शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

पतीचा विरह असह्य झाल्याने विधवेची आत्महत्या

By admin | Updated: February 5, 2017 22:12 IST

मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 5 - वर्षभरापूर्वी मरण पावलेल्या पतीच्या विरहात एका विधवेने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना बसैय्यनगर येथे रविवारी (दि. ५) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.

आशा संदीप मंत्री (३५, रा. मार्तंड विहार सोसायटी, बसैय्येनगर) असे महिलेचे नाव आहे. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी आशा यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. या दाम्पत्याला मुलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर आशा एकट्याच बसैय्यनगरमधील घरी राहात होत्या. पतीचे निधन झाल्यापासून त्या नाराज राहात असत. पुढील आयुष्य एकटीला जगावे लागेल,अशी खंत त्या बोलून दाखवित असत. त्यातच त्या आजारी राहत असल्याने आयुष्य नकोसे झाल्याचे त्या शेजाऱ्यांना म्हणायच्या.

शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर त्या त्यांच्या खोलीत झोपी गेल्या. १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पतीच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांनी ओढणीने पंख्याला बांधून गळफास घेत जीवयात्रा संपविली. सकाळपासून आशा यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून सोसायटीतील शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती जिन्सी पोलिसांना कळविली. माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे फौजदार बदर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आशा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृतदेह घाटीच्या शवगृहात ठेवण्यात आला.मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या माहेरच्या मंडळींना पोलिसांनी घटनेची माहिती दिली असून याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.एस. जगताप हे करत आहेत.