शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

नव्या रिक्षा उभ्या राहणार कुठे?

By admin | Updated: July 12, 2017 03:45 IST

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे. त्यामुळे आधी आहेत तीच वाहने उभी राहण्यासाठी व्यवस्था करा, त्यानंतर नवीन रिक्षांसाठी सुसज्ज स्टॅण्ड देऊन त्या रस्त्यावर आणा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केली. ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मधील ‘नव्या साडेपाच हजार रिक्षांचा जाम’ या वृत्ताची दखल घेत चौधरी यांनी यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीतील शहरांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असताना शहरात नवीन रिक्षा आल्यास कोंडीत आणखी भर पडेल. नव्या वाहनांना शहरात प्रवेश नाही, असे शिवसेनेचे धोरण नाही. पण आहे त्या वाहनांबाबत ठोस भूमिका घ्यावी. डोंबिवलीत नेमके रिक्षा स्टॅण्ड किती, त्यांची क्षमता किती, नव्याने येणाऱ्या रिक्षा उभ्या कुठे करणार, याचा विचार संबंधित यंत्रणेने करावा. तो नागरिकांसमोर मांडावा आणि त्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊन मगच निर्णय घ्यावा. त्यासंदर्भात आरटीओ अधिकारी, शहर वाहतूक शाखा, सामाजिक संस्थांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशांचे हित महत्त्वाचे असली तरी आगोदर शहरात वाहनांची कोंडी होत आहेत. त्यात नव्याने डोंबिवलीच्या वाट्याला दोन हजार रिक्षा येणार, त्या उभ्या कुठे राहणार, त्यांना स्टॅण्ड कुठे मिळणार, याचा विचार का केला जात नाही, असा सवाल भाजपप्रणित रिक्षा युनियनचे सचिव दत्ता माळेकर यांनी केला.>पत्र देणे हा विरोधाभास : राजेश कदम नवीन रिक्षांचे परवाने परिवहन मंत्र्यांनीच खुले केले आहेत. त्यामुळे चौधरी पत्र देऊन काय करणार? पत्र देणे हा विरोधाभास आहे. डोंबिवलीत आधीच जागा नाही. एवढ्या रिक्षा काय करायच्या आहेत. जागा दाखवा आणि परवाना द्या. इमारत बांधतांना पार्किंग द्यावे लागते तर मग नवी वाहने कुठे उभी राहणार? त्यासाठी आधी जागा दाखवा आणि मग परवाने घ्या, असे बंधन का नाही?, परिवहन मंत्र्यांनी यात लक्ष घालावे. तसेच परवाने देताना मराठी माणसांना आधी द्या, असे आवाहन मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केले आहे.