शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

पतीचा विरह असह्य झाल्याने विधवेची आत्महत्या

By admin | Updated: February 5, 2017 22:12 IST

मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 5 - वर्षभरापूर्वी मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना बसैय्यनगर येथे रविवारी (दि. ५) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.

आशा संदीप मंत्री (३५, रा. मार्तंड विहार सोसायटी, बसैय्येनगर) असे महिलेचे नाव आहे. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी आशा यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. या दाम्पत्याला मुलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर आशा एकट्याच बसैय्यनगरमधील घरी राहात होत्या. पतीचे निधन झाल्यापासून त्या नाराज राहात असत. पुढील आयुष्य एकटीला जगावे लागेल,अशी खंत त्या बोलून दाखवित असत. त्यातच त्या आजारी राहत असल्याने आयुष्य नकोसे झाल्याचे त्या शेजाऱ्यांना म्हणायच्या.

शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर त्या त्यांच्या खोलीत झोपी गेल्या. १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांनी ओढणीने पंख्याला बांधून गळफास घेत जीवयात्रा संपविली. सकाळपासून आशा यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून सोसायटीतील शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती जिन्सी पोलिसांना कळविली. माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे फौजदार बदर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आशा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृतदेह घाटीच्या शवगृहात ठेवण्यात आला.मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या माहेरच्या मंडळींना पोलिसांनी घटनेची माहिती दिली असून याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.एस. जगताप हे करत आहेत.