शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा विरह असह्य झाल्याने विधवेची आत्महत्या

By admin | Updated: February 5, 2017 22:12 IST

मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 5 - वर्षभरापूर्वी मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना बसैय्यनगर येथे रविवारी (दि. ५) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.

आशा संदीप मंत्री (३५, रा. मार्तंड विहार सोसायटी, बसैय्येनगर) असे महिलेचे नाव आहे. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी आशा यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. या दाम्पत्याला मुलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर आशा एकट्याच बसैय्यनगरमधील घरी राहात होत्या. पतीचे निधन झाल्यापासून त्या नाराज राहात असत. पुढील आयुष्य एकटीला जगावे लागेल,अशी खंत त्या बोलून दाखवित असत. त्यातच त्या आजारी राहत असल्याने आयुष्य नकोसे झाल्याचे त्या शेजाऱ्यांना म्हणायच्या.

शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर त्या त्यांच्या खोलीत झोपी गेल्या. १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांनी ओढणीने पंख्याला बांधून गळफास घेत जीवयात्रा संपविली. सकाळपासून आशा यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून सोसायटीतील शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती जिन्सी पोलिसांना कळविली. माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे फौजदार बदर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आशा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृतदेह घाटीच्या शवगृहात ठेवण्यात आला.मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या माहेरच्या मंडळींना पोलिसांनी घटनेची माहिती दिली असून याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.एस. जगताप हे करत आहेत.