १३ वर्षांत हे प्रकरण एक डझनाहूनही अधिक वेळा उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेले व वेळोवेळी निरनिराळे अंतरिम आदेश दिले गेले. त्यात बढत्यांमधील सर्व आरक्षणास सुरुवातीस दिलेल्या सरसकट अंतरिम स्थगितीसह नंतर फक्त काही प्रवर्गांसाठी व ठरावीक तारखेपासून आरक्षण देण्याच्या आदेशांचा समावेश होता. यामुळे या बढत्यांमध्ये मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. असे असले, तरी सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन हे आरक्षण टिकून राहील, असा आदेश मिळविला नाही, तर गेल्या १३ वर्षांत ज्यांना कोणाला या ‘जीआर’नुसार आरक्षणाने बढत्या मिळाल्या असतील, त्या सर्व रद्द होतील. त्यामुळे सेवाज्येष्ठता याद्या पार उलट्यासुलट्या होऊन मोठा गोंधळ उडेल.