शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत का झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:50 IST

नगरसह उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर २०१४ प्रमाणेच यंदाही भाजप-शिवसेनेनेच शत प्रतिशत कब्जा राखला आहे खरा; पण यातील किमान दोनेक जागा तरी आघाडीने निव्वळ अतिआत्मविश्वासातून गमावल्या आहेत.

किरण अग्रवाल

मोदींच्या त्सुनामीपुढे जिथे भलेभले गड कोसळले तिथे उत्तर महाराष्ट्रात वेगळा निकाल लागणे शक्यच नव्हते. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात व रोहिदास पाटील यांच्यासारख्या मातब्बरांचे नेतृत्व लाभूनही आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागल्याचे पाहता भविष्यकालीन राजकीय हवेची दिशा स्पष्ट होऊन गेली आहे.नगरसह उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर २०१४ प्रमाणेच यंदाही भाजप-शिवसेनेनेच शत प्रतिशत कब्जा राखला आहे खरा; पण यातील किमान दोनेक जागा तरी आघाडीने निव्वळ अतिआत्मविश्वासातून गमावल्या आहेत. नाशिक विभागात भाजपने यंदा दिंडोरी, नगर व जळगाव येथील तीन विद्यमान खासदारांना घरी बसवले. त्यातून समोर आलेल्या नाराजीचा लाभ प्रतिस्पर्ध्यांना घेता आला नाही. नाशिक, धुळे, नंदुरबार व शिर्डीमध्ये तर भाजपतील बंडखोर अपक्ष म्हणून उभे ठाकले होते. त्याचाही फायदा विरोधकांना उठवता आला नाही. कारण यंदा मोदी लाट नसल्याचा आडाखा बांधून विरोधक गाफिल राहिले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे झालेले मतविभाजन सत्ताधाऱ्यांच्या उपयोगी पडले असे म्हणावे, तर मग ‘मनसे फॅक्टर’ आघाडीच्या उपयोगी पडू का शकला नाही? धुळ्यातील मालेगावच्या पारंपरिक मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित गेले असते तर, आघाडीसाठी ते लाभाचे ठरले असते. दिंडोरीतील येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघात स्वत: भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज आमदारकी भूषवित असतानाही तेथे राष्ट्रवादीला मताधिक्य मिळू शकले नाही. नगरची जागा तर राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली. त्यामुळे डॉ. सुजय विखे भाजपच्या वाटेवर गेले, पण तरी संग्राम जगताप सुमारे पावणेतीन लाखांपेक्षा अधिकच्या फरकाने पराभूत झाले. यातून काँग्रेस व राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारल्याचे दिसते.

समीर भुजबळांचा पराभवनाशकात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर, तर धुळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील स्वत: रिंगणात होते. शिर्डीत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या पहिल्या यादीत भाऊसाहेब कांबळे यांची उमेदवारी निश्चित करवून आणली होती; पण एक ते अडीच लाखांच्या मोठ्या फरकाने या उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले.