शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

वनरक्षक होणार ‘हायटेक’

By admin | Updated: October 29, 2014 00:34 IST

अत्याधुनिक शस्त्रासह अँन्ड्रॉईड मोबाईल फोनही मिळणार.

बुलडाणा : खाकी गणवेश आणि हातात काठी घेऊन जंगलाची सुरक्षा करणार्‍या वनरक्षकास हायटेक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिकारी आणि वृक्षतोड करणार्‍या टोळींचा ताकदीने सामना करण्यासाठी वनरक्षकाच्या हाती आता अत्याधुनिक शस्त्र आणि विशेष सॉफ्टवेअर असलेले अँन्ड्रॉईड फोन दिसू लागणार आहेत.वनपरिक्षेत्रात एखादी शिकार, वृक्षतोड किंवा आगीसारखी घटना घडल्यास संबंधित वन कर्मचारी घटनेचा पंचनामा करून, गुन्हा दाखल करतो. त्यानंतर तो रिपोर्ट टपालाद्वारे मुख्यालयातील वरिष्ठांकडे पाठविला जातो; मात्र या प्रक्रियेस किमान एक आठवड्याचा कालावधी लागतो. यामुळे बरेचदा वरिष्ठांना योग्य कारवाई करण्यास विलंब होतो. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध करणे कठीण होते. आता वन कर्मचारी जंगलात कोणतीही घटना घडल्यास त्याबाबतचा रिपोर्ट नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तत्काळ वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकणार आहे. याशिवाय अँन्ड्रॉईड मोबाईल फोनच्या माध्यमातून घटनेची छायाचित्रही वरिष्ठांकडे लगेच पाठविता येणार आहे. त्यामुळे वरिष्ठांना घटनेचे गांभीर्य समजण्यास मदत होईल. जंगलातील गैरकृत्यांवर आळा घालून, शिकार्‍यांवर वचक निर्माण करण्यास यामुळे मदत मिळेल. वनविभागाने प्रायोगिक तत्त्वावर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागपूर कार्यालयातील वन कर्मचार्‍यांना आधुनिक सॉफ्टवेअर असलेला अँन्ड्रॉईड मोबाईल फोन दिला आहे. *पाच हजार वनरक्षकांना लाभपेंच व्याघ्र प्रकल्पानंतर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यातील वनकर्मचार्‍यांना अत्याधुनिक शस्त्रासह अँन्ड्रॉईड मोबाईल फोन मिळणार असून, यासंदर्भात विभागीय स्तरावर प्रशिक्षणही दिले जात आहे. यात बुलडाण्याच्या अंबाबारवा अभयारण्याचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा संपूर्ण राज्यभरात सुमारे ५ हजार वनरक्षकांना लाभ मिळणार आहे.