शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

चांगले दिवस नक्की कोणास? उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

By admin | Updated: January 5, 2015 11:11 IST

काँग्रेसच्या राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्यास आले असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - शुक्रवारी रेल्वे यंत्रणा कोलमडल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊन जो गोंधळ झाला त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्यास आले असा प्रश्न 'सामना'तील अग्रलेखातून विचारला आहे.
शुक्रवारी मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे दिवा-मुंब्रा स्थानकातील संतप्त प्रवासी रुळांवर उतरल्याने एकच गोंधळ माजला, जवळजवळ दंगलच सुरू झाली. अनेकांनी  तोडफोड केली, मोटरमन्सनाही मारहाणीचा फटका बसला. या सर्व प्रकाराबाबत अग्रलेखात नाराजी नोंदवण्यात आली आहे. मात्र ही हिंसक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत कोण असा प्रश्नही लेखात विचारण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे अनेकांचे रोजगार, शाळा, कॉलेज, परीक्षा बुडाल्या, यासाठी रेल्वेचे प्रशासन जबाबदार आहे. मोबाईलवरून एस.एम.एस.द्वारा तिकीट मिळेल अशी योजना रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली, पण तिकीट घेऊनही फलाटावरून गाडी सुटणार नसेल तर लोकांच्या मनातील संतापाचा स्फोट हा होणारच, अशी टीकाही करण्यात आली आहे. 
कॉंग्रेस राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस कोणाच्या वाट्यास आले हा प्रश्‍नच आहे. दुसर्‍यांचे सरकार असते तेव्हा लोकांनी कायदा हातात घ्यावा असे ज्यांना वाटत होते त्यांचे सरकार देशात व राज्यात अवतरले आहे. काँग्रेस राजवटीत उडालेला भडका हा जर लोकभावनेचा उद्रेक होता तर मग आता तोच उद्रेक कायदा सुव्यवस्थेची होळी वगैरे ठरू नये असे सांगत असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार काय करणार आहे तेवढे सांगावे, असा प्रश्नही लेखात विचारण्यात आला आहे.