शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंवरील हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 17, 2015 10:13 IST

कॉ. गोविंद पानसरेंवरील भ्याड हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई,दि. १७ - नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस - राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले होते. आता कॉ. गोविंद पानसरेंवर हल्ला झाला असून या हल्ल्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंद पानसरेंवर सोमवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपावर निशाणा साधला. कॉ. गोविंद पानसरे हे कडवट पुरोगामी असला तरी त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा अधिकार असून अशाप्रकारचे भ्याड हल्ले त्यांचे भाषण व लिखाण स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पानसरे व त्यांच्या वृद्ध पत्नीवर हल्ला करणे हे षंढपणाचे लक्षण आहे असेही त्यांनी नमूद केले. दिवसाढवळ्या पानसरेंवर हल्ला झाला असून याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून गुन्हेगार मोकाट सुटल्याची ओरड केल्यास राज्य सरकारही आपलेच आहे, आज दुसरे सरकार असते तर त्यांना शब्दांनी चोपले असते असा चिमटाही त्यांनी काढला आहे. 

ओवेसी छाप लोक येऊन जातात पण त्यांना प्रत्युत्तर फक्त शिवसैनिकच देऊ शकतात. पण गोविंद पानसरेंवर हल्ला करणा-यांना भलचात चेव चढला असून नवीन राज्यसरकारने हे चित्र बदलावे अशी मागणी केेली.