शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

‘आनंदीबाई’ कोण?

By admin | Updated: October 3, 2014 03:01 IST

शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे यांच्यातील दुरावा संपुष्टात आणून परस्परांच्या तगडय़ा उमेदवारांविरुद्ध उमेदवार उभे न करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

मुंबई : शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे यांच्यातील दुरावा संपुष्टात आणून परस्परांच्या तगडय़ा उमेदवारांविरुद्ध उमेदवार उभे न करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र त्यामध्ये मोडता घालण्याचे काम एका नेत्याच्या निकटवर्तीय व्यक्तीने केले. याचीच सध्या दोन्ही पक्षांतील सैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
शिवसेना-भाजपा युती संपुष्टात आल्यानंतर प्रादेशिक पक्षांना सत्तांधतेतून संपवण्याचे राजकारण करणा:या भाजपाला धडा शिकवण्याकरिता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असा सल्ला काही मराठी उद्योगपती, लेखक, पत्रकार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला. यापूर्वी या दोघांमध्ये समझोता करण्याकरिता धडपड करणारे भय्यू महाराज हेही सक्रिय होते. त्यांनी दोघांशी चर्चा करून जागावाटपात परस्परांच्या तगडय़ा उमेदवारांसमोर उमेदवार न टाकण्याचा पर्याय निघतो का ते तपासून पाहण्याची सूचना केली होतीच. त्यानुसार, शिवसेनेचे संजय राऊत, अनिल देसाई तर मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या बैठका सुरू झाल्या. मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा थांबवली तर काही उमेदवारांना एबी फॉर्म देणो स्थगित केले. 
मात्र दोन्ही पक्षांतील काही महत्त्वाकांक्षी व्यक्ती व ज्यांच्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये वितुष्ट आले, अशी काही घरचीच माणसे सक्रिय झाली. राज यांची अडचणीच्या वेळी मदत घेतली तर कायम ते त्याचा उल्लेख करून हिणवत राहतील. यापूर्वी बाळासाहेबांना दिलेले सूप व वडे काढून किंवा उद्धव यांची प्रकृती बरी नसताना केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी केला होता. शिवाय शिवसेनेला स्वबळावर ‘मिशन 150’ पूर्ण करता येणार नाही; त्यामुळे मनसेची मदत घेतल्याची टीका होईल, असा सूर घरातील काही मंडळींनी लावला. अखेरीस दोन भावांच्या मनोमिलनाची शक्यता दुरावली. (विशेष प्रतिनिधी)
 
असे आखले होते डावपेच
मनसेच्या 35 ते 40 तर शिवसेनेच्या 88 ते 95 जागांवर एकमेकांनी कमकुवत उमेदवार द्यायचे आणि दोन्ही पक्षांचे जास्तीतजास्त उमेदवार विजयी करायचे, असा पर्याय चर्चेतून पुढे आला. तशीच वेळ आली तर राष्ट्रवादीसारख्या प्रादेशिक पक्षाला सोबत घ्यायचे, परंतु काँग्रेस व भाजपा या दोघांना दूर ठेवायचे, असे आराखडे तयार झाले.