शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

ठाण्यात स्थायीसाठी भाजपाची टाळी कोणाला?

By admin | Updated: April 6, 2017 03:29 IST

एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर आता शिवसेनेला स्थायी समितीवर कब्जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर आता शिवसेनेला स्थायी समितीवर कब्जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसने खो घालून राष्ट्रवादीला साथ दिल्याने शिवसेनेच्या स्थायी समिती मिळवण्याच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता स्थायीचा चेंडू थेट भाजपाच्या कोर्टात गेला आहे. परंतु, परिवहनच्या वेळेस ज्या पद्धतीने भाजपाच्या सदस्याने राष्ट्रवादीला टाळी दिली होती, ती आता जर दिली गेली, तर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जाणार आहे. त्यामुळे भाजपा आता कोणाला टाळी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित केली. त्यांना तब्बल ६७ जागांवर यश मिळाले असून स्थायी समितीची गणिते जुळवण्यासाठी ७० नगरसेवकांचे बळ त्यांना अपेक्षित होते. त्यानुसार, त्यांनी काँग्रेसला गळ घालून आपल्याकडे वळते केले होते. परंतु, दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केल्याने आणि दोन अपक्ष नगरसेवकांनीदेखील राष्ट्रवादीच्या कळपात घरोबा केल्याने शिवसेनेची स्थायीची वाट बिकट झाली आहे. एकूणच आता परिस्थिती बदलली असून शिवसेनेच्या गटात ६७ नगरसेवक असून स्थायी समितीत त्यांचे आठ सदस्य निवडून जातील. राष्ट्रवादीच्या गटात पक्षाचे ३४, काँग्रेसचे दोन आणि दोन अपक्ष असे ३८ सदस्य झाल्यामुळे त्यांचे ५ सदस्य निवडले जातील. तर, २३ नगरसेवक असलेल्या भाजपाचे तीन सदस्य निवडले जातील. स्थायी समितीचे सभापतीपद मिळवण्यासाठी ९ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपाचे सदस्य तटस्थ राहिले किंवा त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तरच तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे जाणार आहेत. काँग्रेस आणि भाजपाने या पदासाठी आघाडी केली, तर लॉटरी काढून अध्यक्ष निवडावा लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या शिवसेनेच्या रणनीतीला धक्का बसला आहे. दरम्यान, आता स्थायीचा चेंडू थेट भाजपाच्या कोर्टात आला आहे. यासंदर्भात भाजपाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आम्हाला श्रेष्ठींचे आदेश आहेत की, तुम्ही पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहायचे आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे आम्ही पालन करीत आहोत. शिवसेनेला पाठिंबा द्यायची वेळ आली, तर त्याचाही निर्णय श्रेष्ठीच घेतील, असेही स्पष्ट केले आहे. असे असले तरीदेखील शिवसेनेला पाठिंबा दिल्यास त्या बदल्यात एक वर्ष स्थायी समितीचे सभापतीपद मिळवण्याचा भाजपाचा विचार असून त्यानुसार श्रेष्ठींना ही गोष्ट सांगण्याचाही स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा विचार आहे. (प्रतिनिधी) >परिवहन समितीची पुनरावृत्ती होणार?शिवसेनेला अडचणीत आणण्याचा विचारही सुरू असून राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेपुढील अडचणी वाढवायच्या, असा कयासही लावला जात आहे. मागील टर्ममध्ये परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीच्या वेळेस, ऐन मतदानाच्या वेळेस भाजपाच्या एका सदस्याने राष्ट्रवादीला मत दिले आणि शिवसेनेच्या हातून परिवहन समिती हुकली होती. तसाच काहीसा प्रयत्न भाजपाकडून केला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकूणच, भाजपा कोणाला टाळी देणार, यावरच ठाणे महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.