शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत का झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:50 IST

नगरसह उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर २०१४ प्रमाणेच यंदाही भाजप-शिवसेनेनेच शत प्रतिशत कब्जा राखला आहे खरा; पण यातील किमान दोनेक जागा तरी आघाडीने निव्वळ अतिआत्मविश्वासातून गमावल्या आहेत.

किरण अग्रवाल

मोदींच्या त्सुनामीपुढे जिथे भलेभले गड कोसळले तिथे उत्तर महाराष्ट्रात वेगळा निकाल लागणे शक्यच नव्हते. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात व रोहिदास पाटील यांच्यासारख्या मातब्बरांचे नेतृत्व लाभूनही आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागल्याचे पाहता भविष्यकालीन राजकीय हवेची दिशा स्पष्ट होऊन गेली आहे.नगरसह उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर २०१४ प्रमाणेच यंदाही भाजप-शिवसेनेनेच शत प्रतिशत कब्जा राखला आहे खरा; पण यातील किमान दोनेक जागा तरी आघाडीने निव्वळ अतिआत्मविश्वासातून गमावल्या आहेत. नाशिक विभागात भाजपने यंदा दिंडोरी, नगर व जळगाव येथील तीन विद्यमान खासदारांना घरी बसवले. त्यातून समोर आलेल्या नाराजीचा लाभ प्रतिस्पर्ध्यांना घेता आला नाही. नाशिक, धुळे, नंदुरबार व शिर्डीमध्ये तर भाजपतील बंडखोर अपक्ष म्हणून उभे ठाकले होते. त्याचाही फायदा विरोधकांना उठवता आला नाही. कारण यंदा मोदी लाट नसल्याचा आडाखा बांधून विरोधक गाफिल राहिले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे झालेले मतविभाजन सत्ताधाऱ्यांच्या उपयोगी पडले असे म्हणावे, तर मग ‘मनसे फॅक्टर’ आघाडीच्या उपयोगी पडू का शकला नाही? धुळ्यातील मालेगावच्या पारंपरिक मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित गेले असते तर, आघाडीसाठी ते लाभाचे ठरले असते. दिंडोरीतील येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात स्वत: भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज आमदारकी भूषवित असतानाही तेथे राष्ट्रवादीला मताधिक्य मिळू शकले नाही. नगरची जागा तर राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली. त्यामुळे डॉ. सुजय विखे भाजपच्या वाटेवर गेले, पण तरी संग्राम जगताप सुमारे पावणेतीन लाखांपेक्षा अधिकच्या फरकाने पराभूत झाले. यातून काँग्रेस व राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारल्याचे दिसते.

समीर भुजबळांचा पराभवनाशकात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर, तर धुळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील स्वत: रिंगणात होते. शिर्डीत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या पहिल्या यादीत भाऊसाहेब कांबळे यांची उमेदवारी निश्चित करवून आणली होती; पण एक ते अडीच लाखांच्या मोठ्या फरकाने या उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले.