शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

असाह्य महिलांची हाक ऐकणार कोण?

By admin | Updated: November 25, 2015 04:07 IST

संकटात सापडलेल्या महिलांच्या हाकेला धावून जाण्यासाठी पोलीस खात्याने हेल्पलाइन सुरू केली खरी; परंतु या दूरध्वनी सुविधेवर साह्य मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

मुंबई : संकटात सापडलेल्या महिलांच्या हाकेला धावून जाण्यासाठी पोलीस खात्याने हेल्पलाइन सुरू केली खरी; परंतु या दूरध्वनी सुविधेवर साह्य मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आता कुणाकडे मदतीचा हात मागावा, असा प्रश्न महिलांना पडला आहे. ‘लोकमत’ने राज्यभरात केलेल्या स्टिंगमधून हे वास्तव समोर आले आहे.२५ नोव्हेंबर हा जागतिक महिला अत्याचारविरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त लोकमतने जिल्ह्णा- जिल्ह्णात स्टिंग आॅपरेशन केले. त्याअंतर्गत महिलांच्या साहाय्यासाठी शासनाने सुरू केलेल्या १०३ आणि १०९१ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क करून ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार नोंदविली आणि त्यावर पोलिसांच्या प्रतिसादाची नोंद केली. मुंबईसारख्या महानगरात १०३ या महिला साहाय्यता क्रमांकावर संपर्क करून मदत मागणाऱ्या लोकमतच्या प्रतिनिधीला हद्दीची कारणे दाखवून मदत नाकारण्यात आली. तसेच साताऱ्यात एका महिलेवर अत्याचार होत असल्याची माहिती सांगण्यासाठी संपर्क केला असता, तिथेही अन्य ठिकाणी संपर्क करायला सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सिंधुदुर्गातसुद्धा तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याऐवजी अन्य पोलीस अधिकाऱ्याचा क्रमांक देऊन तेथे संपर्क करण्यास सांगण्यात आले. लातूरमध्ये अनेक वेळा हेल्पलाइनवर कॉल करूनसुद्धा फोन उचलण्यात आला नाही. तर हिंगोली, गोंदिया जिल्हह्णांत महिला साहाय्यता क्रमांक सुरूच नसल्याचे आढळले. (लोकमत न्यूज नेटवर्क)महिलांसाठी उपलब्ध असलेल्या या क्रमांकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यातही शासन यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून आले.शाळा-महाविद्यालयांतील तरुणी तसेच महिलांना हेल्पलाइनबद्दल माहितीच नसल्याचे उघडकीस आले. मुंबईवगळता अन्य ठिकाणी या क्रमांकांवर मदतीसाठी येणाऱ्या कॉलच्या संख्येवरूनही ते सिद्ध झाले. मुंबईत हेल्पलाइनवर महिन्याकाठी १५ ते १६ हजार कॉल येतात. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ महिन्यांत या क्रमांकावर केवळ ११ तक्रारी, जालन्यात गेल्या वर्षभरात केवळ ८ तक्रारी, नांदेडमध्ये दरमहा १० ते १२ तक्रारी, सोलापूरमध्ये ११ महिन्यांत ७४ तक्रारी, तर वर्ध्यात वर्षभरात केवळ ८ तक्रारी या क्रमांकावर नोंदविण्यात आल्या.